शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा : शिवेंद्रसिंहराजे

By admin | Updated: November 11, 2015 00:16 IST

जावळी तालुका : वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

सातारा: ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जावळी तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, कुसापूर, खिरखंडी आदी गावांचा समावेश होत आहे. येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सर्व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा आग्रहाने विचार करून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा,’ अशी सूचना सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रमुख एम. एस. पंडितराव यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळी तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी राम पवार, नामदेव जाधव, रामचंद्र कोकरे, किसन सपकाळ, रामचंद्र जाधव, आनंद कदम, आनंद जाधव, विशाल भोसले, यशवंत आगुंडे, अशोक मुसळे, नारायण शेलार उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने या सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यात करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र शासन केवळ ६३ खातेदारांचे पुनर्वसन करत असून, उर्वरित ५७ खातेदारांवर अन्याय करत असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणे ही शासनाची आणि वनविभागाची जबाबदारी आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार संबंधित ६३ प्रकल्पग्रस्तांचे आणि भूमिहीन लोकांचे ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन करावे. जे प्रकल्पग्रस्त परजिल्ह्यातील आहेत अशा खातेदारांचे त्या-त्या जिल्ह्यात पुनर्वसन करावे आणि जावळी तालुक्यातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात करावे,’ अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. (प्रतिनिधी)