शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

धोका पत्करू... पण सेल्फी काढूच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:52 IST

सातारा/पेट्री : संततधार पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. हे धबधबे अन् हिरव्यागार डोंगररांगा पर्यटकांना आकर्षित करू लागल्या आहेत. असे असले तरी दुसरीकडे काही अतिउत्साही पर्यटक व युवक धोक्याकडे दुर्लक्ष करून सेल्फी काढण्याचे धाडस दाखवित आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी सेल्फीमुळे अनेक युवकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे पर्यटकांनी प्रामुुख्याने ...

सातारा/पेट्री : संततधार पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. हे धबधबे अन् हिरव्यागार डोंगररांगा पर्यटकांना आकर्षित करू लागल्या आहेत. असे असले तरी दुसरीकडे काही अतिउत्साही पर्यटक व युवक धोक्याकडे दुर्लक्ष करून सेल्फी काढण्याचे धाडस दाखवित आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी सेल्फीमुळे अनेक युवकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे पर्यटकांनी प्रामुुख्याने युवकांनी जीवावर उदार होऊन सेल्फीचा मोह टाळावा, अशी प्रतिक्रिया सातारकरांमधून उमटत आहे.जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे डोंगररांगा हिरव्यागार झाल्या आहेत. महाबळेश्वर, कोयना, ठोसेघर, भांबवली आदी ठिकाणचे धबधबेही पूर्ण क्षमतेने कोसळू लागले आहेत. अशा या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांची पावले जिल्ह्याकडे वळू लागली आहे. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक व हुल्लडबाज युवकांमुळे अनुचित घटनाही घडू लागल्याने याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.कास तलावाच्या पाण्यात फोटोसेशन करण्यापासून ते यवतेश्वर घाटातील संरक्षक कठडे व दगडांवर उभे राहून सेल्फी काढताना पर्यटक नजरेस पडत आहेत. जीवावर उदार होऊन सेल्फी काढण्याचा मोह युवकांना आवरता येत नाही. यातून एखादी विपरित घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न सातारकरांमधून उपस्थित केला जात आहे. सध्या डोंगररांगा व दगडी पाऊस तसेच शेवाळामुळे घसरट्या झाल्या आहेत. यावरून चालताना पाय घसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. मात्र, या धोक्याकडे दुर्लक्ष करून सेल्फी व फोटोसेशनसाठी तरुणाईची धडपड पाहावयास मिळत आहेत.सेल्फी काढताना सेफ तर आहात ना !यवतेश्वर घाटात धबधब्यासमोरील संरक्षक कठड्यानजीक असणाऱ्या मोठ्या दगडावर बहुतांशी पर्यटक उभे राहून फोटोसेशन तसेच सेल्फी काढताना दिसत आहेत. या दगडाखाली मोठी दरी असून, या ठिकाणचा अंदाज न आल्यास पाय घसरून मोठा अनर्थ होऊ शकतो. यामुळे सेल्फी काढताना आपण सेफ तर आहोत ना? याची पर्यटकांनी खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.महाबळेश्वरमधील पॉर्इंट सुरक्षेसाठी बंद...महाबळेश्वर येथील ब्रिटिशकालीन पॉर्इंट हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. परंतु मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरसह पाचगणीत काही पॉर्इंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. वनविभागाच्या वतीने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी दरवर्षी हे पॉर्इंट बंद केले जातात. पाचगणीत टेबललॅँड पठारही पावसामुळे घसरटे होते. मात्र, तरीही काही हौशी पर्यटक या पठाराला भेट देऊन फोटोसेशन करताना दिसून येतात.