शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरपंच निवडी की पुन्हा सोडत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींमधील सरपंच निवडीला न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींमधील सरपंच निवडीला न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आता याचिका दाखल असलेली गावे वगळून इतर गावांत सरपंच निवडी घ्यायच्या की सर्वच ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा सोडत घ्यायची, याबाबत प्रशासनापुढे पेच असून लोकांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण आहे.

जिल्ह्यामध्ये नुकत्याच १४९५ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत झाली होती. अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाने योग्य पद्धतीने आरक्षण सोडती केल्याने तक्रारी नव्हत्या. मात्र, काही ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण सोडतीवरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. कोरेगाव तालुक्यातील कटापूर, माण तालुक्यातील पिंगळी बुद्रूक आणि खटाव तालुक्यातील सातेवाडी या ग्रामपंचायतींमधील याचिकांच्या अनुषंगाने याचिकाकर्त्यांतर्फे जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे.

अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी जे आरक्षण देण्यात आले आहे, त्या प्रवर्गातील उमेदवार निवडूनच आलेला नाही. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती प्रवर्गातून पुरुष उमेदवार निवडून आला असला तरी त्या ठिकाणी त्याच प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण पडले आहे. प्रशासनाच्या या त्रुटींविरोधात अनेक जण उच्च न्यायालयात गेले आहेत. अनेकांनी याचिका दाखल केल्या असल्या तरी मोजक्याच याचिकांची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली आहे.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार याचिका दाखल झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडी न करण्याबाबतचे आदेश आहेत. आता या ग्रामपंचायती वगळून इतर निवडी करायच्या झाल्या तर ठरलेल्या कार्यक्रमानुसार म्हणजे ८, ९, १0 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यांत सरपंच निवडीचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. संबंधित तालुक्यांमध्ये तहसीलदारांनी निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या सभेसाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यादेखील केलेल्या आहेत. आता सर्वांनाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा लागलेली आहे. शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी असली तरीदेखील प्रशासनाला सुट्टीतच याबाबतचा निर्णय घेऊन तो सर्व गावांपर्यंत पोहोचवावा लागणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडीबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे. प्रत्येक गावात सरपंच निवडीवरूनच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत.

चौकट..

नियमांमुळे पेचप्रसंग...

ग्रामपंचायत अधिनियमातील गुंतागुंतीमुळे ग्रामपंचायत सदस्यांची आरक्षण सोडत आणि सरपंच सोडत यामध्ये गुंतागुंत वाढलेली आहे. अनेक ठिकाणी जी आरक्षणे आहेत, त्यातील सरपंच निवडीचे आरक्षणच पडलेले नसल्याने पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. ग्रामपंचायतींचे कामकाज चालते ग्रामविकास खात्यातर्फे तर निवडणुका घेतल्या जातात महसूल प्रशासनाच्या वतीने. यात बदल करायला हवा, अशी अपेक्षा ग्रामपंचायत सदस्य व्यक्त करत आहेत.