शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

केंद्र सरकारकडून ईडीचा राजकीय वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

सातारा : मला ईडीची भीती वाटत नाही. ज्यांना नोटीस आली आहे, ते घाबरले आहेत, असा गैरसमज कोणी करून ...

सातारा : मला ईडीची भीती वाटत नाही. ज्यांना नोटीस आली आहे, ते घाबरले आहेत, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. केंद्र सरकारच्या विरोधात बोलले की, ईडी मागे लावतात. लोकांना घाबरविण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे, असा आरोप राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला आहे, सातार्‍यात जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिलेल्या भेटीप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.

अनिल देशमुख प्रकरण, जरंडेश्वर कारवाई व सातारा डीसीसीला ईडीचा आलेला मेल यावर बोलताना पाटील म्हणाले, आम्हाला आमचे कोणतेही सहकारी यात दोषी आहेत, असे दिसत नाही. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जरंडेश्वरला जो कर्जपुरवठा केला आहे, तो सर्व नियमानुसारच असून, याची माहिती ईडीला देण्यात आली आहे.

ईडीने व सीबीआयने आतापर्यंत अनेक चौकशा केल्या असून, त्याचा तपशील सोईस्कररीत्या जाहीर केला जातो. १५ ते २० वर्षांपूर्वीच्या तपशिलावर आजच्या व्हॅल्यूने आरोप करायचा, हे अत्यंत चुकीचे आहे. अनिल देशमुखांच्या केसमध्ये काही वर्षांपूर्वी त्यांनी कुठे जमीन घेतली असेल, त्याची किंमत वाढवून सांगितली असेल, हे सर्व धादांत खोटे आणि बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. हे करण्यासाठी कर्ता करविता कोण आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे. ज्याला या महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळवायची आहे, अशीच लोक या प्रयत्नांच्या मागे आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

विधानपरिषदेच्या नियुक्त करायच्या १२ आमदारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत बोलताना पाटील म्हणाले, विधान परिषदेच्या आमदारांबाबत आम्ही आमच्या बाजूने प्रक्रिया करून राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर, यावर निर्णय होणे अपेक्षित होते, परंतु त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. यापूर्वी महाराष्ट्रात किंवा देशात अशा पद्धतीचा अनुभव कधी आलेला नाही. राज्य सरकारने एखादी शिफारस केल्यानंतर त्याच्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. राज्यपालांनी निर्णय न घेतल्यामुळे राज्य सरकारच्या अधिकारावर गदा येतेय का, हा खरा प्रश्न आहे. त्या-त्या वेळी राज्य सरकारने राज्यपालांना वेळोवेळी आठवण करून दिली आहे. इतका विलंब लावणे आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे, मला माहीत नाही. आमदारांच्या प्रश्नाबाबत जो विलंब होत आहे, तो जनतेच्या लक्षात येत आहे.