शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Satara: पाचगणी भाजी मार्केटला भीषण आग; सात दुकाने खाक, लाखांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 14:30 IST

ऐन दसऱ्याच्या सणामध्ये व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी

पाचगणी : पाचगणी भाजी मार्केटला शनिवारी मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. या आगीत सलग सात दुकाने खाक झाली. यामुळे भाजी व्यावसायिकांचे सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दसऱ्याच्या सणामध्ये या व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.पाचगणीतील मंडईत शनिवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोळ व धूर बाजारपेठेत पसरल्याने सर्वजण घटनास्थळी जमा झाले. काहींनी पाण्याच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. खासगी टँकर मागवले त्याने आग विझविण्याचे काम सुरू होते. मात्र, आग आणखीनच वाढत होती. पाचगणी पालिकेच्या बंबाला पाचारण केले. परंतु, त्यात पाणी नसल्याचे समजल्याने महाबळेश्वर पालिकेशी संपर्क साधला. महाबळेश्वर पालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. काहीवेळाने ही आग आटोक्यात आली. परंतु, या दुकानांतील सर्व भाजी जळून खाक झाली होती.शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये गणेश वाडकर, संजय रजपुरे, अल्ताफ बागवान, अनिता कासुर्डे, भास्कर आंब्राळे, सिद्धेश शिंदे, प्रीती आंब्राळे, सोहेल बागवान यांच्या भाजीपाला तसेच दुकानांचे सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले आहे. या व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.२०१५ च्या दिवाळीची आठवण२०१५ मध्येही दिवाळी हंगामात फटक्यामुळे अशाच पद्धतीने आग लागली होती. त्यावेळीही अशीच मोठी हानी झाली होती. परंतु, त्यावेळी कसलीही नुकसानभरपाई मिळाली नाही. आता दसऱ्याच्या दिवसात अशाच आगीची पुनरावृत्ती झाली आहे. यावेळी तरी या व्यावसायिकांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. परंतु, आतातरी या व्यावसायिकांना न्याय मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजारfireआग