शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सातारा जिल्ह्याला परतीचा तडाखा, शिरवळमध्ये चोवीस तासांत ११४ मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:58 IST

सातारा जिल्ह्याला परतीच्या पावसाने यंदा अक्षरश: झोडपून काढले असून, अजूनही ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच आहे. कधी नव्हे ते दुष्काळी माण, खटाव व फलटण तालुक्यातही दमदार पाऊस झाल्याने नदी, ओढे, तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परंतु शेतीपिकांचे प्रचंंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देखेमावती नदीला पूर, वसना नदीवरील पुलाचा भराव गेला वाहूनतीन गावांचा संपर्क तुटला, फलटण तालुक्याच्या पश्चिम भागालाही झोडपले

सातारा : सातारा जिल्ह्याला परतीच्या पावसाने यंदा अक्षरश: झोडपून काढले असून, अजूनही ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच आहे. कधी नव्हे ते दुष्काळी माण, खटाव व फलटण तालुक्यातही दमदार पाऊस झाल्याने नदी, ओढे, तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परंतु शेतीपिकांचे प्रचंंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.खंडाळा तालुक्यात सोमवारी सायंकाळी सात ते मंगळवारी सकाळी सात या चोवीस तासांत तब्बल ११४ तर वाठार बुद्रुक मंडलात १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे लोणंदच्या खेमावती नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिरवळ येथील सटवाई कॉलनीतील मांड ओढ्यावरील पूल महिनाभरात तब्बल सात वेळा पाण्याखाली गेला आहे.खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती जलमय झाल्याने नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. खंडाळ्यासह फलटण तालुक्याच्या पश्चिम भागालाही परतीच्या पावसाने झोडपून काढले. कोरेगाव तालुक्यातील दहिगाव येथील वसना नदीवरील पुलाचा भराव वाहून गेल्याने तीन गावांचा संपर्क तुटला आहे.या पावसामुळे माण, खटाव तालुक्यांतील नदी, ओढे, तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला असून, जिल्ह्यातील १ हजार ३०९ गावांतील अंदाजे ११ हजार ८०० हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे.यंदा दुप्पट पाऊससातारा जिल्ह्यात यावर्षी ३१ आॅक्टोबरपर्यंत पाच महिन्यांत १ हजार ७६१ मिलिमीटर पाऊस पडलाय. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ८३४.२५ मिलिमीटर पाऊस होतो. तर आॅक्टोबरपर्यंत ९१८ मिलिमीटरपर्यंत पर्जन्यमानाची नोंद होते; पण यावर्षी तब्बल १ हजार ७०० हून अधिक मिलिमीटर पाऊस झाला आहे. ही टक्केवारी १९१ इतकी आहे. म्हणजे जवळपास यावर्षी दुप्पट पाऊस झाला आहे.महाबळेश्वरात सर्वाधिक नोंदजिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात ३१ आॅक्टोबरअखेरपर्यंत सर्वाधिक ८ हजार १३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसाची टक्केवारी ३६५ इतकी आहे. तर सातारा तालुक्यात २ हजार २४४, जावळी २ हजार ७८८, पाटण २ हजार ४६७, कºहाड १ हजार ३६३, कोरेगाव १ हजार ८०, खटाव ८६२, माण ५७५, फलटण ५८६, खंडाळा ९१२ आणि वाई तालुक्यात १ हजार २५४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर