शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
3
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
4
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
5
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
6
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
7
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
8
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
9
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
10
पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्त्वाची माहिती
11
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
12
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
14
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
15
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
16
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
17
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
18
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
19
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
20
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे चक्र बदलले, पेरणीचे नियोजन बिघडले; सातारा जिल्ह्यात शेकडो हेक्टर क्षेत्र नापेरची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:33 IST

अंतिम टप्प्यातील पेरणी सुरूच

सातारा : पावसाचे चक्र बदलल्याने यावर्षी जिल्ह्यात मे आणि जूनमध्ये ही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे वेळेत वाफसा न आल्याने खरीप पेरणीवर परिणाम झाला. त्यातच आता ऑगस्ट महिना सुरू असला तरी अंतिम टप्प्यातील पेरणी सुरूच आहे. सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर पेर पूर्ण झालेली आहे. याचे प्रमाण ९१ टक्के आहे. तरीही यावर्षी शेकडो हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची ही शक्यता आहे.जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जातो. यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ९७ हजार ९१३ हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ९२ हजार ८७५ हेक्टर आहे. तर भाताचे ४७ हजार ४९२, खरीप ज्वारी ६ हजार, बाजरीचे ५० हजार ३५१, मका पिकाचे १३ हजार १५३, भुईमूग ३१ हजार हेक्टर राहण्याचा अंदाज होता तसेच इतर पिकांचे क्षेत्र कमी प्रमाणात आहे; पण यावर्षी पाऊस वेळेत झाला; पण सतत पाऊस असल्याने पेरणीसाठी वेळेत वाफसा आलाच नाही. त्यामुळे पेरणी पुढे गेली. आता तर ऑगस्ट महिना सुरू आहे. त्यामुळे खरिपातील पेरणी १०० टक्के होण्याची शक्यता कमी आहे.खरिपात आतापर्यंत भाताची सुमारे ४२ हजार हेक्टरवर लागण झालेली आहे. हे ८८ टक्के प्रमाण आहे. खरीप ज्वारीची ८५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीची सुमारे ३७ हजार हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. ७३ टक्के ही पेर आहे. पेरणीची वेळ निघून गेल्याने यंदाही बाजरीचे क्षेत्र कमीच राहणार आहे. मका पिकाची २६ हजार ७१२ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. २०३ टक्के ही पेर आहे. तसेच अजूनही मका पिकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. भुईमुगाची २५ हजार २७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ८२ टक्के हे प्रमाण आहे.जिल्ह्यात मागील तीन वर्षांत सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे. यावर्षी आतापर्यंत सुमारे ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. ८६ टक्के पेरणी पूर्ण आहे. तसेच तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफूल या पिकाखालील क्षेत्र कमी आहे.

फलटण तालुक्यात १०७ टक्के पेरणी पूर्ण..जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात आहे. सध्या जिल्ह्याच्या पश्चिम डोंगराळ भागात भात लागण सुरू आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक १०७ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तर सातारा तालुक्यात ७७ टक्के, जावळी तालुक्यात ८० टक्के, पाटण ७८, कऱ्हाड ९२, कोरेगाव ९०, खटाव १०६, माण १०३, खंडाळा १०२, वाई ८८ आणि महाबळेश्वर तालुक्यात ८४ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. माण, खटाव, फलटण, खंडाळा या तालुक्यात बाजरी पिकाचे क्षेत्र घटले आहे.