शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

ऑनलाईन वर्गात पालकांची लुडबुड ठरतेय त्रासदायक, शिस्त पाळण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 20:58 IST

Online Education : शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी करताना पालकांची होणारी लुडबुड त्रासदायक ठरू लागली आहे.

प्रगती जाधव-पाटील

सातारा : ऑनलाईन वर्ग सुरू झाल्यापासून अभ्यास करण्यासाठी आवश्यक वातावरण विद्यार्थ्यांना मिळालं नाही. त्यातच शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी करताना पालकांची होणारी लुडबुड त्रासदायक ठरू लागली आहे. अभ्यास येत नसलेल्या आपल्या पाल्याला दबक्या आवाजात उत्तर सांगणाऱ्या पालकांना खडेबोल सुनावण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.

कोविड काळ सुरू झाल्यापासून मुलांना शाळेत जाण अवघड झाले आहे. बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे तर हालच वेगळे आहेत. वर्गात शिक्षक शिकवत असताना कुटूंंबियांच्या अन्य हालचालींकडे त्यांचे लक्ष वेधले जाते. परिणामी शिक्षक काय शिकवतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. शिक्षणाचा हा पायाच कच्चा राहिला तर पुढील शैक्षणिक डोलारा उभं राहणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे शिकवलेले मुलांना समजलं का? हे तपासायला मुलांना लिहायला, वाचायला किंवा सांगायला लावलं तर ती अडखळतात. यामुळे विद्यार्थ्याच्या आकलनाचा अंदाज शिक्षकांना येतो. मात्र, मुल अडखळत असताना पालकांनीच त्याला कॉपी पुरविल्यामुळे मुलंही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत नसल्याचेही आढळून आले आहे.

मुलं चुकत असतील तर चुकू द्या

ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन वर्गात शिकवलेलं मुलांना समजलं का नाही हे तपासायला शिक्षक त्यांच्याकडून वाचन आणि पाठांतर करून घेतात. वाचनात अडथळे येऊ लागले की पालक विद्यार्थ्यांना सांगत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मुलं चुकत असतील तर चुकू दे, त्यांना दुरूस्त करायला आम्ही आहोत, तुम्ही त्यांना कहाी सांगू नका असे वारंवार आवाहन पालकांना करण्याची वेळ शिक्षकांवर येत आहे.

पालकांच्या उच्चाराने होतेय बोंब

पहिली ते चौथीच्या ऑनलाईन  वर्गात धडे वाचण्याचा सराव घेतला जातो. वर्गातील प्रत्येक मुलाने किमान एक परिच्छेद वाचावं अशी अपेक्षा असते. पालकांच्या मदतीने इंग्रजीतून धडे वाचताना विद्यार्थ्यांची अक्षरश: भंबेरी उडत आहे. इंग्रजी भाषेतील स्पष्ट उच्चार करण्याचा कटाक्ष शिक्षकांचा असतो तर शब्दाला शब्द जोडून इंग्रजी शब्द तयार करण्याचा प्रयत्न पालक करतात. त्यामुळे शिक्षकांनी शिकवलेलं योग्य की पालकांनी सांगितलेलं असा गोंधळ विद्यार्थ्यांचा होतो.

‘मार्कस’वादी पालकांची डोकेदुखी

पाल्याला अभ्यासात चांगले गुण मिळावेत अशी मानसिकता असलेल्या ‘मार्कस’वादी पालकांनी तर मुलांचे पेपरही स्वत:च सोडविल्याचे समोर आले आहे. बहुपर्यायी प्रश्न उत्तर असणाºया चाचणी परिक्षांचे पेपर अवघ्या पाच मिनिटात सोडवून आल्याचे पाहिल्यानंतर शिक्षकांनी अक्षरश: डोक्यावर हात मारला. यावर पर्याय म्हणून काही शाळांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे प्रश्नपत्रिका सोडविण्याचे दोन्ही पर्याय सक्तीचे केले. शाळेत गुणापेक्षा ज्ञान महत्वाचे असते याचेच प्रबोधन होणं आवश्यक बनलं आहे.

ऑनलाईन  वर्गात शिकवलेलं विद्यार्थ्यांना काहीच समजत नाही, असा पालकांचा शाळेवर आक्षेप असतो. पण आपलं मुल अडखळू लागलं की त्याचा अपमान होईल म्हणून पालक त्याच्या मदतीला धावतात हे गैर आहे. पाल्य चुकलं पाहिजे, अडखळलं पाहिजे त्याशिवाय ते शिकणार नाही, हे पालकांना समजणं आवश्यक आहे.

- विद्या धुमाळ, पालक

 

टॅग्स :Educationशिक्षणIndiaभारतTeacherशिक्षकStudentविद्यार्थी