शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
5
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
6
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
7
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
8
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
9
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
10
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
11
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
12
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
13
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
14
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
15
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
16
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
17
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
18
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
19
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
20
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र

बलकवडीत केवळ मृत पाणीसाठा

By admin | Updated: May 6, 2017 16:20 IST

धरणाने गाठला तळ : ऐन उन्हाळ्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याची भीषणता वाढली

आॅनलाईन लोकमतवाई (जि. सातारा), दि. 0४ : वाई, खंडाळा, फलटण तालुक्यांचे तारणहार असणाऱ्या बलकवडी धरणातील पाण्याने तळ गाठला असून, धरणात केवळ फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वाईच्या पश्चिम भागात ऐन मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून, त्यागाची भूमिका घेणाऱ्या भागातच ऐन उन्हाळ्यात काही किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे.बलकवडी धरणाची पाणी साठवण क्षमता चार टीएमसी इतकी आहे. वाई, खंडाळा, फलटण या दुष्काळग्रस्त भागांसाठी या धरणाची उभारणी करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण राज्याला पाणीटंचाईच्या झळा बसत असून, वाई तालुक्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बलकवडी धरण अतिवृष्टीच्या परिसरात येत असल्याने गेल्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले. मात्र, फलटण तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने धरणाने ऐन उन्हाळ्यात तळ गाठला आहे. धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक असल्याने त्याचा कोणत्याही बाबीसाठी वापर करता येणार नाही.प्रशासनाच्या वतीने तालुक्यात सुरू असलेल्या ह्यजललक्ष्मीह्ण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. हा खर्च पाण्यात जाऊ नये याची खबरदारी घेऊन धरणातील पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)प्रशासनाकडून उपाययोजनेची गरजबलकवडी धरणाने तळ गाठल्याने धरणावर अवलंबून असणारी शेती तसेच पाणी योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या धरणाच्या उभारणीत ज्यांनी त्यागाची भूमिका निभावली त्या लोकांच्या नशिबीच पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. बलकवडी पाटबंधारे खात्याच्या गलथान नियोजनामुळे धरणात पाण्याचा थेंब शिल्लक राहिला नाही. संबंधित विभागाने या भागातील ग्रामस्थांच्या त्यागाचा विचार करून पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.