शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

Satara: शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; माणमधील शेतीपंपासाठी सलग आठ तास वीज, अधिकाऱ्यांचे आश्वासन 

By नितीन काळेल | Updated: March 12, 2025 19:34 IST

सातारा : महावितरणच्या चुकीच्या कारभाराविरोधात माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी साताऱ्यात अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ...

सातारा : महावितरणच्या चुकीच्या कारभाराविरोधात माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी साताऱ्यात अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शेतीपंपांना सलग आठ तास वीजपुरवठा, शेनवडी उपकेंद्रात दुप्पट क्षमतेचा ट्रान्सफाॅर्मर उभारु अशी लेखी आश्वासने दिले. त्यानंतरच माणमधील शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.माण तालुक्यात महावितरणच्या कारभाराबद्दल जनतेत रोष आहे. तसेच शेतकऱ्यांनाही या कंपनीचा फटका बसत आहे. यासाठी माणमधील शेतकरी साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी कृष्णानगर येथील महावितरण अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला सुरूवात केली. त्यामुळे महावितरणचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांसोबत तातडीने चर्चा केली. तसेच काही मागण्या लेखी स्वरुपात मान्य केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमरण उपोषण स्थगित केले.

शेतीपंपांना नवीन वीज जोडणी देण्याबाबतची मागणी वरिष्ठ कार्यालयास सादर करू, शेनवडी उपकेंद्राच्या अखत्यारित शेतीपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यात येईल, दीड माहिन्यात शेनवडी उपकेंद्रात असणारा पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलून दुप्पट क्षमतेचा करू, शेतीपंपांना सलग आठ तास नियमित वीजपुरवठा होईल याची दक्षता घेऊ, असे लेखी पत्र महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिले आहे.यावेळी महेश करचे, अतुल झिमल, अण्णा व्हरकाटे, शिवाजी काळेल, समाधान पुकळे, शिवाजी जाधव, विजय झिमल, आबा पिसाळ, मधुकर कोळेकर, भारत काळेल यांच्यासह माण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यादरम्यान आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीagitationआंदोलनelectricityवीजmahavitaranमहावितरण