शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: महाराणी येसूबाईंच्या समाधीची मूळ जागा सापडली, हरिनारायण मठाच्या कागदपत्रातून माहिती उघड 

By सचिन काकडे | Updated: March 16, 2023 16:43 IST

छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी म्हणजेच येसूबाईंची समाधी असल्याचे सिद्ध झाल्याने सातारच्या इतिहासातील फार मोठा ऐतिहासिक वारसा आता दृष्टीक्षेपात आला आहे

सातारा : राजधानी साताऱ्यातील माहुली हे गाव धार्मिक अंगाने प्रसिद्ध असून, या गावात मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाच्या व्यक्ती महाराणी येसूबाई यांची समाधी असल्याचे अखेर शिक्कामोर्तब झाले. सातारा स्थित जिज्ञासा संस्था व संलग्न अभ्यासकांनी इतिहासकालीन पत्रे व नकाशाच्या आधारे समाधीची स्थाननिश्चिती केली आहे.येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजेशिर्के आणि जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेचे कार्याध्यक्ष निलेश पंडित यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबतची दिली. निलेश पंडित म्हणाले, संगम माहुली गावात शिरत असताना डाव्या बाजूला एक मोठा दगडी चौथरा आहे. या चौथ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी सगुणाबाई यांचे वृंदावन आणि त्याच्या पाठीमागे सगुणेश्वराचे देवालय आहे. सगुणाबाईंचा मृत्यू २५ जुलै १७४८ रोजी झाला. त्यांच्या सामाधीच्या पुढील बाजूस कृष्णा वेण्णामाईची रथ शाळा आहे. या रथ शाळेला लागूनच पूर्वाभिमुख अवाढव्य एक दगडी बांधकाम दिसते. या वास्तूचा चौथरा राजचिन्हाने सजवलेला असून, अतिशय देखण्या स्थापत्य शैलीत त्याचे बांधकाम झालेले दिसते. कालौघात वरील घुमटाचे थोडे नुकसान झाले असले तरी आजमितीस जवळपास ३०० वर्षांनंतरही दगडात बांधलेली ही वास्तू दिमाखात उभी आहे. वस्तूसाठी केलेला खर्च व कलाकुसर यावरून ही वास्तू राजघरण्यातील एखाद्या मोठ्या व्यक्तीची समाधी असा अंदाज येतो. परंतु ही समाधी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी म्हणजेच येसूबाईंची असल्याचे माहुली येथील हरिणारायण मठातील १७५६ मधील दस्तऐवज व नकाशाच्या आधारे सिद्ध झाल्याने  सातारच्या इतिहासातील फार मोठा ऐतिहासिक वारसा आता दृष्टीक्षेपात आलेला आहे.महाराणी येसूबाई फाउंडेशन व जिज्ञासा या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून समाधीच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कामी माहुली ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने व हरिनारायण मठाचे ट्रस्टी पांडुरंग नेवसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शोध मोहिमेमुळे समाधी क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला आता गती मिळणार आहे.

येसूबाईंचे साताऱ्यातच वास्तव्य...छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी व सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई यांचे इतिहासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. सुमारे तीस वर्षे इतक्या प्रदीर्घ कालावधीत औरंगजेबाच्या नजर कैदेत काढल्यानंतर १७१९ मध्ये त्यांचे साताऱ्यात आगमन झाले. त्यानंतर मृत्यूपर्यंत त्यांचे साताऱ्यातच वास्तव्य होते. त्यांच्या मृत्यूची तारीख अजूनतरी उपलब्ध झालेली नाही. परंतु १७२९ च्या दरम्यान त्यांचा साताऱ्यात मृत्यू झाला असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.

अखेर समाधीच्या जागेवर शिक्कामोर्तब..सहा वर्षांपूर्वी माहुलीतील हरिनारायण मठाच्या कागदपत्रात या समाधीचा नामोल्लेख आढळून आला होता; परंतु त्याची स्थाननिश्चिती होत नव्हती. त्यासाठी जुन्या जाणत्या लोकांकडून घेतलेली मौखिक माहिती, पुराभिलेखागार कार्यालयाकडून मिळालेले दस्तावेज, माहुलीच्या मठाची कागदपत्रे अन् एका जुन्या नकाशाच्या आधारे समाधीचे स्थान निश्चित करण्यात यश आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhistoryइतिहास