शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

साप-पिंपरी फाटा चौक अपघाताचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप-पिंपरी फाटा येथील चौक अपघाताचे केंद्र बनले आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप-पिंपरी फाटा येथील चौक अपघाताचे केंद्र बनले आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी अनेक अपघात होऊन वाहनधारक जायबंदी झाले आहेत.

रहिमतपूर-औंध रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. तेव्हापासून या मार्गावरून ये-जा करणारी वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. सध्या ऊसतोडणीचा हंगाम जोमात सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर उसाने भरलेल्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. रहिमतपूर बसस्थानकापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर साप व पिंपरी फाटा आहे. या चौकामध्ये रहिमतपूरकडून औंधकडे जाणारी वाहने, औंधकडून रहिमतपूरकडे येणारी वाहने तसेच साप व पिंपरीमधून रहिमतपूर व औंधकडे जाणारी वाहने अशी वाहनांची वर्दळ दररोज असते. गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे विचित्र पद्धतीने अपघात झाले आहेत. अनेक वाहनधारक यामध्ये गंभीर जखमी झाले असून, वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने इकडे-तिकडे न पाहता बेशिस्तपणे चौकामध्ये अचानक येणाऱ्या वाहनांमुळे अपघात वाढू लागले आहेत.

पवारवाडी गावाच्या हद्दीत गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी व ट्रॅक्टरच्या झालेल्या अपघातात दुचाकीचालक जखमी झाला होता. साप व पिंपरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर्शनी भागात गावांच्या नावांचे सूचनाफलक लावलेले नसल्यामुळे रहिमतपूर व औंधकडून येणाऱ्या वाहनचालकांना याठिकाणी गावाकडे जाणारे रस्ते असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वाहने वेगाने ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी सूचना फलक लावल्यास वाहनचालक योग्य ती वेगमर्यादा ठेवूनच गाडी चालवेल. त्यामुळे सूचनाफलक तातडीने लावावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

(चोैकट)

बेफाम गाडीचालकावर कारवाई करा

साप-पिंपरी फाट्यासह रहिमतपूर-पिंपरी फाटा या दरम्यानच्या रस्त्यावरही बेफाम वाहनचालकांमुळे मोठी वाहने पलटी होत आहेत. सुमारे दीड महिन्यापूर्वी जनावरांचा चारा घेऊन निघालेला टेम्पो दुचाकी आडवी आल्याने कॅनॉलजवळ पलटी झाला होता. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. असे विदारक अपघात टाळण्यासाठी बेफाम गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

०८रहिमतपूर

फोटो : रहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप-पिंपरी फाटा हा चौक अपघातांचा केंद्रबिंदू बनू पाहत आहे. (छाया : जयदीप जाधव)