शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने फटका दिलेल्या शेतकऱ्यांचा आकडा ६० हजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 17:55 IST

सातारा जिल्ह्यात अवकाळीचा पाऊस जस-जसा पडत आहे, तस-तसा पीक, फळबाग नुकसानीचा आकडा वाढू लागला आहे. चार दिवसांपूर्वी १ हजार ३०९ गावांतील १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा अंदाज होता; पण मंगळवारअखेर बाधित गावांची संख्या १ हजार ४८६ वर गेली असून, २३ हजार हेक्टरला हानी पोहोचल्याचे नजर अंदाजाने समोर आले आहे. तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ६० हजारांपर्यंत पोहोचलीय.

ठळक मुद्देबळीराजा कोलमडला : पावसाबरोबरच नुकसानीचे प्रमाण वाढले१४८६ गावांतील २३ हजार हेक्टरवरील पिके, फळबागांची हानी

नितीन काळेलसातारा : जिल्ह्यात अवकाळीचा पाऊस जस-जसा पडत आहे, तस-तसा पीक, फळबाग नुकसानीचा आकडा वाढू लागला आहे. चार दिवसांपूर्वी १ हजार ३०९ गावांतील १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा अंदाज होता; पण मंगळवारअखेर बाधित गावांची संख्या १ हजार ४८६ वर गेली असून, २३ हजार हेक्टरला हानी पोहोचल्याचे नजर अंदाजाने समोर आले आहे. तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ६० हजारांपर्यंत पोहोचलीय.जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती होती. दीडशेहून अधिक गावे आणि एक हजारच्या वर वाड्यावस्त्यांना पाण्यासाठी टँकर सुरू होते. तर गेल्यावर्षीच दुष्काळी तालुक्यातील खरीप आणि रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या पदरी पडला नव्हता.

यावर्षी तर सततच्या पावसाने ओल्या दुष्काळासारखी स्थिती उद्भवलीय. आॅक्टोबरमधील पावसाने तर १ नोव्हेंबरच्या नजरअंदाजानुसार जिल्ह्यात अंदाजे ११ हजार ७९९ हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसल्याचे समोर आले होते. १ हजार ३०९ गावे पीकहानीत बाधित झाल्याचा अंदाज होता.

यामध्ये पाटणमधील सर्वात अधिक २८५ गावे होती. मात्र, यानंतरही सतत पाऊस पडला. गेल्या पाच दिवसांत तर सर्वच तालुक्यांत पाऊस पडला आहे. सोमवारी रात्री तर खंडाळा, कोरेगाव आणि फलटण तालुक्याला धुवून काढले. यामुळे पीक आणि फळबाग नुकसानीचा आकडा आणखी वाढला आहे.अवकाळीच्या पावसाने १ नोव्हेंबरनंतरही फटका दिल्याने मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ४८६ गावांत पीकहानी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील २८५ गावांचा समावेश असून, यानंतर कऱ्हाड २१६, सातारा १५९, कोरेगाव आणि खटाव तालुका १३५, फलटण १२३, वाई ११६, जावळी १०३, महाबळेश्वर ८८, माण ६६ आणि खंडाळा तालुक्यातील ६० गावांचा समावेश आहे.

सर्वाधिक बाधित क्षेत्र हे फलटण तालुक्यात ८ हजार ६४६ हेक्टर असून, यानंतर पाटण तालुक्यात २ हजार ७८० हेक्टर आहे. खटाव तालुक्यात २ हजार २५२, सातारा २ हजार २१७, माण २ हजार १०९, खंडाळा १ हजार ६०९, कऱ्हाड तालुका १ हजार १६०, वाई १ हजार ९३, कोरेगाव ८८६ आणि जावळी तालुका १४२ व महाबळेश्वर तालुक्यात १०८ हेक्टरवरील क्षेत्राला अवकाळीचा फटका बसला आहे.बाधित शेतकऱ्यांची सर्वात अधिक संख्या फलटण तालुक्यात १३ हजार ११३ असून, यानंतर पाटण तालुका ११ हजार ९०३, सातारा ७ हजार, माण ४ हजार ८५१, खटाव ४ हजार ४२८, खंडाळा ४ हजार २३, वाई ३ हजार ६४३, कोरेगाव ३ हजार ५२७, कऱ्हाड ३ हजार ४८०, महाबळेश्वर २ हजार ४०० आणि जावळी तालुक्यात १ हजार १९४ आहे.जिल्ह्यात ५ नोव्हेंबरपर्यंत नुकसान झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक पीक हे सोयाबीनचे आहे. त्या खालोखाल भात, भुईमूग, ज्वारी, घेवडा आदीचे आहे. तसेच माण, फलटण, खटाव आणि कोरेगावमधील द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.३३ हजार शेतकऱ्यांच्या १५ हजार हेक्टरचे पंचनामेजिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत नुकसान झालेल्या अंदाजे एकूण क्षेत्रापैकी १५ हजार ११२ हेक्टरचे पंचनामे झाले होते. तर यामध्ये ३३ हजार ७० शेतकऱ्यांच्या पीक, फळबाग नुकसानीचा पंचनाम्यात समावेश आहे.

फलटण तालुक्यातील सर्वाधिक ५ हजार ३३१ हेक्टरवरील तर त्यानंतर माण तालुक्यातील २ हजार ४५२, सातारा २ हजार १९६, खंडाळा १ हजार ३६१ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झालेले आहेत. तर फलटण तालुक्यातील १० हजार ७२८ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्यानंतर सातारा ६ हजार १४ आणि पाटणमधील ४ हजार ८१६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. सर्वात कमी माण तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर