शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

“लोकप्रतिनिधींच्या नावावर काम करणाऱ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, औद्योगिकीकरणाला अडथळा आणणाऱ्यांना उचला”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 21:40 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्पष्ट सूचना

वरकुटे-मलवडी : “महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातील औद्योगिकीकरण थांबलं आहे. अशावेळी लोकप्रतिनिधींच्या नावावर चुकीचे काम करणाऱ्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा. त्याचबरोबर विकासकामांसह औद्योगिकीकरणाला अडथळा निर्माण करणाऱ्यांनाही उचलावे,” अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. वरकुटे मलवडी, ता. माण येथे माण-खटाव या दुष्काळी तालुक्यासाठी टेंभूचे अडीच टीएमसी पाणी आरक्षित करून वचनपूर्ती केल्याबद्दल आयोजित भव्य कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

“औद्योगिकीकरण करणं काळाची गरज आहे. भविष्यात सातारा-पंढरपूर रस्त्यावर एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुष्काळी माण-खटावबद्दल आपुलकीची भावना शरद पवार यांच्या मनात असून, कोणी तरी खंबीर माणूस कोणत्याही योजनेच्या मागे असल्याशिवाय ती यशस्वी होत नाही. राज्याला निधी देणारा मी वाढप्या आहे. येथील जनतेच्या विकासासाठी जास्त देता येईल, तेवढा निधी देण्याचा प्रयत्न करेन; परंतु रस्ते आणि औद्योगिकीकरणाच्या कामाला विनाकारण विलंब होतोय. दिवसेंदिवस महागाई वाढतेय, तसेच कॉन्ट्रॅक्टरला त्रास देणाऱ्यांनाही सुज्ञ जनतेनं धडा शिकवला पाहिजे. माण-खटाव भागातील शेतकरी कष्टाळू असून, दुष्काळ असला तरी सातत्याने समाधानाची शेती करतोय. यासाठी आशिया खंडातील सर्वांत मोठ्या टेंभू जलप्रकल्प योजनेतून इथली हजारो हेक्टर शेती हिरवीगार करणार आहे,” असं पवार म्हणाले.

“राज्यात आघाडी सरकार आल्यापासून इथल्या जनतेला पाण्याचं आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधींचा पत्ताच नाही. या भागातील जनतेसह शेतकऱ्यांसाठी प्रभाकर देशमुख सातत्यानं आणि आग्रहाने पाण्याची मागणी करीत आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून अडीच टीएमसी पाणी माण-खटावच्या ५७ गावांना मिळतंय. ज्या पाण्यासाठी आपण अखंडपणे लढा दिला, ते पाणी पुढील डिसेंबरच्या दरम्यान, येथील शिवारात बघायला मिळेल,” अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, “इथल्या कणखर शेतकऱ्यांनी बरीच वर्षे दुष्काळ सोसला. कृष्णा-कोयनेचं पाणी श्रावण महिन्यात देवांना अर्पण करण्याची इथली परंपरा. जी कृष्णा-कोयनामाय माझ्या जन्मगावातून वाहते, तेच पाणी माण-खटावच्या अंगणात आलंय, याचा मला सार्थ अभिमान आहे.”

प्रभाकर देशमुख यांच्याकडून अपेक्षा व्यक्त...‘जो अन्न, पाणी देतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संस्कृती माण-खटाव तालुक्याची आहे. ज्या ठिकाणी कुठलेही पाणी येणे अशक्य होते, अशा ठिकाणी पाणी आरक्षित करून दिल्याबद्दल आघाडी शासनाचे धन्यवाद. तसेच दहीवडी, वडूजमधील क्रीडा संकुले अपूर्ण असून, म्हसवड आणि वडूज येथील बसस्थानकाची कामेही प्रलंबित आहेत. ती तत्काळ कार्यान्वित व्हावीत, अशी अपेक्षा प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केली. अभयसिंह जगताप यांनी माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांद्वारे होणारा विकास स्पष्ट केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र