शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा : शिवेंद्रसिंहराजे

By admin | Updated: November 11, 2015 00:16 IST

जावळी तालुका : वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

सातारा: ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जावळी तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, कुसापूर, खिरखंडी आदी गावांचा समावेश होत आहे. येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सर्व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा आग्रहाने विचार करून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा,’ अशी सूचना सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रमुख एम. एस. पंडितराव यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळी तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी राम पवार, नामदेव जाधव, रामचंद्र कोकरे, किसन सपकाळ, रामचंद्र जाधव, आनंद कदम, आनंद जाधव, विशाल भोसले, यशवंत आगुंडे, अशोक मुसळे, नारायण शेलार उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने या सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यात करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र शासन केवळ ६३ खातेदारांचे पुनर्वसन करत असून, उर्वरित ५७ खातेदारांवर अन्याय करत असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणे ही शासनाची आणि वनविभागाची जबाबदारी आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार संबंधित ६३ प्रकल्पग्रस्तांचे आणि भूमिहीन लोकांचे ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन करावे. जे प्रकल्पग्रस्त परजिल्ह्यातील आहेत अशा खातेदारांचे त्या-त्या जिल्ह्यात पुनर्वसन करावे आणि जावळी तालुक्यातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात करावे,’ अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. (प्रतिनिधी)