शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

राष्ट्रवादीमधील राजीनामा प्रकरण स्क्रिप्टेड, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची टिका 

By दीपक देशमुख | Updated: May 6, 2023 16:23 IST

येणाऱ्या निवडणुकात भाजप ताकद दाखवेल

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस सध्या अंतर्गत कलहात गुंतलेली आहे. त्यामुळे राजीनामा देणे आणि मागे घेणे असे स्क्रीप्टेड नाटक करावे लागले आहे. कोणी राजीनामा देतंय, मग लाेक रडताहेत, समजूत घातली जातेय. मग राजीनामा मागे घेतला जातोय, हे सर्व पूर्वनियोजित वाटत असल्याचे लोक बोलू लागले आहेत, अशी टिका केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.मिश्रा म्हणाले, सातारा जिल्ह्यात यापुर्वी राष्ट्रवादीची ताकद असेलही पण सध्या जिल्ह्यात प्रत्येक बूथवर भाजप पोहोचली आहे. येणाऱ्या निवडणुकात भाजप ताकद दाखवेल. सातारा जिल्हा व बारामतीच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर भाजप येईल, असा दावा मिश्रा यांनी यावेळी केला. जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेल्या मल्ल फोगट भगिनी यांच्या उपोषणाबाबत मिश्रा म्हणाले, याबाबत न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. याचा तपास हाेवून योग्य ती कार्यवाही सुरू आहे.महाराष्ट्रात भाजपाचा विश्वासघात करून महाविकास आघाडीचे सरकार आले. यामुळे महाराष्ट्र विकासात दहा वर्षे मागे गेला. त्यामुळ कर्नाटकची जनता भाजपाला साथ देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशातील अनेक छोटे-मोठ्या विरेाधी पक्षांनी एकत्र येवून मोदी हटाव हा एवढाच कार्यक्रम ठेवला आहे. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणताही ठोस अजेंडा नाही. अशा आघाड्यांचा काहीही फायदा नसतो, असेही मिश्रा म्हणाले.  यावेळी मिश्रा यांनी जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामसडक योजना, जलजिवन मिशन या योजनांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. घरकुल योजना ९० टक्के काम झाले असून पोषण आहार योजनांचे कामही सुरू असल्याची माहिती दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा