शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

अवकाळीने फटका दिलेल्या शेतकऱ्यांचा आकडा ६० हजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 17:55 IST

सातारा जिल्ह्यात अवकाळीचा पाऊस जस-जसा पडत आहे, तस-तसा पीक, फळबाग नुकसानीचा आकडा वाढू लागला आहे. चार दिवसांपूर्वी १ हजार ३०९ गावांतील १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा अंदाज होता; पण मंगळवारअखेर बाधित गावांची संख्या १ हजार ४८६ वर गेली असून, २३ हजार हेक्टरला हानी पोहोचल्याचे नजर अंदाजाने समोर आले आहे. तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ६० हजारांपर्यंत पोहोचलीय.

ठळक मुद्देबळीराजा कोलमडला : पावसाबरोबरच नुकसानीचे प्रमाण वाढले१४८६ गावांतील २३ हजार हेक्टरवरील पिके, फळबागांची हानी

नितीन काळेलसातारा : जिल्ह्यात अवकाळीचा पाऊस जस-जसा पडत आहे, तस-तसा पीक, फळबाग नुकसानीचा आकडा वाढू लागला आहे. चार दिवसांपूर्वी १ हजार ३०९ गावांतील १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा अंदाज होता; पण मंगळवारअखेर बाधित गावांची संख्या १ हजार ४८६ वर गेली असून, २३ हजार हेक्टरला हानी पोहोचल्याचे नजर अंदाजाने समोर आले आहे. तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ६० हजारांपर्यंत पोहोचलीय.जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती होती. दीडशेहून अधिक गावे आणि एक हजारच्या वर वाड्यावस्त्यांना पाण्यासाठी टँकर सुरू होते. तर गेल्यावर्षीच दुष्काळी तालुक्यातील खरीप आणि रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या पदरी पडला नव्हता.

यावर्षी तर सततच्या पावसाने ओल्या दुष्काळासारखी स्थिती उद्भवलीय. आॅक्टोबरमधील पावसाने तर १ नोव्हेंबरच्या नजरअंदाजानुसार जिल्ह्यात अंदाजे ११ हजार ७९९ हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसल्याचे समोर आले होते. १ हजार ३०९ गावे पीकहानीत बाधित झाल्याचा अंदाज होता.

यामध्ये पाटणमधील सर्वात अधिक २८५ गावे होती. मात्र, यानंतरही सतत पाऊस पडला. गेल्या पाच दिवसांत तर सर्वच तालुक्यांत पाऊस पडला आहे. सोमवारी रात्री तर खंडाळा, कोरेगाव आणि फलटण तालुक्याला धुवून काढले. यामुळे पीक आणि फळबाग नुकसानीचा आकडा आणखी वाढला आहे.अवकाळीच्या पावसाने १ नोव्हेंबरनंतरही फटका दिल्याने मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ४८६ गावांत पीकहानी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील २८५ गावांचा समावेश असून, यानंतर कऱ्हाड २१६, सातारा १५९, कोरेगाव आणि खटाव तालुका १३५, फलटण १२३, वाई ११६, जावळी १०३, महाबळेश्वर ८८, माण ६६ आणि खंडाळा तालुक्यातील ६० गावांचा समावेश आहे.

सर्वाधिक बाधित क्षेत्र हे फलटण तालुक्यात ८ हजार ६४६ हेक्टर असून, यानंतर पाटण तालुक्यात २ हजार ७८० हेक्टर आहे. खटाव तालुक्यात २ हजार २५२, सातारा २ हजार २१७, माण २ हजार १०९, खंडाळा १ हजार ६०९, कऱ्हाड तालुका १ हजार १६०, वाई १ हजार ९३, कोरेगाव ८८६ आणि जावळी तालुका १४२ व महाबळेश्वर तालुक्यात १०८ हेक्टरवरील क्षेत्राला अवकाळीचा फटका बसला आहे.बाधित शेतकऱ्यांची सर्वात अधिक संख्या फलटण तालुक्यात १३ हजार ११३ असून, यानंतर पाटण तालुका ११ हजार ९०३, सातारा ७ हजार, माण ४ हजार ८५१, खटाव ४ हजार ४२८, खंडाळा ४ हजार २३, वाई ३ हजार ६४३, कोरेगाव ३ हजार ५२७, कऱ्हाड ३ हजार ४८०, महाबळेश्वर २ हजार ४०० आणि जावळी तालुक्यात १ हजार १९४ आहे.जिल्ह्यात ५ नोव्हेंबरपर्यंत नुकसान झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक पीक हे सोयाबीनचे आहे. त्या खालोखाल भात, भुईमूग, ज्वारी, घेवडा आदीचे आहे. तसेच माण, फलटण, खटाव आणि कोरेगावमधील द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.३३ हजार शेतकऱ्यांच्या १५ हजार हेक्टरचे पंचनामेजिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत नुकसान झालेल्या अंदाजे एकूण क्षेत्रापैकी १५ हजार ११२ हेक्टरचे पंचनामे झाले होते. तर यामध्ये ३३ हजार ७० शेतकऱ्यांच्या पीक, फळबाग नुकसानीचा पंचनाम्यात समावेश आहे.

फलटण तालुक्यातील सर्वाधिक ५ हजार ३३१ हेक्टरवरील तर त्यानंतर माण तालुक्यातील २ हजार ४५२, सातारा २ हजार १९६, खंडाळा १ हजार ३६१ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झालेले आहेत. तर फलटण तालुक्यातील १० हजार ७२८ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्यानंतर सातारा ६ हजार १४ आणि पाटणमधील ४ हजार ८१६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. सर्वात कमी माण तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर