शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बलकवडीत केवळ मृत पाणीसाठा

By admin | Updated: May 6, 2017 16:20 IST

धरणाने गाठला तळ : ऐन उन्हाळ्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याची भीषणता वाढली

आॅनलाईन लोकमतवाई (जि. सातारा), दि. 0४ : वाई, खंडाळा, फलटण तालुक्यांचे तारणहार असणाऱ्या बलकवडी धरणातील पाण्याने तळ गाठला असून, धरणात केवळ फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वाईच्या पश्चिम भागात ऐन मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून, त्यागाची भूमिका घेणाऱ्या भागातच ऐन उन्हाळ्यात काही किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे.बलकवडी धरणाची पाणी साठवण क्षमता चार टीएमसी इतकी आहे. वाई, खंडाळा, फलटण या दुष्काळग्रस्त भागांसाठी या धरणाची उभारणी करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण राज्याला पाणीटंचाईच्या झळा बसत असून, वाई तालुक्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बलकवडी धरण अतिवृष्टीच्या परिसरात येत असल्याने गेल्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले. मात्र, फलटण तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने धरणाने ऐन उन्हाळ्यात तळ गाठला आहे. धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक असल्याने त्याचा कोणत्याही बाबीसाठी वापर करता येणार नाही.प्रशासनाच्या वतीने तालुक्यात सुरू असलेल्या ह्यजललक्ष्मीह्ण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. हा खर्च पाण्यात जाऊ नये याची खबरदारी घेऊन धरणातील पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)प्रशासनाकडून उपाययोजनेची गरजबलकवडी धरणाने तळ गाठल्याने धरणावर अवलंबून असणारी शेती तसेच पाणी योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या धरणाच्या उभारणीत ज्यांनी त्यागाची भूमिका निभावली त्या लोकांच्या नशिबीच पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. बलकवडी पाटबंधारे खात्याच्या गलथान नियोजनामुळे धरणात पाण्याचा थेंब शिल्लक राहिला नाही. संबंधित विभागाने या भागातील ग्रामस्थांच्या त्यागाचा विचार करून पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.