शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सातारा जिल्ह्याला परतीचा तडाखा, शिरवळमध्ये चोवीस तासांत ११४ मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:58 IST

सातारा जिल्ह्याला परतीच्या पावसाने यंदा अक्षरश: झोडपून काढले असून, अजूनही ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच आहे. कधी नव्हे ते दुष्काळी माण, खटाव व फलटण तालुक्यातही दमदार पाऊस झाल्याने नदी, ओढे, तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परंतु शेतीपिकांचे प्रचंंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देखेमावती नदीला पूर, वसना नदीवरील पुलाचा भराव गेला वाहूनतीन गावांचा संपर्क तुटला, फलटण तालुक्याच्या पश्चिम भागालाही झोडपले

सातारा : सातारा जिल्ह्याला परतीच्या पावसाने यंदा अक्षरश: झोडपून काढले असून, अजूनही ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच आहे. कधी नव्हे ते दुष्काळी माण, खटाव व फलटण तालुक्यातही दमदार पाऊस झाल्याने नदी, ओढे, तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परंतु शेतीपिकांचे प्रचंंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.खंडाळा तालुक्यात सोमवारी सायंकाळी सात ते मंगळवारी सकाळी सात या चोवीस तासांत तब्बल ११४ तर वाठार बुद्रुक मंडलात १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे लोणंदच्या खेमावती नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिरवळ येथील सटवाई कॉलनीतील मांड ओढ्यावरील पूल महिनाभरात तब्बल सात वेळा पाण्याखाली गेला आहे.खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती जलमय झाल्याने नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. खंडाळ्यासह फलटण तालुक्याच्या पश्चिम भागालाही परतीच्या पावसाने झोडपून काढले. कोरेगाव तालुक्यातील दहिगाव येथील वसना नदीवरील पुलाचा भराव वाहून गेल्याने तीन गावांचा संपर्क तुटला आहे.या पावसामुळे माण, खटाव तालुक्यांतील नदी, ओढे, तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला असून, जिल्ह्यातील १ हजार ३०९ गावांतील अंदाजे ११ हजार ८०० हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे.यंदा दुप्पट पाऊससातारा जिल्ह्यात यावर्षी ३१ आॅक्टोबरपर्यंत पाच महिन्यांत १ हजार ७६१ मिलिमीटर पाऊस पडलाय. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ८३४.२५ मिलिमीटर पाऊस होतो. तर आॅक्टोबरपर्यंत ९१८ मिलिमीटरपर्यंत पर्जन्यमानाची नोंद होते; पण यावर्षी तब्बल १ हजार ७०० हून अधिक मिलिमीटर पाऊस झाला आहे. ही टक्केवारी १९१ इतकी आहे. म्हणजे जवळपास यावर्षी दुप्पट पाऊस झाला आहे.महाबळेश्वरात सर्वाधिक नोंदजिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात ३१ आॅक्टोबरअखेरपर्यंत सर्वाधिक ८ हजार १३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसाची टक्केवारी ३६५ इतकी आहे. तर सातारा तालुक्यात २ हजार २४४, जावळी २ हजार ७८८, पाटण २ हजार ४६७, कºहाड १ हजार ३६३, कोरेगाव १ हजार ८०, खटाव ८६२, माण ५७५, फलटण ५८६, खंडाळा ९१२ आणि वाई तालुक्यात १ हजार २५४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर