शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत : देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST

सातारा : दिल्ली येथे १०० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजीनामे द्यावेत, अशी ...

सातारा : दिल्ली येथे १०० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजीनामे द्यावेत, अशी मागणी लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक ॲड. वर्षा देशपांडे यांनी केली आहे.

६ मार्च रोजी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. शासकीय कोविड १९ चे सर्व नियम पाळून मोदी, शहा, अंबानी, अदाणी यांच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपल्या रागाला वाट करून दिली. एमएसपीचा कायदा त्वरित पारित करा. शेतकरी आणि ग्राहकांचे शोषण करणारे तीनही काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली. शेतकरीविरोधी सरकारची साथ सोडून देऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी वर्षा देशपांडे यांनी संघटनेच्यावतीने केली.

यावेळी सुषमा घोरपडे, शैला जाधव, माया पवार, स्वाती बल्लाळ, मालन कांबळे, दत्ताजीराव जाधव, संजीव बोंडे आणि शेतकरी महिला उपस्थित होत्या.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी ॲड. वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आंदोलन केले. (छाया : जावेद खान)

०६जावेद खान