रिक्षा थांब्याला गारवेलची माया!
By Admin | Updated: December 23, 2015 01:30 IST2015-12-23T00:36:32+5:302015-12-23T01:30:34+5:30
प्रवासीही सुखावले : थंड वातावरणात राहण्यासाठी पर्यावरणप्रेमी चालकांची शक्कल

रिक्षा थांब्याला गारवेलची माया!
सातारा : रखरखत्या ऊन्हात गाडी पार्किंग करतानासुद्धा वाहनधारक सावलीची जागा निवडतात. त्यामुळे गाडीतील वातावरही थंड राहणे त्याच पद्धतीने रिक्षाचालकही आता थांब्यावर सावली व गारवा राहण्यासाठी बारामहीने फुलत असलेली गारवेलचा वापर करत आहेत. थंड वातावरण आणि फुलांचे जणू बगिचाच्या छायेखाली बसल्याचे याठिकाणी भासत असून, ही कल्पना शहरतील अनेक रिक्षा थांबेमध्ये पाहायला मिळत आहे.
शहरालगत असणारे रिक्षा थांबे आहेत. भर चौकात असणारे थांबे बंदीस्त नसल्याने उघड्यावर असतात. त्यमाुळे ऊन-पाऊस खात प्रवाशांची वाट पाहावे लागते. यासाठी अनेकांनी उन्हाळ्यात किमान रिक्षावर सावली मिळेल ऐवढी बारदाने टाकून मंडप उभारत आहेत. तर अनेकजन टपावर चटई टाकत आहे. यासाठी अनेकांनी काही झाडे झुडपेही लावली. परंतु ठरावीक कालावधीनंतर या झाडांच्या पाने-फूले गळत असल्याने त्याचा फारसा फायदा होत नाही.
सदर बझार येथील भारतमाता रिक्षा थांब्या जवळ अशीच गारवेल लावली आहे. या वेलीच्या मंडपात जवळपास १५ ते २० रिक्षा एकावेळी बसतात. भर ऊन्हातही याठिकाणी गारवा असल्याने रिक्षाचे हुड देखील थंड राहत असल्याने प्रवाशांनाही रखरखत्या ऊन्हात गारवा मिळत आहे. सध्या या थांब्यावर दररोज हजारो फुले उमलत आहेत.
सकाळी व सायंकाळी या थांब्याकडे पाहिले तर जणू बागेतच रिक्षा थांबलीये की काय असा भास होतो. (प्रतिनिधी)
बागेचा रिक्षाथांबा
रिक्षा थांब्यावर लाकडी बांबूने मंडप बांधायला आणि गारवेल लावत आहेत. ही गारवेल दोन-तीन महिन्यांतच वाढते, या गारवेलवर फुलेही बहरतात. या वेलीची वाढ जास्त असल्याने संपूर्ण मंडपात ही पसरली आहे. दाट पाने व फुलांमुळे मोठी सावली मिळते. तर सकाळी या वेलीवर टवटवीत फुलेही दिसून येतात. त्यामुळे थांब्याचे दृश एखाद्या बागेप्रमाणे दिसते.