शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara- सह्याद्री कारखाना: पुन्हा निवडणूक लावा; बाळासाहेब पाटलांच्या आव्हानाला मनोज घोरपडे यांचे प्रतिआव्हान

By प्रमोद सुकरे | Updated: April 11, 2025 11:48 IST

'मतपत्रिकेवर निवडणूक झाली याचा आनंद'

प्रमोद सुकरे कऱ्हाड: अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. तिरंगी लढतीत अपेक्षेप्रमाणे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी बाजी मारली.त्यांनी भाजपचे आमदार मनोज घोरपडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या दोन स्वतंत्र पॅनेलचा पराभव केला.या निवडणुकीदरम्यान आरोप - प्रत्यारोपांच्या बऱ्याच फैरी झडल्या. पण आता विजयाचा गुलाल खाली बसतो न बसतो तोच पुन्हा आव्हान प्रतिआव्हान सुरू झाले आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील राजकीय वातावरण गरमागरमच दिसत आहे.दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला सहकारी साखर कारखाना म्हणजे सह्याद्री सहकारी साखर कारखाना होय‌. या कारखान्यावर स्थापनेपासून पी.डी. पाटील व पुढे त्यांचे पुत्र माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचीच सत्ता राहिली आहे. कारखान्याच्या गत ३ निवडणुका तर बाळासाहेब पाटील यांना बिनविरोध करण्यात यश आले होते.यंदा मात्र विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर चा निकाल फिरला तसे कारखाना निवडणुकीसाठीचे रंग बदलले.सुरुवातीला एकास एक लढत होईल असे बोलले जात होते. मात्र विधानसभेला एकत्रित राहिलेल्या विरोधकांच्यातच फूट पडली‌. भाजपचे आमदार मनोज घोरपडे व भाजपचे जिल्हा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचीच दोन पॅनेल रिंगणात उतरली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. तरी देखील सगळ्यांनीच प्रचाराचा जोर लावला होता.मतदार गाठीभेटी, प्रचार सभा रंगत होत्या अन् त्यातून कारखान्याच्या संदर्भातून अनेक मुद्दे उपस्थित करत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्यामुळे सभासदांचे प्रबोधन अन् इतरांचे चांगलेच मनोरंजनही झाले. निकालानंतर मात्र सत्ताधाऱ्यांनी बॅलेट पेपर वर निवडणूक झाली याचा आनंद आहे. असे म्हणत जणू 'ईव्हीएम' मशीनच्या माध्यमातून जिंकलेल्या विधानसभा निवडणूक निकालावर बोट ठेवले. हाच धागा पकडून राज्यातील महाविकास आघाडीचे काही नेते पुन्हा 'बॅलेट पेपर' चा मुद्दा पुढे करीत सगळ्या निवडणूका बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजेत अशी मागणी करू लाघले आहेत. त्यामुळे आव्हान प्रति आव्हान सुरू झाली आहेत. आमदार घोरपडेंनी देखील त्यांना प्रतिआव्हान दिले आहे.

मतपत्रिकेवर निवडणूक झाली याचा आनंद - बाळासाहेब पाटीलमतपत्रिकेवर निवडणूक झाली याचा आपल्याला आनंद आहे. आपण त्यावर फार बोलू शकत नाही.मात्र राज ठाकरे यांचे भाषण आपण सगळ्यांनी ऐकले आहे. त्यांनी मांडलेली ईव्हीएम संदर्भातली भूमिका आपल्याला माहित आहे असे म्हणत बाळासाहेब पाटील यांनी ईव्हीएम वर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालावर जणू बोट ठेवले. तोच धागा पकडत कार्यकर्तेही 'ईव्हीएम' मुळेच ते त्यावेळी जिंकले असा दावा करीत आहेत. अप्रत्यक्षपणे बॅलेट पेपरवर मतदान घेऊन घोरपडेंनी निवडून येऊन दाखवावे असे आव्हान दिले जात आहे.

पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊया - मनोज घोरपडेबॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या की आम्ही जिंकतो असे चित्र आघाडीचे नेते तयार करीत आहेत. पण सह्याद्रीच्या सत्ताधाऱ्यांनी वारस नोंदी रखडवून ठेवून सुमारे ९ हजार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवले. त्यांनी त्यांना त्वरीत सभासद करून घ्यावे, पुन्हा कारखान्याची निवडणूक लावावी म्हणजे काय निकाल येतोय हे समोर येईल. त्यानंतर मी पण आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. पुन्हा निवडणुकीला दोघेही सामोरे जाऊया. मग निकाल बदलतोय का ? तेही लक्षात येईल असे जाहीर आव्हान आमदार मनोज घोरपडे यांनी दिले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024Balasaheb Patilबाळासाहेब पाटीलEVM Machineईव्हीएम मशीन