शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Satara News: महाराणी येसूबाईंच्या समाधीची मूळ जागा सापडली, हरिनारायण मठाच्या कागदपत्रातून माहिती उघड 

By सचिन काकडे | Updated: March 16, 2023 16:43 IST

छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी म्हणजेच येसूबाईंची समाधी असल्याचे सिद्ध झाल्याने सातारच्या इतिहासातील फार मोठा ऐतिहासिक वारसा आता दृष्टीक्षेपात आला आहे

सातारा : राजधानी साताऱ्यातील माहुली हे गाव धार्मिक अंगाने प्रसिद्ध असून, या गावात मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाच्या व्यक्ती महाराणी येसूबाई यांची समाधी असल्याचे अखेर शिक्कामोर्तब झाले. सातारा स्थित जिज्ञासा संस्था व संलग्न अभ्यासकांनी इतिहासकालीन पत्रे व नकाशाच्या आधारे समाधीची स्थाननिश्चिती केली आहे.येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजेशिर्के आणि जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेचे कार्याध्यक्ष निलेश पंडित यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबतची दिली. निलेश पंडित म्हणाले, संगम माहुली गावात शिरत असताना डाव्या बाजूला एक मोठा दगडी चौथरा आहे. या चौथ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी सगुणाबाई यांचे वृंदावन आणि त्याच्या पाठीमागे सगुणेश्वराचे देवालय आहे. सगुणाबाईंचा मृत्यू २५ जुलै १७४८ रोजी झाला. त्यांच्या सामाधीच्या पुढील बाजूस कृष्णा वेण्णामाईची रथ शाळा आहे. या रथ शाळेला लागूनच पूर्वाभिमुख अवाढव्य एक दगडी बांधकाम दिसते. या वास्तूचा चौथरा राजचिन्हाने सजवलेला असून, अतिशय देखण्या स्थापत्य शैलीत त्याचे बांधकाम झालेले दिसते. कालौघात वरील घुमटाचे थोडे नुकसान झाले असले तरी आजमितीस जवळपास ३०० वर्षांनंतरही दगडात बांधलेली ही वास्तू दिमाखात उभी आहे. वस्तूसाठी केलेला खर्च व कलाकुसर यावरून ही वास्तू राजघरण्यातील एखाद्या मोठ्या व्यक्तीची समाधी असा अंदाज येतो. परंतु ही समाधी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी म्हणजेच येसूबाईंची असल्याचे माहुली येथील हरिणारायण मठातील १७५६ मधील दस्तऐवज व नकाशाच्या आधारे सिद्ध झाल्याने  सातारच्या इतिहासातील फार मोठा ऐतिहासिक वारसा आता दृष्टीक्षेपात आलेला आहे.महाराणी येसूबाई फाउंडेशन व जिज्ञासा या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून समाधीच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कामी माहुली ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने व हरिनारायण मठाचे ट्रस्टी पांडुरंग नेवसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शोध मोहिमेमुळे समाधी क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला आता गती मिळणार आहे.

येसूबाईंचे साताऱ्यातच वास्तव्य...छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी व सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई यांचे इतिहासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. सुमारे तीस वर्षे इतक्या प्रदीर्घ कालावधीत औरंगजेबाच्या नजर कैदेत काढल्यानंतर १७१९ मध्ये त्यांचे साताऱ्यात आगमन झाले. त्यानंतर मृत्यूपर्यंत त्यांचे साताऱ्यातच वास्तव्य होते. त्यांच्या मृत्यूची तारीख अजूनतरी उपलब्ध झालेली नाही. परंतु १७२९ च्या दरम्यान त्यांचा साताऱ्यात मृत्यू झाला असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.

अखेर समाधीच्या जागेवर शिक्कामोर्तब..सहा वर्षांपूर्वी माहुलीतील हरिनारायण मठाच्या कागदपत्रात या समाधीचा नामोल्लेख आढळून आला होता; परंतु त्याची स्थाननिश्चिती होत नव्हती. त्यासाठी जुन्या जाणत्या लोकांकडून घेतलेली मौखिक माहिती, पुराभिलेखागार कार्यालयाकडून मिळालेले दस्तावेज, माहुलीच्या मठाची कागदपत्रे अन् एका जुन्या नकाशाच्या आधारे समाधीचे स्थान निश्चित करण्यात यश आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhistoryइतिहास