शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाचा प्रश्न : पस्तीस वर्षांपासून शासनाकडून चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 15:24 IST

Government Satara- सह्याद्रीच्या कोअर झोनमधील आणि सातारा, सांगली व रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या मळे, कोळणे आणि पाथरपुंज या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ३५ वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत शासनाकडून होत असलेल्या वेळकाढूपणाचा व दिरंगाईचा पुनर्वसन कृती संघर्ष समितीच्यावतीने जाहीर निषेध केला आहे.

ठळक मुद्देपुनर्वसनाचा प्रश्न : पस्तीस वर्षांपासून शासनाकडून चालढकलमळे, कोळणे, पाथरपुंजचे ग्रामस्थ करणार आंदोलन

रामापूर : सह्याद्रीच्या कोअर झोनमधील आणि सातारा, सांगली व रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या मळे, कोळणे आणि पाथरपुंज या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ३५ वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत शासनाकडून होत असलेल्या वेळकाढूपणाचा व दिरंगाईचा पुनर्वसन कृती संघर्ष समितीच्यावतीने जाहीर निषेध केला आहे.दरम्यान, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती पुनर्वसन कृती संघर्ष समितीच्यावतीने पाटण येथे देण्यात आली. यावेळी संजय कांबळे, दीपक कांबळे, संजय पवार यांची उपस्थिती होती.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत पाटण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ ठिकाणी वसलेल्या आणि चांदोली अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात येणाऱ्या मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न १९८५ सालापासून प्रलंबित आहे. ५ जानेवारी २०१० रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाली.

चांदोली राष्ट्रीय उद्यान घोषीत केले. १९९३ साली या तिन्ही गावांचा समावेश चांदोली अभयारण्यात झाल्याचे स्थानिकांना समजले. त्यानंतर २०१६ साली गाभा क्षेत्रात ही गावे समाविष्ट झाली. या तिन्ही गावात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. दरवर्षी पुर्वसनाच्या कामासाठी प्रत्येक जून महिन्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येते. आणि दिवाळीनंतर पुन्हा प्रकल्पग्रस्तांकडे दुर्लक्ष केले जाते.पुनर्वसनासाठी ओसाड, माळरान आणि खडकाळ जमिनी वन ्रविभागाकडून या ग्रामस्थांना दाखविल्या जातात. आणि प्रकल्पग्रस्त जमिनी स्वीकारत नसल्याचा कांगावा केला जातो. येथील ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो. मात्र गाभा क्षेत्राचे कारण देत वनविभागाकडून ती कामे करण्यात आडकाठी केली जाते.

मळे, कोळणे व पाथरपुंज या गावातील काही प्रकल्पग्रस्तांनी जागा पसंत केल्या आहेत. तेथील जमिनीचे क्षेत्र कमी असल्याने सरसकट पुनर्वसन होऊ शकत नाही. तेथील ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव देत नाही. तर दुसरीकडे गावाने पसंत केलेल्या जमिनीसाठी शासन ग्रामसभेचे ठराव मागत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत.तिन्ही गावातील ग्रामस्थांच्या मागण्या१) तिन्ही गावांच्या पुनर्वसनासाठी बाधितांना पसंत असलेल्या जमिनी तात्काळ देऊन ठराव व हरकतीही शासनाने घ्याव्यात.२) संकलन यादीतील सर्व त्रुटी व दुरुस्ती यंत्रणेने आंदोलनस्थळी कराव्यात. ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या मुला-मुलींना स्वतंत्र लाभार्थी म्हणून नव्याने संकलन यादीत घ्यावे.३) डिसेंबर २०२० पर्यंत ग्रामपंचायत दप्तरी व तलाठी कार्यालयात असलेल्या सर्व नोंदी ग्राह्य मानून संकलनाची पुरवणी यादी तात्काळ तयार करावी.४) प्रकल्पबाधितांना बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा. तिन्ही गावातील शिल्लक राहिलेल्या खातेदारांचे मूल्यांकन करावे.

घटनेने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येक नागरिकाला नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्या मागुनही मिळत नसतील तर असले उपेक्षित आणि वंचिताचे जगणे जगण्यापेक्षा राज्याच्या राज्यपालांनी आमचे रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड स्वीकारून नागरिकत्वच रद्द करावे.- संजय पवार,प्रकल्पग्रस्त

टॅग्स :GovernmentसरकारSatara areaसातारा परिसर