शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
4
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
5
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
6
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
7
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
8
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
9
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
10
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
11
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
12
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
13
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
14
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
16
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
17
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
18
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
19
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
20
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?

पावसाने काढलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं दिवाळं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 18:07 IST

सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी भलतेच पेचात सापडले आहेत. आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील गाळप योग्य असणारा २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस साठलेल्या पाण्यात तरंगत आहे.

ठळक मुद्देहंगाम लांबण्याची भीती २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस पाण्याखाली

सागर गुजरसातारा : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी भलतेच पेचात सापडले आहेत. आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील गाळप योग्य असणारा २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस साठलेल्या पाण्यात तरंगत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं दिवाळं काढलं आहे. शेतामध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने कारखान्याला ऊस केव्हा जाणार ? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.सातारा जिल्ह्यामध्ये गाळप योग्य उसाचे ८० हजार २१४ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाले आहे. कृषी खात्याने नजरअंदाजे याचे अनुमान काढले आहे. अजून पंचनामे चालू आहेत, त्यामुळे नंतर तोडणीयोग्य झालेल्या उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान लक्षात येणार आहे. उसाच्या आधारावर आर्थिक व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाने काही उसंत दिलेली नाही. ऊस तोडणीची लगबग दोन कारणाने थांबलेली आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय, त्यामुळे शेतामध्ये चिखलाचे साम्राज्य आहे, दुसऱ्या बाजूला साखर कारखान्यांना अद्यापही गाळप परवाने मिळाले नाहीत.दरम्यान, जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस गाळप परवाना मिळवण्यासाठी सप्टेंबर महिन्यातच साखर आयुक्तांना प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु मंत्री समितीची बैठकच झाली नसल्याने या प्रस्तावांना मंजुरी मिळालेले नाही. जरी गाळपाचे परवाने मिळाले असते तरी कोसळत्या पावसात शेतामधून कारखान्याला ऊस देणे सोपे नव्हते.

साहजिकच मंत्री समितीची बैठक होऊन जरी परवाने मिळाले असते तरी ऊस वाहतुकीमध्ये किंवा ऊस तोडणीमध्ये पावसाचा व्यत्यय आलाच असता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये यंदा उसाचा हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल, असा अंदाज आहे. गतवर्षी उसाची लागवड घटल्याने मार्चअखेरपर्यंत हंगाम संपला. यात वाढ ऊसक्षेत्र असते तर कदाचित जून महिनाही यासाठी लागला असता, असा अंदाज साखर कारखानदार व्यक्त करतात.उसाचा गाळप हंगाम साधारणत: चौदा ते पंधरा महिन्यांपर्यंत चालतो. यंदा मात्र तो १४ ते १७ महिन्यांपर्यंत चालेल, अशी शक्यता आहे. उशिरा पक्व होणाऱ्या उसाला १४ ते १७ महिन्यांत तोडला तरी कुठलाही तोटा नसतो; परंतु १२ ते १५ महिन्यांत परिपक्व होणाऱ्या उसाला तेवढ्याच कालावधीत तोडणे गरजेचे असते, अन्यथा उशिरा तोड झाली तर उसाच्या वजनात घट येते. साखर उत्पादनातही घट येते. त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या रिकव्हरीवर प्रतिकूल असा होतो. साहजिकच उशिरा पक्व होणाऱ्या उसाचे चांगले वजन वाढले तर लवकर पक्व होणारा ऊस वजनात घटेल, अशी परिस्थिती आहे.दरम्यान, सातारा जिल्ह्यातील ऊसतोडीसाठी अहमदनगर, मराठवाडा, विदर्भ या भागातून ऊस मजूर येतात. यंदा त्या भागातही उसाचे उत्पादन घटले असल्याने जिल्ह्यातील ऊस कारखान्यांना मजुरांचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या त्यांच्या भागात रब्बीच्या पेरणीमध्ये हे मजूर गुंतलेले आहेत. या पेरण्या संपल्या की मजुरांच्या टोळ्या सातारा जिल्ह्यात दाखल होतील.शेतातल्या वाटांवर चिखलाचे साम्राज्यपावसाने अद्याप उसंत दिलेली नाही. ऊसतोडीची वेळ आली, तरीदेखील पाऊस पडत असल्याने शेतातल्या वाटांवर चिखलाचे साम्राज्य आहे. या परिस्थितीमध्ये शेतातून ऊस बाहेर कसा काढायचा, हाही प्रश्न सतावत आहे. 

ऊस उत्पादक शेतकऱ्याचे आधीच पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ऊस पावसाच्या पाण्यात पडल्याने उसाचे डोळे फुटले. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. आम्ही शेतकऱ्यांचे कुठल्याही परिस्थितीत नुकसान होऊ देणार नाही. सगळ्या उपलब्ध असलेल्या उसाची तोड केली जाणार आहे.- एस. एन. दळवीकार्यकारी संचालक कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बुद्र्रुक, कऱ्हाड 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर