शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा : शिवेंद्रसिंहराजे

By admin | Updated: November 11, 2015 00:16 IST

जावळी तालुका : वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

सातारा: ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जावळी तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, कुसापूर, खिरखंडी आदी गावांचा समावेश होत आहे. येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सर्व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा आग्रहाने विचार करून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा,’ अशी सूचना सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रमुख एम. एस. पंडितराव यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळी तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी राम पवार, नामदेव जाधव, रामचंद्र कोकरे, किसन सपकाळ, रामचंद्र जाधव, आनंद कदम, आनंद जाधव, विशाल भोसले, यशवंत आगुंडे, अशोक मुसळे, नारायण शेलार उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने या सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यात करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र शासन केवळ ६३ खातेदारांचे पुनर्वसन करत असून, उर्वरित ५७ खातेदारांवर अन्याय करत असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणे ही शासनाची आणि वनविभागाची जबाबदारी आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार संबंधित ६३ प्रकल्पग्रस्तांचे आणि भूमिहीन लोकांचे ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन करावे. जे प्रकल्पग्रस्त परजिल्ह्यातील आहेत अशा खातेदारांचे त्या-त्या जिल्ह्यात पुनर्वसन करावे आणि जावळी तालुक्यातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात करावे,’ अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. (प्रतिनिधी)