अत्यंविधीला आली केवळ मूठभर माणसं!
By Admin | Updated: June 16, 2014 12:20 IST2014-06-16T12:20:16+5:302014-06-16T12:20:16+5:30
डबेवाडी येथे चार दिवसांपूर्वी विकास पवार या तरुणाचा खून झाला. त्याचे पडसाद बोगदा परिसरासह डबेवाडीतही उमटले आहेत. या घटनेला तब्बल ९७ तास उलटून गेले तरी गाव दहशतीच्या सावटाखाली वावरत आहे.

अत्यंविधीला आली केवळ मूठभर माणसं!
>परळी : डबेवाडी येथे चार दिवसांपूर्वी विकास पवार या तरुणाचा खून झाला. त्याचे पडसाद बोगदा परिसरासह डबेवाडीतही उमटले आहेत. या घटनेला तब्बल ९७ तास उलटून गेले तरी गाव दहशतीच्या सावटाखाली वावरत आहे. एवढेच नव्हे तर गावातील एका वृद्धाचा आज (रविवारी) मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीलाही नातेवाइकांसह काही मोजकेच लोक उपस्थित राहिले. तर गावातील युवक, पाहुणेमंडळी इतर ठिकाणी अद्यापही गायब आहेत.
गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास विकास पवार (रा. मंगळवार पेठ, सातारा) याचा डबेवाडीत खून झाला. तेव्हापासून येथील युवक, दुकानदार, महिला, वयोवृद्ध दहशतीखाली वावरत आहेत.
डबेवाडी हे वर्दळीचे ठिकाण. पण, सध्या सगळीकडे शुकशुकाट आहे. दरम्यान, रविवारी सकाळी गावातील एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीवर दहशतीचे सावट पसरले. केवळ २५ ते ३0 जण त्यांच्या अंत्यविधीला हजर होते. त्यामुळे अद्यापही गावात दहशत कायम आहे. बोगदा परिसरात काही वाहनचालकांची चौकशी केली जात असल्याची तक्रार आल्याने पोलिसांनीही तत्काळ बोगदा परिसर तसेच डबेवाडी गावात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
विकास पवार याच्या खून प्रकरणात असलेल्या दोन रिक्षा व त्यांच्या मालकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले होते. त्यांच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. सतीश माने याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २0 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर) विकास पवार
खूनप्रकरण आम्हाला का त्रास?
■ या खून प्रकरणाशी कसलाही संबंध नसताना आमच्या गावातील मुलांना, नागरिकांना का त्रास दिला जात आहे? खुनातील संशयितांना अटक केली आहे ना? मग त्यांच्या शिक्षेसाठी कोर्टात जा, आम्हाला का त्रास देता. आमच्या गाड्या अडविता, विनाकारण लोकांना मारहाण करता, कशासाठी?, असा सवाल डबेवाडीकर उपस्थित करीत आहेत. गावात पाणी नाही
■ विकास पवार खून प्रकरणात संशयित सागर किर्वे हा डबेवाडी ग्रामपंचायतीत शिपाई आहे. गावात पिण्याचे पाणी सोडण्याचे काम त्याच्याकडे होते. त्याला अटक केल्यामुळे गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी गुपचूप विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे.
उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांमधील गुन्ह्यांचा आलेख वाढतोय. पण स्थानिक प्रशासन त्यावर लगाम लावण्यात अपयशी - अखिलेश प्रतापसिंह, काँग्रेस