शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अवकाळीने फटका दिलेल्या शेतकऱ्यांचा आकडा ६० हजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 17:55 IST

सातारा जिल्ह्यात अवकाळीचा पाऊस जस-जसा पडत आहे, तस-तसा पीक, फळबाग नुकसानीचा आकडा वाढू लागला आहे. चार दिवसांपूर्वी १ हजार ३०९ गावांतील १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा अंदाज होता; पण मंगळवारअखेर बाधित गावांची संख्या १ हजार ४८६ वर गेली असून, २३ हजार हेक्टरला हानी पोहोचल्याचे नजर अंदाजाने समोर आले आहे. तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ६० हजारांपर्यंत पोहोचलीय.

ठळक मुद्देबळीराजा कोलमडला : पावसाबरोबरच नुकसानीचे प्रमाण वाढले१४८६ गावांतील २३ हजार हेक्टरवरील पिके, फळबागांची हानी

नितीन काळेलसातारा : जिल्ह्यात अवकाळीचा पाऊस जस-जसा पडत आहे, तस-तसा पीक, फळबाग नुकसानीचा आकडा वाढू लागला आहे. चार दिवसांपूर्वी १ हजार ३०९ गावांतील १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा अंदाज होता; पण मंगळवारअखेर बाधित गावांची संख्या १ हजार ४८६ वर गेली असून, २३ हजार हेक्टरला हानी पोहोचल्याचे नजर अंदाजाने समोर आले आहे. तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ६० हजारांपर्यंत पोहोचलीय.जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती होती. दीडशेहून अधिक गावे आणि एक हजारच्या वर वाड्यावस्त्यांना पाण्यासाठी टँकर सुरू होते. तर गेल्यावर्षीच दुष्काळी तालुक्यातील खरीप आणि रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या पदरी पडला नव्हता.

यावर्षी तर सततच्या पावसाने ओल्या दुष्काळासारखी स्थिती उद्भवलीय. आॅक्टोबरमधील पावसाने तर १ नोव्हेंबरच्या नजरअंदाजानुसार जिल्ह्यात अंदाजे ११ हजार ७९९ हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसल्याचे समोर आले होते. १ हजार ३०९ गावे पीकहानीत बाधित झाल्याचा अंदाज होता.

यामध्ये पाटणमधील सर्वात अधिक २८५ गावे होती. मात्र, यानंतरही सतत पाऊस पडला. गेल्या पाच दिवसांत तर सर्वच तालुक्यांत पाऊस पडला आहे. सोमवारी रात्री तर खंडाळा, कोरेगाव आणि फलटण तालुक्याला धुवून काढले. यामुळे पीक आणि फळबाग नुकसानीचा आकडा आणखी वाढला आहे.अवकाळीच्या पावसाने १ नोव्हेंबरनंतरही फटका दिल्याने मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ४८६ गावांत पीकहानी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील २८५ गावांचा समावेश असून, यानंतर कऱ्हाड २१६, सातारा १५९, कोरेगाव आणि खटाव तालुका १३५, फलटण १२३, वाई ११६, जावळी १०३, महाबळेश्वर ८८, माण ६६ आणि खंडाळा तालुक्यातील ६० गावांचा समावेश आहे.

सर्वाधिक बाधित क्षेत्र हे फलटण तालुक्यात ८ हजार ६४६ हेक्टर असून, यानंतर पाटण तालुक्यात २ हजार ७८० हेक्टर आहे. खटाव तालुक्यात २ हजार २५२, सातारा २ हजार २१७, माण २ हजार १०९, खंडाळा १ हजार ६०९, कऱ्हाड तालुका १ हजार १६०, वाई १ हजार ९३, कोरेगाव ८८६ आणि जावळी तालुका १४२ व महाबळेश्वर तालुक्यात १०८ हेक्टरवरील क्षेत्राला अवकाळीचा फटका बसला आहे.बाधित शेतकऱ्यांची सर्वात अधिक संख्या फलटण तालुक्यात १३ हजार ११३ असून, यानंतर पाटण तालुका ११ हजार ९०३, सातारा ७ हजार, माण ४ हजार ८५१, खटाव ४ हजार ४२८, खंडाळा ४ हजार २३, वाई ३ हजार ६४३, कोरेगाव ३ हजार ५२७, कऱ्हाड ३ हजार ४८०, महाबळेश्वर २ हजार ४०० आणि जावळी तालुक्यात १ हजार १९४ आहे.जिल्ह्यात ५ नोव्हेंबरपर्यंत नुकसान झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक पीक हे सोयाबीनचे आहे. त्या खालोखाल भात, भुईमूग, ज्वारी, घेवडा आदीचे आहे. तसेच माण, फलटण, खटाव आणि कोरेगावमधील द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.३३ हजार शेतकऱ्यांच्या १५ हजार हेक्टरचे पंचनामेजिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत नुकसान झालेल्या अंदाजे एकूण क्षेत्रापैकी १५ हजार ११२ हेक्टरचे पंचनामे झाले होते. तर यामध्ये ३३ हजार ७० शेतकऱ्यांच्या पीक, फळबाग नुकसानीचा पंचनाम्यात समावेश आहे.

फलटण तालुक्यातील सर्वाधिक ५ हजार ३३१ हेक्टरवरील तर त्यानंतर माण तालुक्यातील २ हजार ४५२, सातारा २ हजार १९६, खंडाळा १ हजार ३६१ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झालेले आहेत. तर फलटण तालुक्यातील १० हजार ७२८ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्यानंतर सातारा ६ हजार १४ आणि पाटणमधील ४ हजार ८१६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. सर्वात कमी माण तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर