शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘पीएम जन-मन’ आणणार कातकरी समाजात समृद्धीची पहाट, सातारा जिल्हा परिषदेकडून सर्वेक्षण 

By नितीन काळेल | Updated: January 11, 2024 17:41 IST

जिल्ह्यातील ८४५ कुटुंबाना मूलभूत सुविधांचा लाभ 

सातारा : जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजातील वंचित कुटुंबांत ‘प्रधानमंत्री जन मन’ योजनेच्या माध्यमातून समृद्धी फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८४५ कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले आहे. आता त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत दि. १५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या लाभार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहेत हे विशेष.याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली. त्यानुसार आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी जनजाती आदिवासी न्याय महाअभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने प्राधान्यक्रमाने घेतला आहे. यासाठी गेल्यावर्षी १५ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री जनमन’ या अभियानाचा शुभारंभही करण्यात आला आहे. या अभियानादरम्यान सातारा जिल्ह्यात ९ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ८४५ कातकरी कुटुंब वास्तव्यास असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.या सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांना आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, आयुष्यमान भारत, आरोग्य कार्ड, जातीचा दाखला, घरकुल, रस्ते, पिण्याचे पाणी आदी मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन अविरतपणे प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे.

दरम्यान, या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या जिल्ह्यातील ८४५ लाभधारक कुटुंबांशी दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाच्यावतीनेही मेढा, ता. जावली येथील एका मंगल कार्यालयात ऑनलाईन कार्यक्रमासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. तसेच कार्यक्रमासाठी पात्र लाभधारक कुटुंबांनीही उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद