शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

केंद्र सरकारकडून ईडीचा राजकीय वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

सातारा : मला ईडीची भीती वाटत नाही. ज्यांना नोटीस आली आहे, ते घाबरले आहेत, असा गैरसमज कोणी करून ...

सातारा : मला ईडीची भीती वाटत नाही. ज्यांना नोटीस आली आहे, ते घाबरले आहेत, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. केंद्र सरकारच्या विरोधात बोलले की, ईडी मागे लावतात. लोकांना घाबरविण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे, असा आरोप राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला आहे, सातार्‍यात जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिलेल्या भेटीप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.

अनिल देशमुख प्रकरण, जरंडेश्वर कारवाई व सातारा डीसीसीला ईडीचा आलेला मेल यावर बोलताना पाटील म्हणाले, आम्हाला आमचे कोणतेही सहकारी यात दोषी आहेत, असे दिसत नाही. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जरंडेश्वरला जो कर्जपुरवठा केला आहे, तो सर्व नियमानुसारच असून, याची माहिती ईडीला देण्यात आली आहे.

ईडीने व सीबीआयने आतापर्यंत अनेक चौकशा केल्या असून, त्याचा तपशील सोईस्कररीत्या जाहीर केला जातो. १५ ते २० वर्षांपूर्वीच्या तपशिलावर आजच्या व्हॅल्यूने आरोप करायचा, हे अत्यंत चुकीचे आहे. अनिल देशमुखांच्या केसमध्ये काही वर्षांपूर्वी त्यांनी कुठे जमीन घेतली असेल, त्याची किंमत वाढवून सांगितली असेल, हे सर्व धादांत खोटे आणि बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. हे करण्यासाठी कर्ता करविता कोण आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे. ज्याला या महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळवायची आहे, अशीच लोक या प्रयत्नांच्या मागे आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

विधानपरिषदेच्या नियुक्त करायच्या १२ आमदारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत बोलताना पाटील म्हणाले, विधान परिषदेच्या आमदारांबाबत आम्ही आमच्या बाजूने प्रक्रिया करून राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर, यावर निर्णय होणे अपेक्षित होते, परंतु त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. यापूर्वी महाराष्ट्रात किंवा देशात अशा पद्धतीचा अनुभव कधी आलेला नाही. राज्य सरकारने एखादी शिफारस केल्यानंतर त्याच्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. राज्यपालांनी निर्णय न घेतल्यामुळे राज्य सरकारच्या अधिकारावर गदा येतेय का, हा खरा प्रश्न आहे. त्या-त्या वेळी राज्य सरकारने राज्यपालांना वेळोवेळी आठवण करून दिली आहे. इतका विलंब लावणे आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे, मला माहीत नाही. आमदारांच्या प्रश्नाबाबत जो विलंब होत आहे, तो जनतेच्या लक्षात येत आहे.