शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 12:54 IST

BharatBand, FarmarStrike, Police, Sataranews केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी कायदे त्वरित रद्द करावेत शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात आला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने सातारा शहरातून रॅली काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देसाताऱ्यात आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, कामकाज ठप्प बाजार समित्यांच्या आवारामध्ये शांतता; जिल्ह्यात भारत बंदला शंभर टक्के प्रतिसाद

सातारा : केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी कायदे त्वरित रद्द करावेत शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात आला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने सातारा शहरातून रॅली काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.जिल्ह्यातील सातारा, कराड, वाई, फलटण या प्रमुख शहरांसह इतर तालुक्यात बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. शहरातील रस्त्यांवर देखील वाहतूक रोडावली होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली.बाजार समित्यांचे कामकाज देखील पूर्णपणे ठप्प झाले. बाजार समित्यांच्या आवारामध्ये भयान शांतता पाहायला मिळाली. भाज्यांची आवक देखील झाली नाही. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेला शेतमाल वाहनांमध्ये अडकून पडला होता. माल घेऊन आलेली ही वाहने बाजार समितीच्या आवारात उभी होती. बाजार समितीतील व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे शेतमालाची खरेदी-विक्री होऊ शकले नाही.भारत बंदची घोषणा असली तरीदेखील एसटीच्या फेऱ्या सुरू होत्या. महामार्गावर ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कराडवरून पुणे, मुंबईला जाणारी वाहतूक मंदावली होती. पुण्याकडून साताऱ्याकडे येणारी वाहने काही प्रमाणात पाहायला मिळत होती.केंद्राने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात आघाडीतील घटक पक्षांनी मंगळवारी एकत्र येत घोषणाबाजी केली. विकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी सकाळी सातारा शहरातून रॅली काढली. अधिकारी कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली पोहना कडे निघाले असताना पोलिसांनी रस्त्यातच आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी महाविकास आघाडीच्या नरेंद्र पाटील, तेजस शिंदे आदी नेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतरही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकाणी घोषणाबाजी देऊन केंद्र शासनाचा निषेध केला.भारत किसान मंचचे कॉम्रेड वसंतराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके, अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने केली.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदFarmer strikeशेतकरी संपSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस