शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने दाहकता कमी; तरीही एक लाख लोकांसाठी टॅंकर, पाणी टंचाई वाढणार

By नितीन काळेल | Updated: October 17, 2023 23:22 IST

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो.

सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने काही प्रमाणात दिलासा दिल्याने टंचाईची दाहकता कमी झाली असलीतरी संकट कायम आहे. कारण, अजुनही ७८ गावे आणि ३५७ वाड्यांसाठी ८६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यावर १ लाख १४ हजार नागरिक आणि ७५ हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे. तर कमी पर्जन्यमानामुळे आगामी काळात टंचाई आणखी वाढणार आहे.

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. यंदा मात्र, या पावसाने सुरूवातीपासून निराशा केली. तर परतीच्या पावसानेही दगा दिला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी मोठे पाणी प्रकल्प भरलेले नाहीत. तर दुष्काळी भागातील पाझर तलावात ठणठणाट आहे. अनेक ओढ्यांना पाणी नाही. बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील टंचाईची स्थिती कायम आहे. फक्त परतीचा पाऊस ज्या भागात झाला तेथील टॅंकर बंद झाले आहेत. एेवढाच दिलासा आहे. तरीही आगामी काळात संबंधित गावांना टॅंकर सुरू करावे लागणार आहेत. कारण, पाणीस्त्रोत कोरडे पडणार आहेत.

जिल्ह्यातील टॅंकरची संख्या १०० पर्यंत पोहोचली होती. परतीचा पाऊस काही भागात झाल्याने ही संख्या आता ८६ वर आली आहे. यामध्ये माण तालुक्यात टंचाई अधिक आहे. ३८ गावे आणि तब्बल ३०२ वाड्यांना टंचाई जाणवत आहे. यासाठी ५५ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या टॅंकरवर ६२ हजार नागरिक आणि ५१ हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, भाटकी, खडकी, धुळदेव, ढाकणी, कारखेल, वरकुटे-म्हसवड, हवालदारवाडी, रांजणी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटबाव, मार्डी, पर्यंती, इंजबाव, वारुगड, परकंदी, महिमानगड, पांढरवाडी, पिंगळी, विरळी, कुरणेवाडी आदी गावांना व त्याखालील वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

खटाव तालुक्यातही टंचाईची दाहकता आहे. २० गावे आणि २४ वाड्यांसाठी १४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टॅंकरवर सुमारे २४ हजार नागरिक आणि सात हजार पशुधन अवलंबून आहेत. मांजरवाडी, मोळ, गारवडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, पडळ, धोंडेवाडी, दातेवाडीसाठी टॅंकर सुरू आहेत. फलटण तालुक्यातील ९ गावे आणि ३१ वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहेत. ११ टॅंकरवर १४ हजार नागरिकांबरोबरच १४ हजार पशुधनाचीही तहान अवलंबून आहे. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरूड, घाडगेमळा येथे टॅंकर सुरू आहेत. कोरेगाव तालुक्यातही ११ गावांतील १४ हजार ६९१ नागरिक आणि अडीच हजार पशुधनाला टॅंकरचा आधार आहे. यासाठी ६ टॅंकर सुरू आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी येथे टंचाई कायम आहे. तर जिल्ह्यातील इतर सात तालुक्यात टॅंकर सुरू नाहीत.

दुष्काळी तालुक्यातच बिकट स्थिती...जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातच बिकट स्थिती आहे. त्यातच यापुढे पाऊस पडणार नाही. त्यामुळे पुढील आठ महिन्यांसाठीतरी टंचाई निवारणाचे नियोजन करावे लागणार आहे. कारण, काही दिवसांतच अनेक गावांतून टॅंकरची मागणी होणार आहे. उन्हाळ्यात तर टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. सध्या टंचाई निवारणासाठी टॅंकर सुरू आहेत. तसेच चार तालुक्यात १८ विहिरी आणि २८ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर