शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 12:54 IST

BharatBand, FarmarStrike, Police, Sataranews केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी कायदे त्वरित रद्द करावेत शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात आला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने सातारा शहरातून रॅली काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देसाताऱ्यात आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, कामकाज ठप्प बाजार समित्यांच्या आवारामध्ये शांतता; जिल्ह्यात भारत बंदला शंभर टक्के प्रतिसाद

सातारा : केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी कायदे त्वरित रद्द करावेत शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात आला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने सातारा शहरातून रॅली काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.जिल्ह्यातील सातारा, कराड, वाई, फलटण या प्रमुख शहरांसह इतर तालुक्यात बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. शहरातील रस्त्यांवर देखील वाहतूक रोडावली होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली.बाजार समित्यांचे कामकाज देखील पूर्णपणे ठप्प झाले. बाजार समित्यांच्या आवारामध्ये भयान शांतता पाहायला मिळाली. भाज्यांची आवक देखील झाली नाही. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेला शेतमाल वाहनांमध्ये अडकून पडला होता. माल घेऊन आलेली ही वाहने बाजार समितीच्या आवारात उभी होती. बाजार समितीतील व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे शेतमालाची खरेदी-विक्री होऊ शकले नाही.भारत बंदची घोषणा असली तरीदेखील एसटीच्या फेऱ्या सुरू होत्या. महामार्गावर ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कराडवरून पुणे, मुंबईला जाणारी वाहतूक मंदावली होती. पुण्याकडून साताऱ्याकडे येणारी वाहने काही प्रमाणात पाहायला मिळत होती.केंद्राने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात आघाडीतील घटक पक्षांनी मंगळवारी एकत्र येत घोषणाबाजी केली. विकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी सकाळी सातारा शहरातून रॅली काढली. अधिकारी कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली पोहना कडे निघाले असताना पोलिसांनी रस्त्यातच आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी महाविकास आघाडीच्या नरेंद्र पाटील, तेजस शिंदे आदी नेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतरही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकाणी घोषणाबाजी देऊन केंद्र शासनाचा निषेध केला.भारत किसान मंचचे कॉम्रेड वसंतराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके, अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने केली.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदFarmer strikeशेतकरी संपSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस