शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

२०० कोटींची योजना १४०० कोटींंवर : उरमोडीच्या सिंचन कामावर १०६२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:31 AM

सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सिंचन योजनेवर फेब्रवारीअखेर १०६२ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. मुळात ही मूळ योजना

ठळक मुद्देपुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांची कामे अद्यापही अपूर्ण

नितीन काळेल ।सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सिंचन योजनेवर फेब्रवारीअखेर १०६२ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. मुळात ही मूळ योजना २१२.०७ कोटींची होती. आता त्याची सुधारित किंमत १४१७.७५ कोटींवर पोहोचली आहे. या योजनेतील कालव्याची कामे

गतीने सुरू असतानाही अद्याप प्रकल्पग्रस्त स्थलांतरित होणाºया काही गावठाणातील कामे अपूर्ण आहेत.राज्यात १९९५ मध्ये युती शासन सत्तेत आल्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धरणाची कामे हाती घेण्यात आली. त्यावेळी सातारा तालुक्यातील परळीजवळ उरमोडी नदीवर धरण बांधण्याचा निर्णय झाला. उरमोडी प्रकल्पांतर्गत धरणाचे काम पूर्ण झाले असून, २०१० च्या जून महिन्यापासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत आहे.

उरमोडी नदीवर असणारे हे धरण ५०.१० मीटर उंचीचे असून, १८६० मीटर लांबी आहे. या धरणात एकूण ९.९६ टीएमसी इतका पाणीसाठा होत आहे. या धरणातील पाण्यावर माण, खटाव आणि सातारा तालुक्यातील बहुतांशी शेती अवलंबून आहे. त्यासाठी आवश्यक असणाºया कालव्याची कामे अद्यापही सुरू आहेत. या सिंचन प्रकल्पाची मूळ प्रशासकीय मान्यताप्राप्त किंमत २१२.०७ कोटी (२०००-२००१ ची दरसूची) होती. तर अद्ययावत सुधारित किंमत १४१७.७५ कोटींवर पोहोचली आहे.दरवर्षी शेतकºयाला हेक्टरी चार हजार खर्चउरमोडी धरणावर अवलंबून असणाºया पाणी योजनेमुळे माण आणि खटाव तालुक्याला मोठा फायदा होणार आहे. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरवर होणारे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. तसेच उन्हाळ्यातही सिंचनाची सुविधा होणार आहे. या योजनेसाठी शेतकºयाला दरवर्षी हेक्टरी अवघा चार हजार रुपये खर्च येणार आहे. तसेच सध्या या सिंचन योजनेतून अवघे ३५०० हेक्टर क्षेत्र भिजत आहे. माणमध्ये कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी सुरू आहे. कामे पूर्ण नसल्याने अनेक ठिकाणी ओढे, तलावात पाणी सोडण्यात येत आहे.

धरणातील पाण्याचा वापर सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्याचे नियोजन आहे; पण सध्या कालव्यांची कामे सुरू असल्याने फक्त ४ ते ५ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे धरणात बरेच पाणी शिल्लक राहते. येत्या दोन वर्षांत संपूर्ण पाण्याचा वापर होईल, असे उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :water transportजलवाहतूकSatara areaसातारा परिसर