शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

सुवासिक तांदळासाठी लावले भाताचे बुचार, पोत सुधारण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 17:06 IST

wai, farmar, sataranews वाईच्या पश्चिम भाग जास्त पर्जन्यमानाचा असल्याने येथे अनेक जातीवंत भाताच्या वाणापासून नवनवीन वाणांची लागवड केली जाते. भाताच्या खाचरातून पाटांच्या साहाय्याने सतत पाणी पुरवठा केला जातो. भाताचा पोत सुधारून सुवासिक तांदूळ व्हावा यासाठी शेतकरी भाताची काढणी करून खळ तयार करत आहेत. त्याभोवती बुचार (ऐरणी) रचून ठेवण्याचे परंपरा जुणी आहे. ती यंदाही जपली आहे

ठळक मुद्देसुवासिक तांदळासाठी लावले भाताचे बुचार पोत सुधारण्यास मदत : वाईच्या पश्चिम भागात शेतात खळी तयार

वाई : वाईच्या पश्चिम भाग जास्त पर्जन्यमानाचा असल्याने येथे अनेक जातीवंत भाताच्या वाणापासून नवनवीन वाणांची लागवड केली जाते. भाताच्या खाचरातून पाटांच्या साहाय्याने सतत पाणी पुरवठा केला जातो. भाताचा पोत सुधारून सुवासिक तांदूळ व्हावा यासाठी शेतकरी भाताची काढणी करून खळ तयार करत आहेत. त्याभोवती बुचार (ऐरणी) रचून ठेवण्याचे परंपरा जुणी आहे. ती यंदाही जपली आहे.वाई तालुक्याच्या पश्चिम भागात खरीपातील पेरणी क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र भाताचे असते. यामध्ये प्रामुख्याने रोप लागवड व पेरणीचे भात केले जाते. हवामान, मातीचे प्रकार यानुसार प्रत्येक भागामध्ये भाताच्या वेगवेगळया जातीची लागवड जवळपास निश्चित झालेली आहे. प्रामुख्याने भातामध्ये हळवागट, निमगरवा गट, बारवा गट, सुवासिक गट व बासमती प्रकरातील अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन जाती व संकरित जाती असे गट असतात.वाई तालुक्यात भातात सुवासिक गटातील इंद्रायणी, सुगंधा व इतर काही खासगी कंपनीच्या भाताच्या वाणाचा वापर होतो. इंद्रायणी वाणास भागात १४० ते १४५ दिवस लागतात. याबरोबरच धोम, अभेपुरी, गाढवेवाडी, पांडेवाडी, धावडी, पिराचीवाडी, वासोळे, वडवली, आसरे, मेणवली या गावात बासमती ३७०, रेठरे बासमती या वाणाचीही लागवड केली जाते.

कालावधी पूर्ण झालेली पिक हे कापणी करून विश्ष्टि पध्दतीने दिवाळीच्या आगोदर शेतामध्ये अथवा घराजवळ रचून ठेवला जातो. यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा वेळ ही मिळतो. त्याचा शास्त्रीय फायदा असा होतो की भात पेंढ्यातील संपूर्ण कस किंवा अर्क हा भाताच्या तांदळामध्ये उतरतो. यामुळे तांदळाला विशिष्ट चव येते. त्यामुळे या भागातील तांदळाला बाजारपेठेत मागणी असते.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरwai-acवाई