शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वाईत पाहिला प्रा. संभाजीराव पाटणे यांनी १५ ऑगस्ट १९४७ चा आनंद अन् स्वातंत्र्यदिनाचा सूर्योदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:42 IST

स्वातंत्र्यदिनी घडलं वाईत देशभक्तीचं अभूतपूर्व दर्शन

मूळचे वाई येथील प्रा. संभाजीराव पाटणे हे (वय : ८९) साताऱ्यात वास्तव्याला आहेत. त्यांचा जन्म नोव्हेंबर १९३६ मध्ये झाला. त्यांचे बालपण व शिक्षण वाईत झाले. तेथेच त्यांनी देश स्वतंत्र झाल्याचा तो दिवस पाहिला. तेव्हा ते ११ वर्षांचे होते. त्यांनी जागविलेल्या स्वातंत्र्यादिनाच्या आठवणी, त्यांच्याच शब्दांत..सातारा : १५ ऑगस्ट १९४७ चा तो दिवस, अनेक वर्षांच्या संघर्षानंतर स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा वाईत अभूतपूर्व असा साजरा झाला. त्यासाठी मुलांनी रात्रभर कमानी उभारल्या होत्या. वाईत सकाळी भाजीमंडईत झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू झाला अन् देश गुलामगिरीतून मुक्त झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आले.वाईतील ११ नंबरच्या शाळेत आम्ही पाचवीमध्ये शिकत होते. स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्र सेवा दलाची वाई शाखा भरत होती. त्यात मी जात होतो. ३० ऑगस्ट १९४४ ला वडील सखाराम बळवंत पाटणे हे महात्मा गांधीजींना पाचगणीवरून वाईत घेऊन आले होते. त्या ठिकाणी प्रथम महात्मा गांधी यांचे दर्शन झाले. ब्राह्मो समाज संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांना पाहता आले. राष्ट्र सेवा दलात राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य, पारतंत्र्याची भूमिका, इंग्रजांची गुलामगिरी, पारतंत्र्याचे तोटे समजून आले.

१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री बाराच्या सुमारास देशाला स्वातंत्र्य मिळणार होते. तेव्हा आम्ही राहात असलेल्या परिसरात आमच्या पेक्षा मोठ्या मुलांनी कमानी उभारल्या. त्यासाठी अशोक व आंब्याच्या झाडाची पाने कमानीला लावण्यात आली होती. तसेच मुलांनी व ग्रामस्थांनी गावातील रस्ते स्वच्छ केले होते. सर्वत्र रांगोळी काढण्यात आलेली. १५ ऑगस्टच्या सकाळी भाजीमंडई या ठिकाणी झेंडावंदन ठरले होते. या झेंडावंदन कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक आप्पाशास्त्री सोहनी, काकासाहेब देवधर, रामभाऊ मेरूरकर, शंकरराव जेजुरीकर, तसेच स. ब. पाटणे हे उपस्थित होते.

आजही आठवणींनी ऊर भरून येतो..आमच्या शाळेतील मुलांना लिमलेटची गोळी, चॉकलेट आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आलेले. तसेच तेथे बिल्लेही विकायला आले होते. त्यावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे चित्र होते. त्याच वेळी वाईमध्ये सामुदायिकरीत्या जिलेबी तयार करूनही वाटण्यात आली होती. या आठवणींनी आजही ऊर भरून येतो. 

शिवरायांकडून स्वराज्याची ज्योत प्रज्वलित..देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. अनेकांचं रक्त सांडलं, काहींना घरेदारे सोडून भूमिगत व्हावं लागलं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे बीज छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसांच्या मनात प्रज्वलित केलेल्या स्वराज्याच्या ज्योतीत होते. या ज्योतीनेच स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटली. शिवरायांच्या स्वराज्याची प्रेरणा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी उपयुक्त ठरली.शब्दांकन - नितीन काळेल