शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नरेंद्र मोदी यांच्या दहशतीला पुरोगामी महाराष्ट्र बळी पडणार नाही - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 12:31 IST

'अभ्यास न करता घाईत लागू केलेल्या योजनांची अंमलबजावणी फसते'

सातारा : ‘जळी स्थळी चारसो पारचा नारा दिल्यानंतर ते साध्य करणे नरेंद्र मोदी सरकारला शक्य झालं नाही. याचे कारण म्हणजे दहशतीला पुरोगामी महाराष्ट्र कधीही बळी पडला नाही व पडणार नाही. लोकशाही देशांमध्ये दडपशाहीला कुठेही स्थान नाही हे आगामी निवडणुकीतही अधिक स्पष्ट होईल’, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.जकातवाडी, ता. सातारा येथे मंगळवारी भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, ‘उपराकार’ लक्ष्मण माने उपस्थित होते.पवार म्हणाले, 'राज्य शासनाने विविध योजना जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. शासकीय पातळीवर योजना राबविताना त्याच्या निधीच्या तरतुदीबाबत आवश्यक असलेले गांभीर्य विद्यमान सरकारकडे नाही. परिणामी, अंदाजपत्रक मंजूर न करता जाहीर करण्यात आलेल्या या योजना भविष्यात फार काळ टिकतील, अशी शक्यता वाटत नाही. एकीकडे मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा करताना दुसरीकडे त्यासाठी निधीची तजवीज हा मोठा प्रश्न असणार आहे.’बहिणीला मदत करा म्हणजे झालं!घरातल्या लाडक्या बहिणीशी वितुष्ट घेऊन बाहेरील बहिणींना लाडकी करण्याचा या सरकारचा डाव विधानसभेला उपयुक्त ठरेल काय, या प्रश्नावर ‘कोणाच्या का असेना बहिणीला मदत करा म्हणजे झालं,’ असा टोला शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.

साम्य असलेल्या चिन्हामुळेच काही ठिकाणी पराभवतुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रंपेट या निवडणूक चिन्हातील साधर्म्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. राज्यात काही ठिकाणी त्यातही नाशिक आणि सातारा या दोन्ही ठिकाणी हे प्रकर्षाने जाणवल्याचे पवार यांनी सांगितले.त्यांचा अभ्यास खात्रीचाच!इंग्लंडहून येणारी वाघनखे खरी नसल्याचा दावा काही इतिहास संशोधकांनी केला आहे, याबाबत विचारले असता, पवार म्हणाले, ‘इतिहास संशोधक आपल्या अभ्यासाच्या आणि उपलब्ध कागदपत्रांच्या जोरावर याविषयी बोलत आहेत. त्यांच्या अभ्यासावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या दाव्यात तथ्य नसेल, तर त्याबाबत ऊहापोह होणे आवश्यक आहे.’

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी