शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा : शिवेंद्रसिंहराजे

By admin | Updated: November 11, 2015 00:16 IST

जावळी तालुका : वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

सातारा: ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जावळी तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, कुसापूर, खिरखंडी आदी गावांचा समावेश होत आहे. येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सर्व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा आग्रहाने विचार करून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा,’ अशी सूचना सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रमुख एम. एस. पंडितराव यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळी तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी राम पवार, नामदेव जाधव, रामचंद्र कोकरे, किसन सपकाळ, रामचंद्र जाधव, आनंद कदम, आनंद जाधव, विशाल भोसले, यशवंत आगुंडे, अशोक मुसळे, नारायण शेलार उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने या सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यात करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र शासन केवळ ६३ खातेदारांचे पुनर्वसन करत असून, उर्वरित ५७ खातेदारांवर अन्याय करत असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणे ही शासनाची आणि वनविभागाची जबाबदारी आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार संबंधित ६३ प्रकल्पग्रस्तांचे आणि भूमिहीन लोकांचे ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन करावे. जे प्रकल्पग्रस्त परजिल्ह्यातील आहेत अशा खातेदारांचे त्या-त्या जिल्ह्यात पुनर्वसन करावे आणि जावळी तालुक्यातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात करावे,’ अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. (प्रतिनिधी)