शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

...त्यांनी चुकीचे काम केले, हे आता आपल्याला ठरवायचं आहे -: शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 9:04 PM

त्यामुळे आता विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांनी राजीनामा देऊन जे चुकीचे काम केले आहे, ते दुरुस्त करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोरेगावमधील सभेत उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून टीका

कोरेगाव : ‘साताऱ्यातून राष्टवादी काँग्रेस पक्षाचा खासदार पाच वर्षांसाठी निवडून दिला होता. त्याने पावणेपाच वर्षे शिल्लक असताना राजीनामा दिला आहे. ज्यांना निवडून दिले, त्यांनी चुकीचे काम केले आहे. ते आता आपल्याला ठरवायचं आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांचा नामोल्लेख टाळून केली.

कोरेगावमध्ये शुक्रवारी राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बाजार समिती आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीनिवास पाटील, सातारा-जावळीचे उमेदवार दीपक पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, ‘त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने आता पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी सरकारचे २२ ते २५ कोटी रुपये खर्च होतात, ही रक्कम सरकार खर्च करत असले तरी सरकारकडे ही रक्कम सामान्य जनतेकडूनच जमा होते. त्यामुळे आता विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांनी राजीनामा देऊन जे चुकीचे काम केले आहे, ते दुरुस्त करण्याची वेळ आली आहे.’

‘राज्यात ज्यांच्याकडे आपण सत्ता सोपविली त्यांनी सर्वसामान्यांचे हित कधीच पाहिलेच नाही. शेतकरी आत्महत्यांकडे पाहण्यास सरकारकडे वेळ नाही. मात्र नेतेमंडळींच्या वित्तीय संस्थांना हातभार लावण्यास ते मागे-पुढे पाहत नाहीत, हे दुर्दैव आहे. त्यामुळे राज्यातील सरकार उलथवून टाकण्यासाठी आता तरुणांनीच निवडणूक हाती घ्यायची वेळ आली आहे,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

श्रीनिवास पाटील व शशिकांत शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यांनी आजवर सामान्य जनतेसाठीच विकासाभिमुख काम केले आहे. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा लोकसभा आणि विधानसभेमध्ये उमटवला आहे. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊनच संधी दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSatara areaसातारा परिसर