शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

लव्ह जिहाद, धर्मांतराविरोधात साताऱ्यात जनआक्रोश मोर्चा; लोकप्रतिनिधींसह शेकडोजण सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:34 IST

हिंदू धर्माची आस्था दुखविणारे अनेक प्रसंग देशभरात घडत आहेत. लव्ह जिहाद, गोवंश हत्या, धर्मांतरणाचे प्रकार होऊ लागलेत.

सातारा : लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या विरोधी कायदा राज्यासह देशात लागू करण्यात यावा, आदी प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने साताऱ्यात हिंदू जनआक्रोश भव्य मोर्चा काढण्यात आला. यामध्ये लोकप्रतिनिधींसह शेकडेजण सहभागी झाले होते. यावेळी विविध घोषणाबाजी करण्यात आली.साताऱ्यातील राजवाडा येथून हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. ५०१ पाटी, पोलिस मुख्यालय, पोवई नाका या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील शेकडो नागरिकांनी मोर्चात सहभाग घेतला. मोर्चेकरांच्या हातात विविध संदेश असणारे फलक होते. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा गेल्यानंतर सभेत रूपांतर झाले. तर यावेळी प्रमुख लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, हिंदू धर्माची आस्था दुखविणारे अनेक प्रसंग देशभरात घडत आहेत. लव्ह जिहाद, गोवंश हत्या, धर्मांतरणाचे प्रकार होऊ लागलेत. त्याचबरोबर देशातील महापुरुषांचाही वेळोवेळी अपमान होत असून, दिवसेंदिवस याचे प्रमाणत वाढतच चालले आहे. काही दिवसांपूर्वी आफताब पुनावाला या व्यक्तीने हिंदू भगिनीची हत्या करून मृतदेहाचे ३५ हून अधिक तुकडे केलेत. ही घटना अतिशय निंदनीय अशी आहे. अशा धर्मांध विकृतींवर कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.

सभेत मान्यवरांचे मार्गदर्शन...जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकरांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी चुकीच्या प्रकाराविरोधात सर्वांनी एकत्र यावे. तसेच चुकीच्या घटनांसाठी बाहेरील देशातून पैसा येत आहे. देशाचे तुकडे होऊ नयेत, यासाठी एकसंध राहावे, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरLove Jihadलव्ह जिहादHinduहिंदू