शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

Satara: पाचगणी भाजी मार्केटला भीषण आग; सात दुकाने खाक, लाखांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 14:30 IST

ऐन दसऱ्याच्या सणामध्ये व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी

पाचगणी : पाचगणी भाजी मार्केटला शनिवारी मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. या आगीत सलग सात दुकाने खाक झाली. यामुळे भाजी व्यावसायिकांचे सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दसऱ्याच्या सणामध्ये या व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.पाचगणीतील मंडईत शनिवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोळ व धूर बाजारपेठेत पसरल्याने सर्वजण घटनास्थळी जमा झाले. काहींनी पाण्याच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. खासगी टँकर मागवले त्याने आग विझविण्याचे काम सुरू होते. मात्र, आग आणखीनच वाढत होती. पाचगणी पालिकेच्या बंबाला पाचारण केले. परंतु, त्यात पाणी नसल्याचे समजल्याने महाबळेश्वर पालिकेशी संपर्क साधला. महाबळेश्वर पालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. काहीवेळाने ही आग आटोक्यात आली. परंतु, या दुकानांतील सर्व भाजी जळून खाक झाली होती.शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये गणेश वाडकर, संजय रजपुरे, अल्ताफ बागवान, अनिता कासुर्डे, भास्कर आंब्राळे, सिद्धेश शिंदे, प्रीती आंब्राळे, सोहेल बागवान यांच्या भाजीपाला तसेच दुकानांचे सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले आहे. या व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.२०१५ च्या दिवाळीची आठवण२०१५ मध्येही दिवाळी हंगामात फटक्यामुळे अशाच पद्धतीने आग लागली होती. त्यावेळीही अशीच मोठी हानी झाली होती. परंतु, त्यावेळी कसलीही नुकसानभरपाई मिळाली नाही. आता दसऱ्याच्या दिवसात अशाच आगीची पुनरावृत्ती झाली आहे. यावेळी तरी या व्यावसायिकांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. परंतु, आतातरी या व्यावसायिकांना न्याय मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजारfireआग