शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

संकटकाळी फलटणकर आश्रय देतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 10:47 PM

फलटण : ‘फलटणकर नेहमीच सहिष्णुता आणि मदतीसाठी आघाडीवर राहिल्याचे नमूद करीत ब्र्रिटिशाविरुद्ध भूमिका घेतल्याने आपल्या कुटुंबातील पूर्वजांना याच जिल्ह्यातील नांदवळ येथून हद्दपार व्हावे लागले. त्यावेळी ती मंडळी फलटण येथे वास्तव्यास आली आणि त्यानंतर त्यांनी काट्याचीवाडी (बारामती) येथे वास्तव्य केले. ही वस्तुस्थिती असल्याचे स्पष्ट करीत संकटाच्या काळात येथे आश्रय मिळतो, हे ...

फलटण : ‘फलटणकर नेहमीच सहिष्णुता आणि मदतीसाठी आघाडीवर राहिल्याचे नमूद करीत ब्र्रिटिशाविरुद्ध भूमिका घेतल्याने आपल्या कुटुंबातील पूर्वजांना याच जिल्ह्यातील नांदवळ येथून हद्दपार व्हावे लागले. त्यावेळी ती मंडळी फलटण येथे वास्तव्यास आली आणि त्यानंतर त्यांनी काट्याचीवाडी (बारामती) येथे वास्तव्य केले. ही वस्तुस्थिती असल्याचे स्पष्ट करीत संकटाच्या काळात येथे आश्रय मिळतो, हे विसरता येणार नाही,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी केले.येथील आबासाहेब मंदिर, चक्रपाणी जन्मस्थान आणि रंगशिळा मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर या तिन्ही मंदिरांचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, डॉ. इंद्रजित मोहिते, सुभाषराव शिंदे, डॉ. विजयराव बोरावके, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, पंचायत समिती सभापती रेश्मा भोसले, पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा नीता नेवसे, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यासह महानुभाव पंथातील अनेक संत, महंत विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.खासदार शरद पवार म्हणाले, ‘आडनावावरून जात आणि धर्म किंवा पंथ स्पष्ट होत असल्याने महानुभाव पंथामध्ये संत महंतांची नावे गावावरून येत. येथे जात, धर्म, पंथ पूर्णपणे बाजूला ठेवून सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा आणि त्यांच्यामध्ये समाजाविषयी आदर आणि आपुलकीची शिकवण देणारा धर्म म्हणून महानुभाव पंथाची ओळख आहे.शिकवणुकीची गरजगाडगे महाराजांनी म्हटले आहे की, देव सुंदर मूर्तीत असल्याचे पाहून त्याला नमस्कार करता; परंतु तो नैवेद्य खात नाही, हालचाल करीत नाही, वस्त्र परिधान करीत नाही, अशा देवाला पूजण्यापेक्षा ज्याला अन्न, वस्त्र, निवाºयाची गरज आहे, त्याला ते उपलब्ध करून द्या आणि माणसातील दैवत्व जागे करून त्याची पूजा करा त्यातून समाजमन तयार होईल, याची शिकवण दिल्याचे निदर्शनास आणून देत आज खºया अर्थाने या शिकवणुकीची गरज आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Politicsराजकारण