शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

पश्चिमेकडे पाऊस; पूर्वेकडे टॅंकरचा धुरळा; सातारा जिल्ह्यातील स्थिती 

By नितीन काळेल | Updated: July 11, 2023 17:37 IST

जिल्ह्यात ५७ गावे अन् २७१ वाड्यांना कोरड

सातारा : जिल्ह्यात पश्चिम भागात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरू असून पूर्व दुष्काळी भागात मात्र प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात अजूनही टॅंकर सुरू आहे. विशेष करुन माणमधील स्थिती गंभीर असून जवळपास निम्मा तालुका तहानलाय. तर जिल्ह्याचा विचार करता ५७ गावे आणि २७१ वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहे.जिल्ह्यात मागील चार वर्षे धुवाॅंधार पाऊस झाला. त्यातच जलसंधारणाची कामे झाल्याने पाणी अडले. त्यामुळे दुष्काळी भागातही टंचाईची स्थिती फारशी जाणवली नाही. यंदा मात्र, उन्हाळी पाऊस कमी झाले. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही उशिरा दाखल झाला. तरीही या पावसात म्हणावा असा जोर नाही. पश्चिम भागातच आतापर्यंत बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. मात्र, दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पर्जन्यमान कमी राहिले. परिणामी अजूनही अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकर धुरळा उडवत फिरत आहेत.जिल्ह्यात अजूनही पाऊस मोठ्या प्रमाणात झाला नाही. त्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली आहे. यापुढे आणखी काही दिवस पाऊस झाला नाहीतर टॅंकरच्या संख्येत वाढ होऊ शकतो. अधिक करुन माण तालुक्यात टंचाई वाढण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीRainपाऊस