शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अपात्र आमदारांच्या कारवाईची पूर्वतयारी म्हणजेच ‘हा’ शपथविधी : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 12:09 IST

राज्यात ‘मिनिस्टर लाँड्रिंग’ची स्थिती; मोदी सत्तेसाठी कोणत्याही थराला जातील

कऱ्हाड (जि. सातारा) : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सध्या लोकसभा महत्त्वाची असल्याने सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. महाविकास आघाडीतून जे गेले ते गेले. मात्र, महाविकास आघाडीची भीती आजही भाजपला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच अपात्र आमदारांच्या कारवाईची पूर्वतयारी म्हणजे अजित पवारांचा शपथविधी असल्याचे ते म्हणाले.कऱ्हाड येथे रविवारी पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला अनेक दिवसांपासून जी शंका होती, ती घटना अखेर आज घडलीच. याचा पहिला अंक आज झाला असून, पुढचे अंक येत्या दोन दिवसांत आपल्याला पाहायला मिळतील. राष्ट्रवादीतील आमदारांवर ईडीची छत्रछाया आहे. अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह शिंदे-भाजप गटात गेलेल्यांना चांगली झोप लागावी, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.शिवसेनेत झालेली फूट, या खटल्याचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला आहे. या अपात्रतेचा निकाल ९० दिवसांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यावा लागणार आहे. घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार आमदार अपात्र होतील, हे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट आहे. जर अपात्रतेचा निर्णय झाला नाही तर आम्ही सर्वाेच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. अपात्रतेचा निर्णय १० ऑगस्टपर्यंत घ्यावयाचा आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोळा आमदार अपात्र होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदही रिक्त होऊ शकते. अपात्र आमदारांवरील कारवाईची पूर्वतयारी म्हणजेच आजचा राजकीय भूकंप आहे.सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांना मला एवढेच सांगायचं आहे की, जनतेला गृहीत धरू नका. जनता मूर्ख नाही. कर्नाटकच्या निवडणुकीत काय झाले, हे सर्वांसमोर आहे. महाविकास आघाडी एकत्र असल्यावर भाजपचे काही चालत नाही, हे भाजपला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच राज्यात दीड वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. कोणीतरी गेले म्हणून महाविकास आघाडी फुटली, असे अजिबात म्हणता येणार नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच लढणार आहोत. जे गेले ते गेले, आम्ही मात्र विचाराने एकत्र असून जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी एकजुटीने निवडणुकींना सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.घोटाळ्याच्या आरोपांनंतर राष्ट्रवादीत फूट!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवत ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप जाहीर सभेत केला होता. त्यानंतर दोनच दिवसांत राष्ट्रवादीतील मोठा गट राष्ट्रवादी सोडून भाजपात सामील झाला. हा मोठा विरोधाभास म्हणायला हवा. सध्या राज्यात ‘मिनिस्टर लाँड्रिंग’ची स्थिती पाहायला मिळत आहे.

तरच त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होईल!राष्ट्रवादीमधील ५३ आमदारांपैकी दोन तृतीयांश गट बाहेर पडला पाहिजे तरच त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. यासाठी अजित पवार यांना ३६ आमदारांची गरज आहे. पुढच्या काही दिवसांत ३६ पेक्षा जास्त आमदार त्यांच्याजवळ आहेत की नाही, ते पाहणे महत्त्वाचे आहे. राज्याच्या राजकारणाची अधोगती झाली आहे. पैसा व सत्तेचे राजकारण सध्या भाजपने सुरू केले आहे. त्यामुळे त्यांना जनता माफ करणार नाही, हे कर्नाटक निकालावरून समजून येते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष