शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

'ठाकरें'च्या तोंडी आता 'राऊतां'ची भाषा, मंत्री शंभूराज देसाईंची टीका

By प्रमोद सुकरे | Updated: July 12, 2023 18:14 IST

अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार

कराड : आम्ही सगळे बाजूला गेल्यापासून खासदार संजय राऊतचउद्धव ठाकरे यांच्याबरोबर जास्त आहेत. त्यामुळे त्यांच्या कानावर सध्या राऊतांचीच भाषा जास्त पडत आहे. साहजिकच त्याचा परिणाम उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या तोंडी राऊतांची भाषा ऐकायला मिळत आहे अशी टिका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ठाकरेंनी केलेला 'कलंक' हा शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा आहे म्हणूनच लोकांच्यातून तीव्र भावना उमटत असल्याचे मत देसाई यांनी व्यक्त केले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वापरलेल्या ‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावर पालकमंत्री शंभूराज देसाईंनी यांना छेडले असता ते बोलत होते.देसाई म्हणाले, "उद्धव ठाकरे हे संयमी नेते आहेत. मात्र, संजय राऊत जवळ असल्याने त्यांच्या सवयीचा परिणाम ठाकरेंवर बहुदा झाला असावा. त्यातूनच ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलले असावेत. आता ॲक्शनला रिॲक्शन येत आहे. जनतेतून यावर तीव्र संताप उमटत आहेत.उद्धव ठाकरेंची यापूर्वीची भाषणे आम्ही ऐकलेली आहेत. एक संयमी आणि शांत वक्तृत्व उद्धव ठाकरेंचे असायचे. परंतु गेल्या वर्ष भरात आम्ही जी भूमिका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वीकारली. तेव्हापासून त्यांची भाषाशैली बदलत राहिली. आता महिना-दोन महिन्यामध्ये तर उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामध्ये एक वेगळेपणाच दिसतोय. याचे कारण संजय राऊतच आहेत. तेच त्यांच्या सतत  जवळ असतात. सवयीचा परिणाम होतोच. राऊत जी भाषा बोलतात, जे शब्द वापरतात. ते शब्द उद्धव ठाकरेंच्या कानावर पडत असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडून फडणवीस यांच्याबद्दल एक शब्द गेला असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेम करणारे लाखो चाहते आहेत. ते व्यक्तिमत्व राज्याला पुढे घेऊन जाणारे आहे. फडणवीस हे उत्कृष्ट संसद पट्टू आहेत. अशा एका अभ्यासू आणि अनुभवी राज्याला पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाबाबत कलंक  हा शब्द प्रयोग उद्धव ठाकरे यांच्याकडून होणे हे महाराष्ट्रातील कुणालाच रुचलेले नाही. असेही देसाई म्हणाले.

अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तारसोमवारपासून मंत्रिमंडळाचे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच मत्रीमंडळ विस्तार व खाते वाटप करतील. मंत्रिमंडळ विस्तार व खाते वाटप पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असे ही देसाई यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत