शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Satara: शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; माणमधील शेतीपंपासाठी सलग आठ तास वीज, अधिकाऱ्यांचे आश्वासन 

By नितीन काळेल | Updated: March 12, 2025 19:34 IST

सातारा : महावितरणच्या चुकीच्या कारभाराविरोधात माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी साताऱ्यात अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ...

सातारा : महावितरणच्या चुकीच्या कारभाराविरोधात माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी साताऱ्यात अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शेतीपंपांना सलग आठ तास वीजपुरवठा, शेनवडी उपकेंद्रात दुप्पट क्षमतेचा ट्रान्सफाॅर्मर उभारु अशी लेखी आश्वासने दिले. त्यानंतरच माणमधील शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.माण तालुक्यात महावितरणच्या कारभाराबद्दल जनतेत रोष आहे. तसेच शेतकऱ्यांनाही या कंपनीचा फटका बसत आहे. यासाठी माणमधील शेतकरी साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी कृष्णानगर येथील महावितरण अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला सुरूवात केली. त्यामुळे महावितरणचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांसोबत तातडीने चर्चा केली. तसेच काही मागण्या लेखी स्वरुपात मान्य केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमरण उपोषण स्थगित केले.

शेतीपंपांना नवीन वीज जोडणी देण्याबाबतची मागणी वरिष्ठ कार्यालयास सादर करू, शेनवडी उपकेंद्राच्या अखत्यारित शेतीपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यात येईल, दीड माहिन्यात शेनवडी उपकेंद्रात असणारा पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलून दुप्पट क्षमतेचा करू, शेतीपंपांना सलग आठ तास नियमित वीजपुरवठा होईल याची दक्षता घेऊ, असे लेखी पत्र महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिले आहे.यावेळी महेश करचे, अतुल झिमल, अण्णा व्हरकाटे, शिवाजी काळेल, समाधान पुकळे, शिवाजी जाधव, विजय झिमल, आबा पिसाळ, मधुकर कोळेकर, भारत काळेल यांच्यासह माण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यादरम्यान आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीagitationआंदोलनelectricityवीजmahavitaranमहावितरण