शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

..अन्यथा नेत्यांच्या प्रचार सभा उधळून लावणार, शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसेंनी दिला इशारा

By संजय पाटील | Updated: October 4, 2024 15:47 IST

कऱ्हाड : गतवर्षी साखर आयुक्तांपुढे झालेल्या बैठकीत ऊसाला ३ हजार १०० रुपये पहिली उचल देण्याचे कारखानदारांनी मान्य केले होते. ...

कऱ्हाड : गतवर्षी साखर आयुक्तांपुढे झालेल्या बैठकीत ऊसाला ३ हजार १०० रुपये पहिली उचल देण्याचे कारखानदारांनी मान्य केले होते. मात्र, जिल्ह्यातील कारखानदारांनी २ हजार ८०० ते ३ हजार १०० रूपयांच्या घरातच शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कारखानदारांनी गतवर्षीची शिल्लक रक्कम देण्यासह यंदा गाळप होणाऱ्या उसाला ४ हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी. अन्यथा कारखानदारांसह नेत्यांच्या सभा उधळून लावणार, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांनी दिला. कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे सातारा, सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.गोडसे म्हणाले, गतवर्षी गळीत झालेल्या उसाला ३ हजार १०० रुपये देण्याचे साखर आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत कारखानदारांनी मान्य केले होते. साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांनीही तसे आदेश काढले होते. मात्र, दुसरा गळीत हंगाम सुरू होण्याची वेळ आली तरी काही कारखानदारांनी अद्यापही गतवर्षी गाळप झालेल्या उसाला ३ हजार १०० रुपये दिलेले नाहीत. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी २ हजार ८०० ते ३ हजार रुपये दिले आहेत. त्यामुळे उर्वरित रक्कम कारखानदारांनी गाळप हंगामापूर्वीच शेतकºयांना दिली पाहिजे. त्याचबरोबर यंदा गाळप होणाºया उसाला प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल देणे आवश्यक आहे.यंदा वर्षभर साखरेचा दर ४० रूपयाहून अधिक राहिला आहे. कारखानदारांनाही त्यामुळे ४ हजार दर देणे फारसे अवघड नाही. गत काही वर्षात महागाई वाढली असून त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यां चा उत्पादन खर्च वाढला असून शेतकऱ्यांना शेती करणे परवडतच नाही. कारखानदारांनी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच यंदा गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल जाहीर करावी. मगच कारखाने सुरू करावेत, अशी मागणी शंकरराव गोडसे यांनी केली आहे.कारखानदारांना गावात फिरकू देणार नाही!शेतकरी संघटना यंदा रास्तारोको, ट्रॅक्टरचे नुकसान करणे यासारखी रस्त्यावर उतरून आंदोलने करणार नाही. विधानसभा निवडणुकीत बहुतांश उमेदवार कारखान्यांशी निगडीतच आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवार, कारखान्यांचे अध्यक्ष तसेच संचालकांना गावात फिरू देणार नाही. गावागावात निवडणूक कालावधीत होणाऱ्या सभा उधळून लावणार. प्रचाराच्या गाड्यांना माघारी पाठविले जाणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने