शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

परतीच्या पावसाने दाहकता कमी; तरीही एक लाख लोकांसाठी टॅंकर, पाणी टंचाई वाढणार

By नितीन काळेल | Updated: October 17, 2023 23:22 IST

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो.

सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने काही प्रमाणात दिलासा दिल्याने टंचाईची दाहकता कमी झाली असलीतरी संकट कायम आहे. कारण, अजुनही ७८ गावे आणि ३५७ वाड्यांसाठी ८६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यावर १ लाख १४ हजार नागरिक आणि ७५ हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे. तर कमी पर्जन्यमानामुळे आगामी काळात टंचाई आणखी वाढणार आहे.

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. यंदा मात्र, या पावसाने सुरूवातीपासून निराशा केली. तर परतीच्या पावसानेही दगा दिला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी मोठे पाणी प्रकल्प भरलेले नाहीत. तर दुष्काळी भागातील पाझर तलावात ठणठणाट आहे. अनेक ओढ्यांना पाणी नाही. बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील टंचाईची स्थिती कायम आहे. फक्त परतीचा पाऊस ज्या भागात झाला तेथील टॅंकर बंद झाले आहेत. एेवढाच दिलासा आहे. तरीही आगामी काळात संबंधित गावांना टॅंकर सुरू करावे लागणार आहेत. कारण, पाणीस्त्रोत कोरडे पडणार आहेत.

जिल्ह्यातील टॅंकरची संख्या १०० पर्यंत पोहोचली होती. परतीचा पाऊस काही भागात झाल्याने ही संख्या आता ८६ वर आली आहे. यामध्ये माण तालुक्यात टंचाई अधिक आहे. ३८ गावे आणि तब्बल ३०२ वाड्यांना टंचाई जाणवत आहे. यासाठी ५५ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या टॅंकरवर ६२ हजार नागरिक आणि ५१ हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, भाटकी, खडकी, धुळदेव, ढाकणी, कारखेल, वरकुटे-म्हसवड, हवालदारवाडी, रांजणी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटबाव, मार्डी, पर्यंती, इंजबाव, वारुगड, परकंदी, महिमानगड, पांढरवाडी, पिंगळी, विरळी, कुरणेवाडी आदी गावांना व त्याखालील वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

खटाव तालुक्यातही टंचाईची दाहकता आहे. २० गावे आणि २४ वाड्यांसाठी १४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टॅंकरवर सुमारे २४ हजार नागरिक आणि सात हजार पशुधन अवलंबून आहेत. मांजरवाडी, मोळ, गारवडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, पडळ, धोंडेवाडी, दातेवाडीसाठी टॅंकर सुरू आहेत. फलटण तालुक्यातील ९ गावे आणि ३१ वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहेत. ११ टॅंकरवर १४ हजार नागरिकांबरोबरच १४ हजार पशुधनाचीही तहान अवलंबून आहे. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरूड, घाडगेमळा येथे टॅंकर सुरू आहेत. कोरेगाव तालुक्यातही ११ गावांतील १४ हजार ६९१ नागरिक आणि अडीच हजार पशुधनाला टॅंकरचा आधार आहे. यासाठी ६ टॅंकर सुरू आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी येथे टंचाई कायम आहे. तर जिल्ह्यातील इतर सात तालुक्यात टॅंकर सुरू नाहीत.

दुष्काळी तालुक्यातच बिकट स्थिती...जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातच बिकट स्थिती आहे. त्यातच यापुढे पाऊस पडणार नाही. त्यामुळे पुढील आठ महिन्यांसाठीतरी टंचाई निवारणाचे नियोजन करावे लागणार आहे. कारण, काही दिवसांतच अनेक गावांतून टॅंकरची मागणी होणार आहे. उन्हाळ्यात तर टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. सध्या टंचाई निवारणासाठी टॅंकर सुरू आहेत. तसेच चार तालुक्यात १८ विहिरी आणि २८ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर