शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र आमदारांच्या कारवाईची पूर्वतयारी म्हणजेच ‘हा’ शपथविधी : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 12:09 IST

राज्यात ‘मिनिस्टर लाँड्रिंग’ची स्थिती; मोदी सत्तेसाठी कोणत्याही थराला जातील

कऱ्हाड (जि. सातारा) : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सध्या लोकसभा महत्त्वाची असल्याने सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. महाविकास आघाडीतून जे गेले ते गेले. मात्र, महाविकास आघाडीची भीती आजही भाजपला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच अपात्र आमदारांच्या कारवाईची पूर्वतयारी म्हणजे अजित पवारांचा शपथविधी असल्याचे ते म्हणाले.कऱ्हाड येथे रविवारी पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला अनेक दिवसांपासून जी शंका होती, ती घटना अखेर आज घडलीच. याचा पहिला अंक आज झाला असून, पुढचे अंक येत्या दोन दिवसांत आपल्याला पाहायला मिळतील. राष्ट्रवादीतील आमदारांवर ईडीची छत्रछाया आहे. अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह शिंदे-भाजप गटात गेलेल्यांना चांगली झोप लागावी, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.शिवसेनेत झालेली फूट, या खटल्याचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला आहे. या अपात्रतेचा निकाल ९० दिवसांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यावा लागणार आहे. घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार आमदार अपात्र होतील, हे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट आहे. जर अपात्रतेचा निर्णय झाला नाही तर आम्ही सर्वाेच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. अपात्रतेचा निर्णय १० ऑगस्टपर्यंत घ्यावयाचा आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोळा आमदार अपात्र होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदही रिक्त होऊ शकते. अपात्र आमदारांवरील कारवाईची पूर्वतयारी म्हणजेच आजचा राजकीय भूकंप आहे.सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांना मला एवढेच सांगायचं आहे की, जनतेला गृहीत धरू नका. जनता मूर्ख नाही. कर्नाटकच्या निवडणुकीत काय झाले, हे सर्वांसमोर आहे. महाविकास आघाडी एकत्र असल्यावर भाजपचे काही चालत नाही, हे भाजपला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच राज्यात दीड वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. कोणीतरी गेले म्हणून महाविकास आघाडी फुटली, असे अजिबात म्हणता येणार नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच लढणार आहोत. जे गेले ते गेले, आम्ही मात्र विचाराने एकत्र असून जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी एकजुटीने निवडणुकींना सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.घोटाळ्याच्या आरोपांनंतर राष्ट्रवादीत फूट!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवत ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप जाहीर सभेत केला होता. त्यानंतर दोनच दिवसांत राष्ट्रवादीतील मोठा गट राष्ट्रवादी सोडून भाजपात सामील झाला. हा मोठा विरोधाभास म्हणायला हवा. सध्या राज्यात ‘मिनिस्टर लाँड्रिंग’ची स्थिती पाहायला मिळत आहे.

तरच त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होईल!राष्ट्रवादीमधील ५३ आमदारांपैकी दोन तृतीयांश गट बाहेर पडला पाहिजे तरच त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. यासाठी अजित पवार यांना ३६ आमदारांची गरज आहे. पुढच्या काही दिवसांत ३६ पेक्षा जास्त आमदार त्यांच्याजवळ आहेत की नाही, ते पाहणे महत्त्वाचे आहे. राज्याच्या राजकारणाची अधोगती झाली आहे. पैसा व सत्तेचे राजकारण सध्या भाजपने सुरू केले आहे. त्यामुळे त्यांना जनता माफ करणार नाही, हे कर्नाटक निकालावरून समजून येते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष