शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; माण, खटावमधील रस्ते बंद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:13 IST

ढगफुटीसदृश पाऊस : धरणक्षेत्रातही दमदार; नवजाला ६२ मिलिमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालू लागला असून दुष्काळी भागात ढगफुटीसदृश हजेरी लागत आहे. यामुळे माण आणि खटाव तालुक्यातील दोन रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रातही पाऊस वाढला आहे. २४ तासांत कोयनेला ४३ तर नवजा येथे ६२ मिलिमीटरची नोंद झाली आहे.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान मान्सूनचा पाऊस पडतो. या तीन महिन्यातील पावसावरच वर्षभराचे शेती तसेच पिण्याच्या पाण्याचे गणित अवलंबून असते. यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे पाझरतलाव, मोठी धरणेही भरुन वाहत आहेत. सततच्या पावसामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे. अशातच आता परतीचा पाऊस सुरू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात धो-धो पाऊस होत आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातच परतीचा जोरदार पाऊस पडतो. सप्टेंबर ते ऑक्टोबरचे काही दिवस असा हा पाऊस असतो; पण क्षणातच धो-धो पाऊस पडत असल्याने ओढे, नाले भरून वाहतात. तलावांत पाणीसाठा होता. सध्या अशीच स्थिती या तालुक्यात होऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे. कारण, खरीप हंगामातील पिके काढणीस आलेली आहेत. अशातच पाऊस पडत असल्याने पीक नुकसानीची भीती आहे.माण तालुक्यातील कुकुडवाड मंडलात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे क्षणातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. म्हसवड-मायणी रस्त्यावर पाणी आले. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. वाहनधारक तसेच परिसरातील अनेक गावांना याचा फटका बसणार आहे.त्याचबरोबर खटाव तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. येरळा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने मायणी-निमसोड रस्ताही तात्पुरता बंद झाला आहे. पाणी कमी झाल्यानंतरच वाहतूक सुरळीत होणार आहे. या परतीच्या पावसामुळे माण, खटाव तालुक्यात पावसाचा धुमाकूळ वाढू लागल्याचे चित्र आहे.

कोयनेच्या पायथा वीजगृहातून पुन्हा विसर्ग..जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पाऊस सुरू झाला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला २५, नवजा ६२ आणि कोयनेला ४३ मिलिमीटरची नोंद झाली आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १०४.८२ टीएमसी झाला होता. धरण भरण्यासाठी सव्वा टीएमसी पाणी आवश्यकता आहे; पण पाणी आवक वाढल्याने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करुन २ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे कोयना नदीपात्रातील पाण्यातही वाढ झाली आहे.