एकीकडे बंद तर दुसरीकडे धरपकड
By Admin | Updated: June 3, 2014 01:24 IST2014-06-03T01:12:42+5:302014-06-03T01:24:59+5:30
सातारा जिल्हा : सोशल मीडियावरील अफवांवर प्रशासनाचे बारीक लक्ष

एकीकडे बंद तर दुसरीकडे धरपकड
लोणंद : लोणंद, ता. खंडाळा येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दुकाने बंद ठेवून आज (सोमवारी) सकाळी पालखीतळ येथून निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा तानाजी चौक, माळ आळी, लक्ष्मी आळी मार्गे शिवशक्ती पेट्रोल पंपापासून ग्रामपंचायत पटांगणात आल्यानंतर निषेध सभा झाली. त्यामध्ये अॅड. बाळासाहेब बागवान, राहुल आडगे, राजेश शिंदे, डॉ. किशोर बुरियानी, वसंत शेळके, महेंद्र माने, हर्षवर्धन शेळके, अजिमभाई आतार, शिवाजी लेंभे, शरद भोसले, सुनील यादव यांनी मनोगतात व्यक्त केले. लोणंदमधील दवाखाने मेडिकल बंद असल्यामुळे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्यामध्ये नेहमी गजबलेल्या बाजारपेठा चौकात सामसूम होती. मोर्चेमध्ये धनंजय घोडके, अशोक जाधव, मालोजीराजे जाधव, हेमंत पवार, रोहित निंबाळकर, रवी भोसले, मनोज इंगळे, राजेश भाटिया, हरीषभाई मेहता, दत्ता ठोंबरे उपस्थित होते. भुर्इंज : ‘भुर्इंज गाव हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या जागरुक असून, पंचवीस वर्षांत भुर्इंजमध्ये असा ताणतणाव कधीही झालेला नव्हता. गेल्या दोन दिवसांत जे भुर्इंजमध्ये घडले, ते विसरून सर्वच समाजबांधवांनी सामाजिक ऐक्य जपत ‘हम सब एक है’चा संदेश देत एक राहू,’ असा निर्धार भुर्इंजचे सरपंच बाळासाहेब कांबळे यांनी केला. या हिंदू-मुस्लिम समझोता बैठकीत दोन दिवसांत जे भुर्इंज गावात घडले, त्या बाबत दोन्ही समाजांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रदीप भोसले, मदन शिंदे, प्रशांत जाधव, रवींद्र भोसले, शिवसेनेचे अतुल जाधवराव, शेखर भोसले-पाटील, नितीन सावंत, मुस्लिम समाजाचे सदस्य मुबीन मोमीन, समीर मोमीन, आरीफ मोमीन, गौस सय्यद, शाबाद मोमीन, आय्याज चाकस, हुसेन मुलाणी, युनुस मुलाणी, दस्तगिर मोमीन, शकील मोमीन, युसुफ मोमीन उपस्थित होते. हेमंत शेडगे, चंद्रदीप भोसले, हमीद मोमीन, युसुफ मोमीन यांनी मनोगत व्यक्त केले. रहिमतपूर : रहिमतपूर येथे शिवप्रेमी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी कडकडीत बंद पुकारला. त्यात रहिमतपूर येथील व्यापार्यांनी, छोट्या-मोठ्या दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या बंद काळात वडाप वाहतूक पूर्णपणे बंद होती. रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. बसेसची तुरळक ये-जा सुरू होती. दुकाने बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय झाल्याचे जाणवत होते. रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)