शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

परतीच्या पावसाने दाहकता कमी; तरीही एक लाख लोकांसाठी टॅंकर, पाणी टंचाई वाढणार

By नितीन काळेल | Updated: October 17, 2023 23:22 IST

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो.

सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने काही प्रमाणात दिलासा दिल्याने टंचाईची दाहकता कमी झाली असलीतरी संकट कायम आहे. कारण, अजुनही ७८ गावे आणि ३५७ वाड्यांसाठी ८६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यावर १ लाख १४ हजार नागरिक आणि ७५ हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे. तर कमी पर्जन्यमानामुळे आगामी काळात टंचाई आणखी वाढणार आहे.

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. यंदा मात्र, या पावसाने सुरूवातीपासून निराशा केली. तर परतीच्या पावसानेही दगा दिला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी मोठे पाणी प्रकल्प भरलेले नाहीत. तर दुष्काळी भागातील पाझर तलावात ठणठणाट आहे. अनेक ओढ्यांना पाणी नाही. बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील टंचाईची स्थिती कायम आहे. फक्त परतीचा पाऊस ज्या भागात झाला तेथील टॅंकर बंद झाले आहेत. एेवढाच दिलासा आहे. तरीही आगामी काळात संबंधित गावांना टॅंकर सुरू करावे लागणार आहेत. कारण, पाणीस्त्रोत कोरडे पडणार आहेत.

जिल्ह्यातील टॅंकरची संख्या १०० पर्यंत पोहोचली होती. परतीचा पाऊस काही भागात झाल्याने ही संख्या आता ८६ वर आली आहे. यामध्ये माण तालुक्यात टंचाई अधिक आहे. ३८ गावे आणि तब्बल ३०२ वाड्यांना टंचाई जाणवत आहे. यासाठी ५५ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या टॅंकरवर ६२ हजार नागरिक आणि ५१ हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, भाटकी, खडकी, धुळदेव, ढाकणी, कारखेल, वरकुटे-म्हसवड, हवालदारवाडी, रांजणी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटबाव, मार्डी, पर्यंती, इंजबाव, वारुगड, परकंदी, महिमानगड, पांढरवाडी, पिंगळी, विरळी, कुरणेवाडी आदी गावांना व त्याखालील वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

खटाव तालुक्यातही टंचाईची दाहकता आहे. २० गावे आणि २४ वाड्यांसाठी १४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टॅंकरवर सुमारे २४ हजार नागरिक आणि सात हजार पशुधन अवलंबून आहेत. मांजरवाडी, मोळ, गारवडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, पडळ, धोंडेवाडी, दातेवाडीसाठी टॅंकर सुरू आहेत. फलटण तालुक्यातील ९ गावे आणि ३१ वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहेत. ११ टॅंकरवर १४ हजार नागरिकांबरोबरच १४ हजार पशुधनाचीही तहान अवलंबून आहे. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरूड, घाडगेमळा येथे टॅंकर सुरू आहेत. कोरेगाव तालुक्यातही ११ गावांतील १४ हजार ६९१ नागरिक आणि अडीच हजार पशुधनाला टॅंकरचा आधार आहे. यासाठी ६ टॅंकर सुरू आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी येथे टंचाई कायम आहे. तर जिल्ह्यातील इतर सात तालुक्यात टॅंकर सुरू नाहीत.

दुष्काळी तालुक्यातच बिकट स्थिती...जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातच बिकट स्थिती आहे. त्यातच यापुढे पाऊस पडणार नाही. त्यामुळे पुढील आठ महिन्यांसाठीतरी टंचाई निवारणाचे नियोजन करावे लागणार आहे. कारण, काही दिवसांतच अनेक गावांतून टॅंकरची मागणी होणार आहे. उन्हाळ्यात तर टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. सध्या टंचाई निवारणासाठी टॅंकर सुरू आहेत. तसेच चार तालुक्यात १८ विहिरी आणि २८ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर