पालघर झाला, आता कऱ्हाड कधी

By Admin | Updated: June 18, 2014 01:08 IST2014-06-18T00:59:14+5:302014-06-18T01:08:05+5:30

अनेक वर्षांपासूनची मागणी : ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर कऱ्हाडकर आक्रमक

Palghar, nowadays, Karhad | पालघर झाला, आता कऱ्हाड कधी

पालघर झाला, आता कऱ्हाड कधी

कऱ्हाड : ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर आता कऱ्हाडकरांनाही जिल्ह्याचे वेध लागले आहेत. पालघरप्रमाणेच कऱ्हाड जिल्हा व्हावा, ही दोन दशकापासुनची मागणी आता आक्रमकपणे होऊ लागली आहे. यशवंतरावांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी त्यांच्या कर्मभुमिला न्याय द्यावा आणी पालघरप्रमाणेच कऱ्हाड जिल्ह्याची घोषणा करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कऱ्हाडला कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम आहे. त्याला प्रीतीसंगत म्हणतात. असाच संगम परीसरातील काही तालुक्यांचा व्हावा आणी यशवंतरावांचे कऱ्हाड जिल्ह्याच ठिकाण व्हाव, ही सर्वसामान्य लोकांची अपेक्षा !
तसं पाहिलं तर कऱ्हाड जिल्हा होण कोणाच्याच तोट्याच नाही. उलट ते फायद्याचच आहे. नाहीतर सांगली आणी सातारा जिल्ह्यात असणाऱ्या अनेक तालुक्यांतील जनतेचा जिल्ह्याशी संबंध कमी आणी कऱ्हाडशी
जास्त, अशीच स्थिती पहायला मिळते. फरक फक्त एवढाच की कऱ्हाड जिल्हा नाही.
वाळवा, शिराळा, कडेगाव या सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यातील लोकांचा कऱ्हाडशी विविध कारणांनी नित्याचा संबंध आहे. पाटण, कोरेगाव, खटाव या सातारा जिल्ह्यातील लोकांचीही तीच परीस्थिती आहे. सर्व कारणांसाठी कऱ्हाड सोयीचे असेल तर मग तो जिल्हा झाल्यास सर्वांना फायद्याच आहे; पण त्यासाठी राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती महत्वाची आहे, एवढच ! गेली अनेक वर्ष पुणे आणि ठाणे जिल्ह्याचे विभाजन करावे तर कऱ्हाड स्वतंत्र जिल्हा करावा ही नागरिकांची मागणी होती. (‘लोकमत’ टीम)

Web Title: Palghar, nowadays, Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.