शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

'स्वाभिमानी'चे राजू शेळके एजंट, बिनविरोध निवडणुकीसाठी संपर्क केलेला - विक्रम पवार 

By नितीन काळेल | Updated: April 28, 2023 19:22 IST

एजंटगिरीशिवाय त्यांनी काही केले नाही

सातारा : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके हे १०० टक्के एजंट आहेत. एजंटगिरीशिवाय त्यांनी कोणताही धंदा केला नाही. बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी किती रुपये देणार, असा निरोप त्यांनी दिला होता,’ असा दावा माजी सभापती विक्रम पवार यांनी केला आहे. सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार यांनी सातारा बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.विक्रम पवार म्हणाले, ‘सातारा बाजार समितीची निवडणूक होत आहे. यासाठी आमचे सत्ताधारी गटाचे अजिंक्यतारा पॅनेल उभे आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके यांनी विक्रम पवार यांनी मोठ्या प्रमाणात पापं केल्याची टीका केली आहे. पण, मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढून साडेसतरा एकर जमीन मिळविली. ही जागा बाजार समितीच्या नावावर करून विक्रम केलाय. राजू शेळके हे तर १०० टक्के एजंट माणूस आहे. त्यांच्याबाबत माहिती घेतल्यास बरेच काही लक्षात येईल.बाजार समिती निवडणुकीपूर्वी शेळके यांनी कोणामार्फत तरी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निरोप दिला होता. चर्चा केली होती, असे सांगून विक्रम पवार पुढे म्हणाले, ‘सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. शेतकऱी बसतात तेथे पेव्हर ब्लाॅक, महिलांसाठी शाैचालय, ग्रामीण भागातील मुलांसाठी अभ्यासिका सुरू केली आहे.अनेकांच्या पोटात दुखत आहे...अनेक लोकांच्या पोटात दुखत आहे. दुसऱ्याच्या पोटात आहे तेच राजू शेळके यांच्या ओठातून बाहेर पडले आहे. पण, आताच्या निवडणुकीत त्यांची कपबशी फुटणार आहे. कारण, आम्ही चांगलं काम केलं हेच मतदानानंतर दिसून येईल, असा दावाही विक्रम पवार यांनी केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजारElectionनिवडणूकSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना