शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस येण्याचा धोका; शासनानेच मार्ग काढला पाहिजे (संडे मुलाखत)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST

सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ग्रामपंचायत हद्दीमधील रस्त्यांचे वीज बिल थकल्याने वीज वितरण कंपनीने अनेक गावांतील वीज ...

सागर गुजर

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ग्रामपंचायत हद्दीमधील रस्त्यांचे वीज बिल थकल्याने वीज वितरण कंपनीने अनेक गावांतील वीज तोडली आहे. रात्रीच्या वेळी गावातील रस्त्यावर अंधार पसरला असून पाणी योजनेचे वीज बिल थकल्याने वीज तोडली गेली आहे आणि नळाला पाणी येणे बंद झाले असल्याने गावागावात चिंतेचे वातावरण आहे. शासनाने वीज बिलाचा भरणा हा ग्रामपंचायतीच्या माथी मारू नये, अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे, याबाबत परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील यांच्याशी साधलेला संवाद..

प्रश्न : वीज बिलांचा प्रश्न एवढा किचकट का झालेला आहे?

उत्तर : ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील रस्त्यावरची वीज तसेच पाणीपुरवठा योजना यांचे वीज बिल यापूर्वी शासन भरत होते. काही वर्षांपासून पाणीपुरवठा योजनेचे बिल हे ग्रामपंचायतीला भरण्याच्या सूचना झाल्या. आता रस्त्यावरची वीज बिले थकली आहेत, तीदेखील ग्रामपंचायतीने भरावीत, असा शासन आदेश निघाल्याने हा प्रश्न किचकट झाला आहे.

प्रश्न : सरपंच परिषदेची नेमकी मागणी काय आहे?

उत्तर : ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांच्या मीटरची बिले थकल्याने वीज वितरण कंपनीने पथदिवे तसेच पाणी योजनांच्या जोडण्या तोडल्या आहेत. त्या जोडण्या पूर्व सुरू कराव्यात, ही आमची प्रमुख मागणी आहे.

प्रश्न : १५ व्या वित्त आयोगातून वीज बिले भरण्यास कोणती अडचण आहे?

उत्तर : १५ वा वित्त आयोग हा गावातील विकास कामे करण्यासाठी दिला आहे. ग्रामसभेमध्ये या निधीच्या विकास कामांना मंजुरी याआधीच देण्यात आलेली आहे, आता या निधीमधूनच वीज बिले भरल्यास विकासकामे कशी करायची? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे १५ व्या वित्त आयोगातून बिले भरली जाणार नाहीत, यावर ग्रामपंचायतीस ठाम आहेत.

प्रश्न : ग्रामपंचायतींचा कर वाढवणे आत्ता शक्य आहे का?

उत्तर : ग्रामपंचायतीचा कर वाढवणे सध्याच्या परिस्थितीत योग्य नाही. कोरोनामुळे एक तर जनता पिचलेली आहे. ग्रामीण भागातील कर भरणारे हे शेतकरी आहेत. शेतीमालाला कोरोनामुळे उठाव मिळालेला नाही तसाच दरही मिळत नाही. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आणखी अडचणीत आणणे अन्यायकारक ठरेल.

चौकट...

प्रत्येक गावातील मूळ गावठाणे लोकसंख्या वाढीमुळे कमी पडू लागली असल्याने आता गावाच्या आजूबाजूला वाड्या-वस्त्या वाढू लागल्या आहेत. या वाड्यावर त्यांसाठी रस्ते पाणी आणि वीज देणे क्रमप्राप्त ठरत आहे. या परिसराला वीज मिळावी यासाठी विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावावर अजून निर्णय होऊ शकलेला नाही. अनेक ग्रामपंचायतींकडे सन २०१२ पासून बिले थकीत आहेत त्यावर वीज कंपनीने दंड आकारला असल्याने बिले अनेकपट वाढलेली आहेत. त्यातच ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून दिलेल्या निधीतून थकीत बिले पूर्णतः भरली जाणार नाहीत अन् पुन्हा त्याचा बोजा ग्रामपंचायतीवर राहणार आहे.

कोट..

ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातून वीज बिल भरणा करणे शक्य नसल्याने थकबाकी वाढत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन ग्रामपंचायतींच्या वीजजोडण्या परत करा सोडाव्यात, अशी मागणी केली असून ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन सकारात्मक मार्ग काढण्याची विनंती करण्यात येणार आहे.

- नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद