शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात निर्यातक्षम फळबागा होणार, एआय तंत्रज्ञान वापरणार; कृषी विभागाची तयारी

By नितीन काळेल | Updated: February 13, 2025 16:29 IST

सातारा जिल्हा महाराष्ट्राचं फ्रूट बास्केट म्हणून येतोय पुढं

नितीन काळेलसातारा : सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी माण, खटाव तालुक्यात उरमोडी आणि जिहे कटापूर योजनेचे पाणी पोहोचत आहे. अशा ठिकाणी जवळपास ७ हजार हेक्टरवर निर्यातक्षम फळबागांचे नियोजन आहे. यासाठी राज्य कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.सातारा जिल्हा महाराष्ट्राचं फ्रूट बास्केट म्हणून पुढे येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४० प्रकारची विविध फळे घेण्यात येतात. अशी सर्व पार्श्वभूमी असल्याने जिल्ह्यात फळबागांचा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी राज्य कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनातून माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात नवीन फळबाग लागवडीचा प्रकल्प होत आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव तालुक्यात उरमोडी आणि जिहे कटापूर योजनेचे पाणी पोहोचत आहे. जवळपास ७० हजार हेक्टर क्षेत्र या योजनेतून ओलिताखाली येणार आहे. या लाभक्षेत्रातच निर्यातक्षम फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे.यासाठी शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, रोजगार हमी योजनेतून फळबाग, मागेल त्याला शेततळे आणि सुक्ष्म सिंचन योजनेचे एकत्रीकरण करून लाभ देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. तसेच काही वर्षातच दुष्काळी तालुक्यातील माळरानावर निर्यातक्षम फळबागा डोलताना दिसणार आहेत.

१२५ गावात राबविण्यात येणारकृषी विभागाच्या माध्यमातून माण, खटाव आणि कोरेगाव या तीन तालुक्यातील सुमारे १२५ गावांत या फळबागा होणार आहेत. यासाठी एआय या तंत्रज्ञानाचाही काही प्रमाणात वापर करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी २०० प्रशिक्षणे प्रस्तावितसातारा जिल्ह्यातून द्राक्षे आणि डाळिंबाची निर्यात होत आहे. त्याचबरोबर या योजनेत आंबा, आवळा, सीताफळ, पेरू, डाळिंब, द्राक्षे या मुख्य फळबागा योजनेतून घेण्यात येणार आहेत. याची फळेही उच्च दर्जाची मिळणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुमारे २०० प्रशिक्षणे प्रस्तावित आहेत. याची लागवड पावसाळ्यात करण्याचे नियोजन आहे. भविष्यात या बागा सेंद्रिय प्रमाणाखालीही आणण्यात येणार आहेत.

फळबागांचे असे नियोजन..

  • माण तालुका ३,५०० हेक्टर
  • खटाव ३,००० हेक्टर
  • कोरेगाव ५०० हेक्टर

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात उरमोडी आणि जिहे कटापूर योजनेचे पाणी जात आहे. याच्या लाभक्षेत्रात निर्यातक्षम फळबागा घेण्याचे नियोजन झाले आहे. जवळपास ७ हजार हेक्टरवर या बागा असणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. या फळबागांमधून शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत आणखी भक्कम होणार आहे. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAgriculture Sectorशेती क्षेत्रAgriculture Schemeकृषी योजनाFarmerशेतकरी