शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे चक्र बदलले, पेरणीचे नियोजन बिघडले; सातारा जिल्ह्यात शेकडो हेक्टर क्षेत्र नापेरची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:33 IST

अंतिम टप्प्यातील पेरणी सुरूच

सातारा : पावसाचे चक्र बदलल्याने यावर्षी जिल्ह्यात मे आणि जूनमध्ये ही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे वेळेत वाफसा न आल्याने खरीप पेरणीवर परिणाम झाला. त्यातच आता ऑगस्ट महिना सुरू असला तरी अंतिम टप्प्यातील पेरणी सुरूच आहे. सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर पेर पूर्ण झालेली आहे. याचे प्रमाण ९१ टक्के आहे. तरीही यावर्षी शेकडो हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची ही शक्यता आहे.जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जातो. यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ९७ हजार ९१३ हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ९२ हजार ८७५ हेक्टर आहे. तर भाताचे ४७ हजार ४९२, खरीप ज्वारी ६ हजार, बाजरीचे ५० हजार ३५१, मका पिकाचे १३ हजार १५३, भुईमूग ३१ हजार हेक्टर राहण्याचा अंदाज होता तसेच इतर पिकांचे क्षेत्र कमी प्रमाणात आहे; पण यावर्षी पाऊस वेळेत झाला; पण सतत पाऊस असल्याने पेरणीसाठी वेळेत वाफसा आलाच नाही. त्यामुळे पेरणी पुढे गेली. आता तर ऑगस्ट महिना सुरू आहे. त्यामुळे खरिपातील पेरणी १०० टक्के होण्याची शक्यता कमी आहे.खरिपात आतापर्यंत भाताची सुमारे ४२ हजार हेक्टरवर लागण झालेली आहे. हे ८८ टक्के प्रमाण आहे. खरीप ज्वारीची ८५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीची सुमारे ३७ हजार हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. ७३ टक्के ही पेर आहे. पेरणीची वेळ निघून गेल्याने यंदाही बाजरीचे क्षेत्र कमीच राहणार आहे. मका पिकाची २६ हजार ७१२ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. २०३ टक्के ही पेर आहे. तसेच अजूनही मका पिकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. भुईमुगाची २५ हजार २७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ८२ टक्के हे प्रमाण आहे.जिल्ह्यात मागील तीन वर्षांत सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे. यावर्षी आतापर्यंत सुमारे ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. ८६ टक्के पेरणी पूर्ण आहे. तसेच तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफूल या पिकाखालील क्षेत्र कमी आहे.

फलटण तालुक्यात १०७ टक्के पेरणी पूर्ण..जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात आहे. सध्या जिल्ह्याच्या पश्चिम डोंगराळ भागात भात लागण सुरू आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक १०७ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तर सातारा तालुक्यात ७७ टक्के, जावळी तालुक्यात ८० टक्के, पाटण ७८, कऱ्हाड ९२, कोरेगाव ९०, खटाव १०६, माण १०३, खंडाळा १०२, वाई ८८ आणि महाबळेश्वर तालुक्यात ८४ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. माण, खटाव, फलटण, खंडाळा या तालुक्यात बाजरी पिकाचे क्षेत्र घटले आहे.