शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

सातारा जिल्'ातील पेरणीवर पावसाचा परिणाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:42 IST

दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाची पेरणी सुरू होते. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर रब्बीला सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी सुरू होते.

सातारा : यावर्षी सततचा आणि नोव्हेंबर महिन्यामध्येही झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्'ातील रब्बी पेरणी पुढे गेली. त्यामुळे आतापर्यंत फक्त ७० टक्केच पेरणी झालीय. तर गतवर्षी ८० टक्केहून अधिक पेरणी झालेली. यावर्षी ज्वारीच्या क्षेत्रात घट होत असून, आतापर्यंत फक्त ७५ टक्केच पेरणी झाली आहे. तर यापुढे गहू, हरभऱ्यालाच शेतकरी पसंती देऊ शकतात.

दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाची पेरणी सुरू होते. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर रब्बीला सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी सुरू होते. यंदा मात्र पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीचे संपूर्ण चित्रच पालटलंय. कारण, यावर्षी जुलै महिन्यापासून पश्चिम भागात सतत पाऊस सुरू झाला. तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत होत होता. तसेच पूर्व भागात तर सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला जोरदार सुरुवात झाली.

हा परतीचा पाऊस आॅक्टोबर महिन्यापर्यंत सतत कोसळत होता. या पावसाने गेल्या दहा वर्षांतील उच्चांक गाठला. त्यातच दिवाळीनंतरही नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने चांगलाच दणका दिला. त्यामुळे जमिनीत पाणी साठले. परिणामी आगाऊ पेरणी केलेलीही वाया गेली. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.

जिल्'ातील शेतकऱ्यांनी ख-या अर्थाने रब्बी हंगामाची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात सुरू केली. त्यामुळे पेरणीला उशीर होऊ लागलाय. काही ठिकाणी ज्वारीची दुबार पेरणी झालीय. सध्या जिल्'ात रब्बी हंगामाची पेरणी जवळपास ७० टक्के झालीय. रब्बीचे क्षेत्र २ लाख १४ हजार ८२३ हेक्टर असलेतरी आतापर्यंत १ लाख ५० हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे. त्यामध्ये ज्वारीची पेरणी ७५ टक्के, गहू ५५, मका ६८, हरभरा ६२ टक्के अशी प्रमुख पिकांची पेरणीची टक्केवारी राहिलीय.

जिल्'ात सर्वात जास्त रब्बीचे क्षेत्र माण तालुक्यात २८ हजार ८५५ हेक्टर असून, आतापर्यंत येथे २५ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झालीय. यापुढे ज्वारीची पेरणी होण्याची शक्यता कमी आहे. खटावला २२ हजार हेक्टर क्षेत्र असलेतरी पेरणी फक्त ८ हजार ६०० हेक्टरवरच झालीय. फलटणला २१ हजारपैकी १६ हजार हेक्टर ज्वारीची पेरणी झाल्याचे दिसून आले आहे.

जिल्'ाचा विचार करता सातारा तालुक्यात आतापर्यंत ५५ टक्के पेरणी झालीय. तसेच जावळीत ६४ टक्के, पाटण ७६, क-हाड ५७, कोरेगाव ७७, खटाव ४७, माण तालुका ९०, फलटण ६९, खंडाळा ७४, वाई ८३ टक्के पेरणी झाली आहे. तर महाबळेश्वर तालुक्यात रब्बीचे क्षेत्र ६४८ हेक्टर असून, पेरणी १०० टक्के झाली आहे. रब्बीची पेरणी अजूनही सुरू असून, यापुढे गहू, हरभरा, मका पिकालाच शेतकरी पसंती देतील, असेच चित्र आहे. तसेच इतर पिकांचाही त्यांच्यापुढे पर्याय आहे.सर्वच पिकांची यंदा पेरणी टक्केवारी कमी...गतवर्षी १९ डिसेंबरपर्यंत जिल्'ात रब्बीची पेरणी जवळपास ८० टक्के झालेली. यामध्ये ज्वारीची ८२ टक्के, गहू ६२, हरभरा ७७ टक्के क्षेत्रावर होता. रब्बीतील या तिन्ही प्रमुख पिकांची चांगली पेरणी झालेली. यावर्षी मात्र या तिन्ही पीक पेरणीत घट झाली आहे. तसेच गतवर्षीपेक्षा यंदा सर्वच पीक पेरणी कमी झाल्याचेच दिसून येत आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीRainपाऊस