शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

महू धरणात पाय घसरून बुडाल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 17:54 IST

पाचगणी : महू धरणात दापवडी, ता. जावळी येथे सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान किसन महादेव गावडे, वय ५४, वर्षे ...

ठळक मुद्देमहू धरणात पाय घसरून बुडाल्याने एकाचा मृत्यूधरणाच्या पाण्यात आढळून आला मृतदेह

पाचगणी : महू धरणात दापवडी, ता. जावळी येथे सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान किसन महादेव गावडे, वय ५४, वर्षे रा. बेलोशी, ता जावळी, हे धरणाच्या पाण्यात पाय घसरून पडले होते. आज सकाळी महाबळेश्वर टेकर्सच्या शोधपथकाच्या साह्याने शोधमोहीम राबविण्यात आली असता त्यांचा मृतदेह धरणाच्या पाण्यात आढळून आला आहे. त्यामुळे नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या बाबतच मेढा पोलीस स्टेशन अंकित करहर दुरक्षेत्रातून मिळालेली अधिक माहिती अशी की काल संध्याकाळी सहा च्या दरम्यान किसन महादेव गावडे, वय वर्षे ५४, रा. बेलोशी, ता. जावळी हे महू धरणाच्या पाण्यात दापवडी, या ठिकाणी पाय घसरून पडले होते. या बाबतची फिर्याद नितीन बाळासाहेब गावडे रा. बेलोशी यांनी करहर दुरक्षेत्राला दिली त्यानुसार सोमवारी धरण परिसरात पडलेल्या ठिकाणी शोध घेण्याचा पोलीस व गावकऱ्यांनी प्रयत्न केला परंतु अंधार झाल्याने शोधमोहीम थांबवावी लागली होती.त्यानंतर शोधमोहीम करण्याकरिता पोलीस स्टेशनच्या वतीने महाबळेश्वर टेकर्स याना पाचारण करण्यात आले. त्यानुसार आज सकाळी महाबळेश्वर टेकर्सचे शोधपथक घटना स्थळी पोहचले व त्यांनी सकाळी नऊ वाजता शोधमोहीम हाती घेतली थोड्याच वेळात पाण्यात पडलेल्या ठिकाणी महाबळेश्वर टेकर्सच्या शोधपथकाने शोध घेतला असता अथक परिश्रमानंतर मृतदेह धरणामध्ये सापडला.

यामध्ये महाबळेश्वर टेकर्सच्या अक्षय नाविलकर, अनिल केळगणे, सुनील भाटिया, जयंत बिरामने, अक्षय जाधव, सुनील कदम, सुनील वाडकर, अमित कोळी, या टेकर्सनी शोधमोहिमेत विशेष परिश्रम घेतले. त्यांस दापवाडी गावचे ग्रामस्थ, व पोलीस पाटील अनिल रांजणे, कुडाळ हद्दीतील बेलवडे गावचे पोलीस पोटील निशांत रोकडे यांनी सहकार्य केले आहे.त्यानंतर पंचनामा करून मृतदेह मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास मेढा पोलीस स्टेशनचे सपोनि नीलकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करहर दुरक्षेत्राचे ठाणे अंमलदार शिंदे डी. जी करीत आहेत.जावळी तालुका दुर्गम असून कुडाळ व मेढा, या विभागात विभागला आहे. शवविच्छेदानाची सुविधा फक्त मेढा याच ठिकाणी उपलब्ध असल्याने नातेवाईकांची मोठी हेळसांड होते. सोमार्डी,ग्रामीण रुग्णालय किंवा कुडाळ,प्राथमिक आरोग्य केंद या पैकी एका ठिकाणी शवविच्छेदनाची सोय उपलब्ध केल्यास या विभागातील नागरिकांची होणारी हेळसांड थांबणार आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर