शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Satara News: नीरा-देवघरच्या पाण्यावरून रणकंदन, रामराजेंचा रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर घणाघात, म्हणाले..

By दीपक शिंदे | Updated: February 27, 2023 18:39 IST

..बघूया जनता कोणाला साथ देते

फलटण : ‘कृष्णा खोऱ्यातील पाणी आम्ही मेहनतीने अडविले असून, आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे करीत आहेत, आम्ही पाणी अडवून धरणे बांधली, पुनर्वसन केले, कामे सुरू केली, सर्व काय आम्ही शिजवलं आणि याला फोडणी द्यायचं काम विरोधक करीत आहेत. रणजितसिंह जलनायक नसून खलनायक आहेत,’ असा घणाघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केला.सध्या नीरा-देवघरच्या पाण्यावरून फलटण तालुक्यात रणकंदन माजले आहे. त्या पार्श्वभूमीवर फलटण येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘कृष्णा खोऱ्यामध्ये आम्ही लवादाच्या कचाट्यातून पाणी अडविण्याचे काम वेळेत केल्याने तब्बल ८१ टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्यात मिळाले आहे. नीरा-देवघर धरणाचे काम आम्हीच पूर्ण केले. खंडाळा तालुक्यापर्यंत कालव्याद्वारे याचे पाणी आम्ही आणले. पुढील काम पूर्ण होईपर्यंत ५५ टक्के पाणी बारामतीला आणि ४५ टक्के पाणी फलटणला मिळत होते. आपल्या तालुक्याला हे पाणी पुरत असताना यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न खासदारांनी केला. खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह आणि आमदार जयकुमार गोरे यांनी बारामतीला जाणाऱ्या पाण्याला विरोध करून पूर्वीचा जीआर बदलायला लावला. यामुळे नीरा-देवघरचे पाणी आपल्या तालुक्याला मिळणार नाही, त्यांची ही मोठी चूक आहे.नीरा-देवघर क्षेत्रात भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस हे तालुके आहेत. या तालुक्यांची तहान भागून इतर तालुक्याला पाणी देण्यास आपला कसलाही विरोध नाही. आता नीरा-देवघरच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी खासदारांच्या चुकीमुळे याचे पाणी फलटण तालुक्याला न मिळता माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यांना मिळणार आहे. मोठ्या कष्टाने नीरा-देवघरचे जे धरण आम्ही तालुक्यासाठी बांधले, त्या तालुक्याला पाणी मिळत नसेल तर काहीच अर्थ राहणार नाही. सांगोल्याला पाणी देण्यास माझा विरोध नाही; मात्र फलटणची तहान भागून उरलेले पाणी त्यांना दिले तर हरकत नाही, या मताचा मी आहे. सांगोला तालुक्याचा दुष्काळ मिटावा म्हणून मी टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण करून सांगोला तालुक्याला पाणी दिलेले आहे, हे तेथील जनतेने विसरू नये.’..तर राजीनामा देऊन विधानसभा लढवावीनीरा-देवघरचे कालव्याचे काम रखडल्याने धोम-बलकवडीचे कालव्याचे काम पूर्ण करून दुष्काळी पट्ट्यात पाणी आणले. या पाण्याच्या जोरावरच खासदार रणजितसिंहांचा स्वराज आणि शरयू हे कारखाने उभे राहिले आहेत, हे विसरू नये. दिशाभूल करून राजकारण करण्याचा आणि आरोप करण्याचा प्रकार खासदार रणजितसिंह यांच्याकडून सतत सुरू असून, हिंमत असेल तर रणजितसिंहांनी राजीनामा देऊन विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवावी, आम्हीही लढवितो. बघूया येथील जनता कोणाला साथ देते, असे आव्हान रामराजे यांनी दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर