शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
3
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
4
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
5
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
6
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
7
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
8
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
9
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
10
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
11
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
12
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
14
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
15
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
16
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
17
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
18
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
19
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
20
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वाईत पाहिला प्रा. संभाजीराव पाटणे यांनी १५ ऑगस्ट १९४७ चा आनंद अन् स्वातंत्र्यदिनाचा सूर्योदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:42 IST

स्वातंत्र्यदिनी घडलं वाईत देशभक्तीचं अभूतपूर्व दर्शन

मूळचे वाई येथील प्रा. संभाजीराव पाटणे हे (वय : ८९) साताऱ्यात वास्तव्याला आहेत. त्यांचा जन्म नोव्हेंबर १९३६ मध्ये झाला. त्यांचे बालपण व शिक्षण वाईत झाले. तेथेच त्यांनी देश स्वतंत्र झाल्याचा तो दिवस पाहिला. तेव्हा ते ११ वर्षांचे होते. त्यांनी जागविलेल्या स्वातंत्र्यादिनाच्या आठवणी, त्यांच्याच शब्दांत..सातारा : १५ ऑगस्ट १९४७ चा तो दिवस, अनेक वर्षांच्या संघर्षानंतर स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा वाईत अभूतपूर्व असा साजरा झाला. त्यासाठी मुलांनी रात्रभर कमानी उभारल्या होत्या. वाईत सकाळी भाजीमंडईत झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू झाला अन् देश गुलामगिरीतून मुक्त झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आले.वाईतील ११ नंबरच्या शाळेत आम्ही पाचवीमध्ये शिकत होते. स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्र सेवा दलाची वाई शाखा भरत होती. त्यात मी जात होतो. ३० ऑगस्ट १९४४ ला वडील सखाराम बळवंत पाटणे हे महात्मा गांधीजींना पाचगणीवरून वाईत घेऊन आले होते. त्या ठिकाणी प्रथम महात्मा गांधी यांचे दर्शन झाले. ब्राह्मो समाज संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांना पाहता आले. राष्ट्र सेवा दलात राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य, पारतंत्र्याची भूमिका, इंग्रजांची गुलामगिरी, पारतंत्र्याचे तोटे समजून आले.

१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री बाराच्या सुमारास देशाला स्वातंत्र्य मिळणार होते. तेव्हा आम्ही राहात असलेल्या परिसरात आमच्या पेक्षा मोठ्या मुलांनी कमानी उभारल्या. त्यासाठी अशोक व आंब्याच्या झाडाची पाने कमानीला लावण्यात आली होती. तसेच मुलांनी व ग्रामस्थांनी गावातील रस्ते स्वच्छ केले होते. सर्वत्र रांगोळी काढण्यात आलेली. १५ ऑगस्टच्या सकाळी भाजीमंडई या ठिकाणी झेंडावंदन ठरले होते. या झेंडावंदन कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक आप्पाशास्त्री सोहनी, काकासाहेब देवधर, रामभाऊ मेरूरकर, शंकरराव जेजुरीकर, तसेच स. ब. पाटणे हे उपस्थित होते.

आजही आठवणींनी ऊर भरून येतो..आमच्या शाळेतील मुलांना लिमलेटची गोळी, चॉकलेट आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आलेले. तसेच तेथे बिल्लेही विकायला आले होते. त्यावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे चित्र होते. त्याच वेळी वाईमध्ये सामुदायिकरीत्या जिलेबी तयार करूनही वाटण्यात आली होती. या आठवणींनी आजही ऊर भरून येतो. 

शिवरायांकडून स्वराज्याची ज्योत प्रज्वलित..देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. अनेकांचं रक्त सांडलं, काहींना घरेदारे सोडून भूमिगत व्हावं लागलं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे बीज छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसांच्या मनात प्रज्वलित केलेल्या स्वराज्याच्या ज्योतीत होते. या ज्योतीनेच स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटली. शिवरायांच्या स्वराज्याची प्रेरणा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी उपयुक्त ठरली.शब्दांकन - नितीन काळेल