शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

Rajya Sabha Election: सातारा जिल्ह्यातील आघाडीच्या आमदारांनी गाठली मुंबई, दोन्हींकडे हात ठेवणाऱ्यांची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:18 IST

अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांवर निवडणुकीचे गणित अधिक पटीने अवलंबून राहणार आहे.

सातारा : राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होत असून भाजप आणि महाविकास आघाडीने सहावी जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे घोडेबाजार व इतर राजकीय घडामोडी टाळण्यासाठी आघाडीने अधिक दक्षता घेतली आहे. यातूनच जिल्ह्यातील आघाडीचे मंत्री आणि आमदारांनी बॅग भरून मुंबई गाठली. तर भाजपचे आमदारही तयारीने पोहोचत आहेत. शिवसेना आणि भाजप असे दोन्ही डगरीवर हात ठेवणाऱ्यांची मात्र गोची झाली आहे.राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेने खासदार संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादीने माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली. काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना उतरवले आहे. वास्तविक पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बैठक झाली. पण, त्यामधून काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे निवडणूक अटीतटीवर आली.  राज्यसभा निवडणुकीतील मतांचे गणित पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक, भाजपचे दोघेजण मतांच्या कोट्यानुसार निवडून येऊ शकतात. सहाव्या जागेसाठी खरी चुरस आहे. शिवसेनेने संजय पवार यांच्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर भाजपनेही धनंजय महाडिक यांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. रस्सीखेचात राजकीय घडामोडी आणि आमदारांना गळाला लावण्याचे काम होऊ नये यासाठी महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतलाय.आघाडीतील आमदारांना मुंबईत बोलवून घेतले. पक्ष आदेशानुसार  सातारा जिल्ह्यातून पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण हे मुंबईला पोहोचले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ही गेले आहेत. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांनीही मुंबई गाठली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही मुंबईकडे रवाना होणार आहेत.निवडणूक लागल्यापासून सतत चर्चा...राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सतत चर्चा सुरू आहे. सुरुवातीला संभाजीराजे छत्रपती यांच्या निर्णयावरून सुरुवात झाली. भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली नाही, तर शिवसेनेने पक्षप्रवेश केल्यानंतर उमेदवारी देऊ असे स्पष्ट केले; पण त्यांनी नकार दिला. यामुळे भाजपने शिवसेनेवर टीका केली. ही चर्चा संपते तोच शिवसेनेने दुसरा उमेदवार म्हणून कोल्हापूरच्या संजय पवार यांना पसंदी दिली. हे पाहून भाजपनेही राजकीय खेळी करतानाच तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांच्या रूपाने जाहीर केला.महाडिक हेही कोल्हापूरचेच. त्यामुळेही चर्चा रंगली. आता तर सहावी जागा पदरात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार तयारी केली आहे. खासकरून शिवसेनेने आपल्या सर्वच आमदारांना दोन दिवसांपूर्वीच मुंबईत बोलवून घेतले आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदारही मुंबईत पोहोचलेत.

आमदार हॉटेलात; अपक्षावर खरा खेळ !  शिवसेनेचे आमदार मुंबईतील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यांच्यावर शिवसैनिकांचं लक्ष आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपही आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी असताना या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांवर निवडणुकीचे गणित अधिक पटीने अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी