शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यास बदलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:57 PM

कºहाड : डॉ. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची कुणामध्ये सुद्धा हिंमत नाही आणि संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.पुणे येथे रविवार, दि. २७ रोजी होणाºया महाअधिवेशनाच्या तयारीकरिता पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी यांचा नियोजन मेळावा रविवारी कºहाड ...

कºहाड : डॉ. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची कुणामध्ये सुद्धा हिंमत नाही आणि संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.पुणे येथे रविवार, दि. २७ रोजी होणाºया महाअधिवेशनाच्या तयारीकरिता पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी यांचा नियोजन मेळावा रविवारी कºहाड येथे यशवंतराव चव्हाण बचत भवन सभागृहात पार पडला. याप्रसंगी राज्यमंत्री आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयचे विवेक कांबळे, हणमंतराव साठे, प्राचार्य शहाजी कांबळे, अशोकराव मदने, आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, जयवंत विरकायदे, किशोर तपासे, कºहाड तालुकाध्यक्ष युवराज काटरे, राजू गवळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री आठवले पुढे म्हणाले, ‘‘भाजप जातीयवादी असल्याचं बोललं जातंय. नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्याबद्दल चांगलं बोलताहेत. संविधान बदलणार नाही. दलितांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे ओरडून सांगताहेत. मात्र, काही विरोधी पक्षातील लोक भाजपवाले असे करतील तसेच करतील, असे सांगत आहेत. आरपीआय हा मोठा पक्ष आहे. या पक्षात हिंदू, मराठा, मुस्लीम, ख्रिश्चन अशा विविध धर्मांतील लोक आहेत. त्यामुळे आपण एकमेकांशी भांडत न बसता एकत्रित राहिले पाहिजे. आरपीआयची ताकद वाढविली पाहिजे. आरपीआय हा संभाजी भिडे यांच्या बाजूने नाही. संभाजी भिडे यांना अटक झालीच पाहिजे, अशी आमचीही मागणी आहे. डॉ. बाबासाहेबांनी जोडण्याची भूमिका सांगितली आहे, तोडण्याची नाही. खरे मित्र बनवणे हीच खरी आपली चळवळ आहे.’मेळाव्यापूर्वी राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कºहाड तालुका आरपीआय संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज काटरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यानंतर राज्यमंत्री आठवले यांनी कºहाड येथील बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.मी मंत्री झाल्यापासून त्यांच्या पोटात गोळामाझ्या मंत्रिपदाकडे लागला आहे डोळा... कारण मी मंत्री झाल्यापासून त्यांच्या पोटात उठलाय गोळा... जर खराच असशील तू भीमाच्या बाळा... तर लाव ना तू जातीयवादी लोकांच्या तोंडाच्या काळा... अशा मार्मिक कवितेच्या माध्यमातून नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांच्यावर मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.