शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातून वाहताहेत तेलकट नद्या!

By admin | Updated: March 17, 2016 23:49 IST

जलजागृती सप्ताह : कमी पाण्यातच वाहनांची धुलाई; पुढील गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात--खोल-खोल पाणी !

सातारा : जिल्ह्यात मार्चपासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नद्या अटल्या आहेत. त्यातच काही महाभाग वाहने धूत असल्याने ग्रीस, आॅईल पाण्यात सांडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतून तेलकट नद्या वाहत आहेत. हेच पाणी पुढील भागातील ग्रामस्थ पित असल्याने त्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.पाणी-पाणी म्हणून मराठवाडा बारा महिने टाहो फोडत असतानाच पावसाचा सातारा जिल्हा मात्र आम्ही सधन, धरणवाले अशी समजूत करून निवांत होते. मोठ्या प्रमाणावर डोंगरी भाग लाभलेला असतानाही म्हणावे तेवढे पाणी अडविता आले नाही. याचा फटका यंदा जाणवायला लागला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात मार्चपासूनच पाणीटंचाई जाणवायला लागली आहे. माण, खटावची जनता डिसेंबरपासून वणवण करून पाणी भरत आहे; पण कधी नव्हे ती सातारकरांवरही पाणीटंचाईची टांगती तलवार लटकत आहे. अनेक नद्या अटल्या असून, काही नद्यांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. अनेक गावांसाठी नद्या याच प्रमुख जलस्रोत आहे. त्यांची तहान याच नद्या भागवत आहेत. पण काही लोक पुढील गावांतील जनतेचा विचारच करत नाहीत. दुचाकी, कार, जीप नद्यांमध्ये नेऊन बिनधास्त धूत आहेत. यामुळे वाहनांतील ग्रीस, तेल, आॅईल पाण्यात मिसळत आहे. कमी प्रवाहामुळे पाण्यावर तेलाचा तवंग पसरत आहे. हेच पाणी पुढील गावातील लोक पित असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरी भागातील हे चित्र आहे, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही आहे. ग्रामीण भागात कमी पाण्याच्या डोहातच म्हशींना डुंबायला सोडले जाते. याच नद्यांमध्ये जनावरे धुणे, कपडे धुतले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत आहे. (प्रतिनिधी)रक्षाविसर्जनावर हवाय पर्यायअनेक समाजात अंत्यविधीनंतर नद्यांमध्ये रक्षाविसर्जन केले जाते. तसेच निर्माल्य, कपडे व इतर साहित्य नद्यांमध्ये टाकले जातात. काही महिन्यांपूर्वी एका शिक्षकाने रक्षाविसर्जन नदीत न करता वृक्षारोपण करून रोपांच्या खड्ड्यांत टाकले होते. यामुळे वडिलांच्या स्मृती जपल्या गेल्या आहेत, अशी त्यांची धारणा आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जलसप्ताह साजरा केला जात आहे. या काळात या प्रकारे जनजागृती करण्याची गरज आहे.जनतेतूनच हवीय जागृतीनदी पात्रांमध्ये वाहने धुणे, गावातील कचरा टाकणे, औद्योगिक वसाहतीतील अशुद्ध पाणी टाकण्यामुळे जलप्रदुषण होत आहे. यासाठी केवळ कागदावर जलजागृती करुन चालणार नाही. त्यासाठी शालेय स्तरावर योग्य ती जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.- प्रा. डॉ. दादासाहेब नवले