शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सातारा जिल्ह्यात गावकारभा-यांना धक्का !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 12:09 IST

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागत असून अनेक ठिकाणी परिवर्तन झाले आहे. माण तालुक्यातील मलवडीत दोन्ही गोरे बंधुंना धक्का देत अपक्ष उमेदवाराने सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिरवळमध्येही भाजपच्या लक्ष्मी पानसरे विजयी झाल्या असून भुर्इंजमध्ये काँग्रेसने गड राखला आहे. वरकुटे मलवडीत भाजपच्या उमेदवारांचा झेंडा फडकला आहे.

ठळक मुद्देशिरवळमध्ये भाजपचं कमळ फुललं..मलवडीत गोरे बंधुंना सारुन अपक्षाचा विजय किकलीत २५ वर्षांनंतर सत्तांतर

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागत असून अनेक ठिकाणी परिवर्तन झाले आहे. माण तालुक्यातील मलवडीत दोन्ही गोरे बंधुंना धक्का देत अपक्ष उमेदवाराने सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिरवळमध्येही भाजपच्या लक्ष्मी पानसरे विजयी झाल्या असून भुर्इंजमध्ये काँग्रेसने गड राखला आहे.  माण तालुक्यात महिमानगडमध्ये राष्ट्रवादीच्या संगिता मदने सरपंच म्हणून विजयी झाल्या असून राष्ट्रवादीने ही ग्रामपंचायत राखली आहे. तसेच पाचवड, मनकर्णवाडी, पांढरवाडी याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. वावरहिरे, परकंदी, कासारवाडी, खुटबाव, महाबळेश्वरवाडी, नरवणे आदी गावांत काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. आंधळीत काँग्रेसच्या मिनाक्षी काळे विजयी झाल्या आहेत. पांगरीत काँग्रेसचे दिलीप आवळे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले आहेत. शिरवळमध्ये राष्ट्रवादीची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली असून भाजपच्या लक्ष्मी पानसरे सरपंच म्हणून निवडल्या गेल्या आहेत. तसेच आसवलीमध्येही सत्तांतर झाले आहे. भुर्इंजमध्ये काँग्रेसला नऊ तर राष्ट्रवादीला पाच जागा सुरूवातीच्या टप्प्यात मिळाल्या आहेत. कवठेत राष्ट्रवादी सहा तर काँग्रेस पाच तर श्रीकांत वीर सरपंचपदी विराजमान झाले आहेत.  काळंगवाडीत सरपंचपदासाठी समान मते पडली असून काँग्रेस व इतर पाच जागांवर असून राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. किकलीमध्ये भाजपसह इतर जवळपास इतर नऊ जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादीला २५ वर्षांनंतर प्रथमच पराभव पत्करावा लागला आहे. खटाव तालुक्यात खातवळ येथे शिवसेनेच्या रेखा फडतरे सरपंच झाल्या असून राजाचे कुर्लेमध्ये समरजित राजेभोसले विजयी झाले आहेत. ललगुणमध्ये काँग्रेस-भाजपचे जयवंत गोसावी यांना गुलाला लागला आहे. तसेच फलटण तालुक्यात पिंपरद, ताथवडा अन् चव्हाणवाडीत काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. 

आदर्की खुर्दमध्ये सौरभ निंबाळकर सरपंच झाले असून संजय व दिवाकर निंबाळकर गटाला सहा तर विश्वासराव निंबाळकर गट तीन जागा मिळाल्या आहेत.