शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

सुवासिक तांदळासाठी लावले भाताचे बुचार, पोत सुधारण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 17:06 IST

wai, farmar, sataranews वाईच्या पश्चिम भाग जास्त पर्जन्यमानाचा असल्याने येथे अनेक जातीवंत भाताच्या वाणापासून नवनवीन वाणांची लागवड केली जाते. भाताच्या खाचरातून पाटांच्या साहाय्याने सतत पाणी पुरवठा केला जातो. भाताचा पोत सुधारून सुवासिक तांदूळ व्हावा यासाठी शेतकरी भाताची काढणी करून खळ तयार करत आहेत. त्याभोवती बुचार (ऐरणी) रचून ठेवण्याचे परंपरा जुणी आहे. ती यंदाही जपली आहे

ठळक मुद्देसुवासिक तांदळासाठी लावले भाताचे बुचार पोत सुधारण्यास मदत : वाईच्या पश्चिम भागात शेतात खळी तयार

वाई : वाईच्या पश्चिम भाग जास्त पर्जन्यमानाचा असल्याने येथे अनेक जातीवंत भाताच्या वाणापासून नवनवीन वाणांची लागवड केली जाते. भाताच्या खाचरातून पाटांच्या साहाय्याने सतत पाणी पुरवठा केला जातो. भाताचा पोत सुधारून सुवासिक तांदूळ व्हावा यासाठी शेतकरी भाताची काढणी करून खळ तयार करत आहेत. त्याभोवती बुचार (ऐरणी) रचून ठेवण्याचे परंपरा जुणी आहे. ती यंदाही जपली आहे.वाई तालुक्याच्या पश्चिम भागात खरीपातील पेरणी क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र भाताचे असते. यामध्ये प्रामुख्याने रोप लागवड व पेरणीचे भात केले जाते. हवामान, मातीचे प्रकार यानुसार प्रत्येक भागामध्ये भाताच्या वेगवेगळया जातीची लागवड जवळपास निश्चित झालेली आहे. प्रामुख्याने भातामध्ये हळवागट, निमगरवा गट, बारवा गट, सुवासिक गट व बासमती प्रकरातील अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन जाती व संकरित जाती असे गट असतात.वाई तालुक्यात भातात सुवासिक गटातील इंद्रायणी, सुगंधा व इतर काही खासगी कंपनीच्या भाताच्या वाणाचा वापर होतो. इंद्रायणी वाणास भागात १४० ते १४५ दिवस लागतात. याबरोबरच धोम, अभेपुरी, गाढवेवाडी, पांडेवाडी, धावडी, पिराचीवाडी, वासोळे, वडवली, आसरे, मेणवली या गावात बासमती ३७०, रेठरे बासमती या वाणाचीही लागवड केली जाते.

कालावधी पूर्ण झालेली पिक हे कापणी करून विश्ष्टि पध्दतीने दिवाळीच्या आगोदर शेतामध्ये अथवा घराजवळ रचून ठेवला जातो. यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा वेळ ही मिळतो. त्याचा शास्त्रीय फायदा असा होतो की भात पेंढ्यातील संपूर्ण कस किंवा अर्क हा भाताच्या तांदळामध्ये उतरतो. यामुळे तांदळाला विशिष्ट चव येते. त्यामुळे या भागातील तांदळाला बाजारपेठेत मागणी असते.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरwai-acवाई