शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांत धाकधूक : शिरवळ, आदर्की परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 21:20 IST

तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्'ात कोठे ना कोठे पाऊस पडायला लागलाय. गुरुवारी सकाळी खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात सुमारे १५ मिनिटे रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडला. सकाळीच पाऊस सुरू झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.

ठळक मुद्देपिकांवर तांबेराची भीती; ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान २१ अंशापंर्यंत वाढले

सातारा : जिल्'ातील आदर्की आणि शिरवळ परिसरात गुरुवारी सकाळी अवकाळीचा रिमझिम पाऊस झाला. यामुळे पिकांवर तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. तर ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे. किमान तापमान २१ अंशाच्या वर गेले आहे. गेल्या आठवड्यात हेच तापमान १५ अंशाच्या खाली होते.

यावर्षी जिल्'ात सप्टेंबरपासून मान्सूनचा पाऊस सतत पडला. तर आॅक्टोबरच्या अखेरीपासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळीचा पाऊस झाला. यामुळे पिके आणि फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तर सततच्या पावसाचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवरही झाला. त्यामुळे उशिरा पेरणी झाल्याने सध्या पिकेही अजून लहानच आहेत. अनेक ठिकाणी गहू, हरभºयाची पेरणी सुरूच आहे.

जिल्'ात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे किमान तापमान झपाट्याने कमी झाले आहे. बुधवारी किमान तापमान १८ अंशाच्यावर होते. तर तेच गुरुवारी २१ अंशावर गेले. यामुळे उकाड्यातही वाढ झाली. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्'ात कोठे ना कोठे पाऊस पडायला लागलाय. गुरुवारी सकाळी खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात सुमारे १५ मिनिटे रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडला. सकाळीच पाऊस सुरू झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.

फलटण तालुक्यातील आदर्की परिसरातही सकाळी रिमझिम पाऊस पडला. हा पाऊस परिसरातील बिबी, सासवड आदी गावांतही झाला. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांवर तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावाची भीती वाढलीय. तसेच या भागात फळबागा आहेत. ढगाळ वातावरण कायम राहून अवकाळी पावसाने झोडपल्यास फळबागांचे मोठे नुकसान होऊ शकते. आता याच भीतीने बळीराजाच्या पोटात गोळा आलाय.

सातारा शहरातही गुरुवारी ढगाळ वातावरण होते. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातही गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. माणमध्ये तर बुधवारी सायंकाळी अवकाळीच्या पावसाची स्थिती निर्माण झालेली. त्यामुळे शेतकºयांना चिंता लागलेली. कारण, रब्बीतील पिकांना पाणी देण्यात येत आहे. त्यातच अवकाळी पाऊस झाल्यास नुकसानच होण्याची भीती होती.

  • अवकाळी पावसाचा धसका कायम...

आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी सकाळी तुरळक स्वरुपात रिमझिम पावसाने हजेरी लावली. हा पाऊस पिकांना मारक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर अवकाळी पावसाचा शेतकºयांनी चांगलाच धसका घेतलाय.

  • आदर्की महसूल मंडलात गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, मका, मूग, चवळी, घेवडा आदी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. असे असतानाच आता रब्बी हंगामातील पेरणीसाठी कर्ज, उसनवारी पैसा उभा केला. त्यातून ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली. या पिकांत आंतर मशागत करून पाणी देण्याचे काम सुरू असतानाच गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान रिमझिम पाऊस झाला. हा पाऊस आदर्की बुद्रुक, सासवड, बिबी परिसरात पडला. अधिक वेळ पाऊस पडला नसला तरी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांवर करपा रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच हवेमध्ये उष्णता वाढल्याने शेतकºयांच्यात चिंतेत वाढ झाली आहे.

 

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी