शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

दुधी भोपळ्याचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 00:21 IST

मातीविना शेतीचा प्रयोग : जालिंदर सोळस्कर यांनी खरबूज, टोमॅटोच्या पिकातून सोळशीच्या माळरानावर घडविला इतिहास

कायम दुष्काळी भाग असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सोळशीच्या माळरानात आधुनिक शेतीबरोबरच नवनवीन प्रयोग राबवणारे युवा शेतकरी जालिंदर सोळस्कर जिल्ह्यात मातीविना शेती हा पहिला प्रयोग त्यांच्या शेतात यशस्वी केला आहे. आज दुधीभोपळा, खरबूज, टॉमेटोची ते उत्तम पद्धतीने शेती करत आहेत. सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत त्यांनी २७ ते २८ टन दुधी भोपळ्याचे उत्पन्न घेतले आहे. सोळशी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जालिंदर सोळस्कर यांना लहानपणापासूनच शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी जेमतेम दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यापेक्षा शेतीविषयक माहिती मिळेल, अशा नोकरीचा मार्ग स्वीकारत त्यांनी कामशेत येथील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी मिळविली. या कंपनीत त्यांनी जवळपास सहा वर्षे काम केले. तर रायगड येथे दोन वर्षे काम केले. या दोन्ही कंपनीत नोकरी करत असताना त्यांना परदेशातील लोकांच्या शेती तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात केली. ते सध्या नाशिकमधील द्राक्ष बागांचे व रत्नागिरीतील हजारो एकर काजू शेतीचे सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत. सोळशी येथील वडिलार्जित तीन एकर शेतीत त्यांनी सर्वप्रथम द्राक्षेचा प्रयोग राबविला. त्यांचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. त्यांनी घेतलेल्या द्राक्ष पिकास थायलंडच्या बाजारपेठेतून मागणी आली. शेती करायला काळी माती लागते. तरच शेती करता येते, ही किमया ही त्यांनी मोडीत काढली. मातीविना शेती हा प्रयोग काही वर्षांपूर्वीच आपल्या शेतात यशस्वी केला. शेती वाचविण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. असणारे संपूर्ण क्षेत्र जरी ठिबक सिंचनखाली असले तरी पाण्याविना शेतीव्यवस्था कोलमडून जाण्याचा मोठा धोका आगामी काळात या भागातील शेतकऱ्यांना जाणवणार आहे. द्राक्ष, ढोबळी मिरची, अगोरा वांग, चायनीज भाज्या यासारख्या विविध पिके त्यांनी आपल्या शेतात घेऊन ती यशस्वी केली आहेत. आज ३० गुंठे क्षेत्रात त्यांनी मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनचा वापर करून दुधी भोपळ्याचे पीक घेतले आहे. --संजय कदमउत्तम शेती व्यवस्थापनासाठी शिक्षणाची आवश्यकता नाही. आपण बाह्य जगाचा अभ्यास करणे गरजेचे आहे, अनुभवातून मिळालेले ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असते, असा माझा विश्वास आहे. तरुणपिढीने नोकरीच्या मागे न लागता असणारी शेती काळानरूप करावी. सध्या शेती मालाच्या दराबाबत बाजारपेठेत भिन्न परिस्थिती आहे. टॉमेटोसारखे पीक दर नसल्याने शेतकरी रस्त्यावर ओतून देत आहेत. मात्र माझ्या बागेतून दररोज १ टन टॉमेटो ९ ते १० रुपये किलोप्रमाणे विकली जात आहेत.- जालिंदर सोळस्कर